शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

धान्याचा काळाबाजार केल्यास कारवाई - जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:46 IST

अकोला: सार्वजनिक वितरण प्रणालीतील धान्याचा काळाबाजार रोखण्यासोबतच पात्र लाभार्थींना त्यांच्या हक्काचे धान्य मिळण्यासाठी अकोला जिल्हय़ात उद्या बुधवारपासून द्वारपोच धान्य वाटपाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी सर्व संबंधितांना धान्याचा काळाबाजार होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत.

ठळक मुद्देदुकानांत आजपासून पोहोचणार धान्य अधिकारी-कर्मचारी ठेवणार लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: सार्वजनिक वितरण प्रणालीतील धान्याचा काळाबाजार रोखण्यासोबतच पात्र लाभार्थींना त्यांच्या हक्काचे धान्य मिळण्यासाठी अकोला जिल्हय़ात उद्या बुधवारपासून द्वारपोच धान्य वाटपाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी सर्व संबंधितांना धान्याचा काळाबाजार होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत.शिधापत्रिकाधारकांच्या वाट्याचे ४0 ते ५0 टक्के धान्य गोदामपाल, दुकानदार, दलालांची साखळी मध्येच हडप करण्याचे प्रकार यापूर्वी सातत्याने घडले आहेत. त्यातच दुकानदार गावातील लाभार्थींसाठी मिळणार्‍या शंभर टक्के धान्याची उचल न करता ते परस्पर काळाबाजारात नेण्याच्या घटनाही घडल्या. त्यातून मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार वाढला. त्याला आवर घालण्यासाठी शासनाने द्वारपोच धान्य वाटपाचा उपक्रम सुरू केला आहे. त्यानुसार दुसर्‍या टप्प्यात धान्य दुकानांपर्यंत पोहोचवण्याचे काम उद्या ४ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. आतापर्यंत स्वस्त धान्य दुकानदारांना मंजूर धान्याची उचल शासकीय गोदामातून करावी लागायची. द्वारपोच उपक्रमात ते बंद झाले आहे. शासकीय गोदाम ते गावातील धान्य दुकानापर्यंत धान्य पोहोचून देण्याची जबाबदारी वाहतूक कंत्राटदाराची आहे. वाहन गावात पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी मोजमाप करून दुकानदाराला सोपवले जाणार आहे. त्यासाठी गावातील पंच मंडळींची साक्षही राहणार आहे. त्यामुळे एकदा गावात आलेल्या धान्याचा काळाबाजार करणे दुकानदाराला अशक्य होणार आहे. द्वारपोच धान्य वाटपासाठी कालर्मयादाही निश्‍चित झाली आहे. महिन्याच्या ठरलेल्या तारखेपासून दुकानांमध्ये धान्य पोहोचणार आहे. धान्याचे वाहन गावात पोहोचल्याची माहिती तलाठय़ाकडून दवंडीद्वारे दिली जाणार आहे. त्यामुळे गावात ठरावीक तारखेला मिळालेले धान्य शंभर टक्के वाटप करावे लागणार आहे. आधीच्या पद्धतीमध्ये महिन्याच्या शेवटच्या दिवसात मालाची उचल करून तो साठा परस्पर गायब करण्याचेही प्रकार घडले आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी सर्व संबंधित अधिकार्‍यांची जबाबदारीही निश्‍चित केली आहे. 

काळाबाजार झाल्यास प्रत्येकजण जबाबदारपुरवठा निरीक्षक, निरीक्षण अधिकारी, गोदामपाल, हमाल कंत्राटदार, वाहतूकदार यांनी त्यांची ठरलेली कामे करण्याचे जिल्हाधिकार्‍यांनी बजावले आहे. या सर्वांनी आपापली कामे ठरल्याप्रमाणे केलीच पाहिजे, असा दमही त्यांनी भरला आहे. दुकानदारांनी पॉस मशीनद्वारे वाटप करावे, त्यासाठी लाभार्थींनी आधार कार्ड घेऊन दुकानात जावे, परिमाणानुसार धान्याची मागणी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

लाभार्थींनी जागृत व्हावे!गावात पोहोचलेल्या धान्याचे शंभर टक्के वाटप होते की नाही, याची पडताळणी ग्रामस्तरीय दक्षता समितीने करावी, तलाठय़ाने त्याकडे विशेष लक्ष द्यावे, दुकानदारांकडून ठरलेल्या परिमाणाएवढे हक्काचे धान्य घ्यावेच, त्याची पावतीही ग्राहकांनी घ्यावी, गावात आलेल्या धान्याचा काळाबाजार होणार नाही, ही जबाबदारी सर्वांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे यांनी केले.-