शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विद्यापीठाच्या पाणलोट प्रक्षेत्रावर पाणी व्यवस्थापनाचे आदर्श मॉडेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 13:52 IST

अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या पाणलोट प्रक्षेत्रावर पाणी व्यवस्थापनाचे आदर्श मॉडेल तयार केले आहे.

अकोला: मागच्या वर्षी पाऊस कमी झाल्याचा परिणाम विदर्भ, खान्देश, मराठवाड्याला अधिक झाला आहे. ओल्यापेक्षा कोरड्या दुष्काळाचे सावट सतत या विभागावर असते. विदर्भातील उन्हाळा तर सर्वश्रुत आहे. कमाल तापमान आताच ४०.५ अशांवर पोहोचले असल्याने पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. या पृष्ठभूमीवर अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या पाणलोट प्रक्षेत्रावर पाणी व्यवस्थापनाचे आदर्श मॉडेल तयार केले आहे. कृषी विद्यापीठाला यासाठीचा आंतरराष्टÑीय पुरस्कार मिळाला आहे. कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सव वर्षात हे आदर्श मॉडेल शेतकऱ्यांच्या शेतावर नेण्याची गरज आहे.भविष्यात अल्प पाण्यात येणाऱ्या पिकांचे वाण शोधणे आणि नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय करणे आवश्यक आहे. ही धोक्याची घंटा ओळखून विकसित देशांनी जमिनीच्या पृष्ठभागावर पाणी साठवण क्षमता निर्माण केली आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे जागतिक तापमानात वाढ झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या वातावरणातील बदलांमुळे अनेक समस्या निर्माण होत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचा प्रत्यय पावसाच्या प्रमाणावरूनही दिसून येत आहे. अवेळी, अति, कमी पावसाचा फटका सर्वांनाच बसत आहे. शेती उत्पादनावर याचे परिणाम जाणवू लागले आहेत. पावसाचा लहरीपणा बघून विकसित देशांनी प्रतिवर्ष प्रति माणूस आवश्यक भूपृष्ठावर पाणी साठवण क्षमता निर्माण केली आहे. या तुलनेत भारतात प्रतिमाणूस केवळ दोनशे ते सव्वा दोनशे घनमीटर प्रतिवर्ष एवढीच पाणी साठवण क्षमता आहे.भारतात घरगुती वापरासह पिण्यासाठी, शेती, उद्योगांसाठी पाणी अत्यावश्यक आहे. तथापि, ही गरज भागविण्यासाठी भूपृष्ठावर पाण्याची परिणामकारक साठवण केली जात नसल्याने, शेती उद्योग तर सोडाच, पिण्यासाठीदेखील पाणी मिळत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात सर्वदूर पाण्याचे दुर्भिक्ष्य दिसते. मागील १५ वर्षांचा इतिहास बघितल्यास येथे पावसाचे दीर्घ वार्षिक खंड पडलेले आहेत. पुढच्या वर्षी चांगला पाऊस होईल, हे सांगणे कठीण आहे, असा निष्कर्ष तज्ज्ञ काढत आहेत.

- डॉ. पंदेकृविने मागील तीन दशकात पाणलोट क्षेत्रात प्रचंड काम करू न निष्कर्ष काढूल मॉडेल तयार केले. पाऊस व्यवस्थापनाचा आदर्श आराखडा तयार केला. याचा अवलंब केला तर गरजेइतके पाणी आपणास हमखास मिळणार.डॉ. सुभाष टाले,माजी संचालक,कृषी पर्यावरण तसेच प्रमुख मृद व जलसंधारण,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ