शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

धान्याचा काळाबाजार केल्यास कारवाई - जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:46 IST

अकोला: सार्वजनिक वितरण प्रणालीतील धान्याचा काळाबाजार रोखण्यासोबतच पात्र लाभार्थींना त्यांच्या हक्काचे धान्य मिळण्यासाठी अकोला जिल्हय़ात उद्या बुधवारपासून द्वारपोच धान्य वाटपाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी सर्व संबंधितांना धान्याचा काळाबाजार होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत.

ठळक मुद्देदुकानांत आजपासून पोहोचणार धान्य अधिकारी-कर्मचारी ठेवणार लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: सार्वजनिक वितरण प्रणालीतील धान्याचा काळाबाजार रोखण्यासोबतच पात्र लाभार्थींना त्यांच्या हक्काचे धान्य मिळण्यासाठी अकोला जिल्हय़ात उद्या बुधवारपासून द्वारपोच धान्य वाटपाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी सर्व संबंधितांना धान्याचा काळाबाजार होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत.शिधापत्रिकाधारकांच्या वाट्याचे ४0 ते ५0 टक्के धान्य गोदामपाल, दुकानदार, दलालांची साखळी मध्येच हडप करण्याचे प्रकार यापूर्वी सातत्याने घडले आहेत. त्यातच दुकानदार गावातील लाभार्थींसाठी मिळणार्‍या शंभर टक्के धान्याची उचल न करता ते परस्पर काळाबाजारात नेण्याच्या घटनाही घडल्या. त्यातून मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार वाढला. त्याला आवर घालण्यासाठी शासनाने द्वारपोच धान्य वाटपाचा उपक्रम सुरू केला आहे. त्यानुसार दुसर्‍या टप्प्यात धान्य दुकानांपर्यंत पोहोचवण्याचे काम उद्या ४ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. आतापर्यंत स्वस्त धान्य दुकानदारांना मंजूर धान्याची उचल शासकीय गोदामातून करावी लागायची. द्वारपोच उपक्रमात ते बंद झाले आहे. शासकीय गोदाम ते गावातील धान्य दुकानापर्यंत धान्य पोहोचून देण्याची जबाबदारी वाहतूक कंत्राटदाराची आहे. वाहन गावात पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी मोजमाप करून दुकानदाराला सोपवले जाणार आहे. त्यासाठी गावातील पंच मंडळींची साक्षही राहणार आहे. त्यामुळे एकदा गावात आलेल्या धान्याचा काळाबाजार करणे दुकानदाराला अशक्य होणार आहे. द्वारपोच धान्य वाटपासाठी कालर्मयादाही निश्‍चित झाली आहे. महिन्याच्या ठरलेल्या तारखेपासून दुकानांमध्ये धान्य पोहोचणार आहे. धान्याचे वाहन गावात पोहोचल्याची माहिती तलाठय़ाकडून दवंडीद्वारे दिली जाणार आहे. त्यामुळे गावात ठरावीक तारखेला मिळालेले धान्य शंभर टक्के वाटप करावे लागणार आहे. आधीच्या पद्धतीमध्ये महिन्याच्या शेवटच्या दिवसात मालाची उचल करून तो साठा परस्पर गायब करण्याचेही प्रकार घडले आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी सर्व संबंधित अधिकार्‍यांची जबाबदारीही निश्‍चित केली आहे. 

काळाबाजार झाल्यास प्रत्येकजण जबाबदारपुरवठा निरीक्षक, निरीक्षण अधिकारी, गोदामपाल, हमाल कंत्राटदार, वाहतूकदार यांनी त्यांची ठरलेली कामे करण्याचे जिल्हाधिकार्‍यांनी बजावले आहे. या सर्वांनी आपापली कामे ठरल्याप्रमाणे केलीच पाहिजे, असा दमही त्यांनी भरला आहे. दुकानदारांनी पॉस मशीनद्वारे वाटप करावे, त्यासाठी लाभार्थींनी आधार कार्ड घेऊन दुकानात जावे, परिमाणानुसार धान्याची मागणी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

लाभार्थींनी जागृत व्हावे!गावात पोहोचलेल्या धान्याचे शंभर टक्के वाटप होते की नाही, याची पडताळणी ग्रामस्तरीय दक्षता समितीने करावी, तलाठय़ाने त्याकडे विशेष लक्ष द्यावे, दुकानदारांकडून ठरलेल्या परिमाणाएवढे हक्काचे धान्य घ्यावेच, त्याची पावतीही ग्राहकांनी घ्यावी, गावात आलेल्या धान्याचा काळाबाजार होणार नाही, ही जबाबदारी सर्वांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे यांनी केले.-