शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

सनदी अधिकाऱ्यांना ‘महाबीज’चे वावडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 10:55 IST

MAHABEEJ : गत ११ वर्षांच्या काळात तब्बल १७ वेळा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली.

- सागर कुटे

अकोला : शेतकऱ्यांना बियाण्यांचा पुरवठा करण्यात महत्त्वाचे असलेल्या महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे (महाबीज) सनदी अधिकाऱ्यांना चांगलेच वावडे आहे. सौरभ विजय यांच्यानंतर गत ११ वर्षांच्या काळात तब्बल १७ वेळा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. त्यामुळे हे पद आयएएस अधिकाऱ्यांना नको असल्याचे दिसून येत आहे. बियाण्यांचे उत्पादन, प्रक्रिया, प्रमाणीकरण, गुणवत्ता नियंत्रण, विपणन व विक्री हे सर्व कार्य महाबीजमार्फत केले जाते. महाबीजचे मुख्यालय हे अकोल्यात असून या महामंडळाची सर्वस्वी जबाबदारी व्यवस्थापकीय संचालकाची असते. या पदावर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते. काही मोजके अधिकारी सोडता इतर अधिकारी दोन वर्षांपेक्षा जास्त काळ पदावर राहिले नाही. डिसेंबर २०२० मध्ये अनिल भंडारी यांची बदली झाल्यानंतर जी. श्रीकांत यांची नियुक्ती करण्यात आली. ते १७ फेब्रुवारीला रुजू झाले; परंतु अवघ्या आठवडाभरात त्यांची औरंगाबादमध्ये सेल्स टॅक्स विभागात नियुक्ती झाली. त्यांच्या जागेवर राहुल रेखावार यांची नियुक्ती केली. तेही महिनाभरानंतर रुजू झाले. तीन महिन्यांतच रेखावार यांची बदली झाली. त्यामुळे या पदाबाबत असलेली उदासीनता पुन्हा दिसून आली.

असा आहे महाबीजमध्ये अधिकाऱ्यांचा कार्यकाळ

महाबीजच्या ४५ वर्षांच्या कार्यकाळात आतापर्यंत ३२ अधिकाऱ्यांची व्यवस्थापकीय संचालकपदावर नेमणूक करण्यात आली. टी. बालारमण महाबीजचे पहिले एमडी होते. त्यानंतर, व्ही. रंगनाथन हे एमडी झाले. व्ही.एस. धुमाल, डॉ. प्रदीप व्यास या अधिकाऱ्यांनी चार वर्षांचा, तर सौरभ विजय यांनी तीन वर्षे १० महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण केला. त्यानंतर, एमडीपदावर बहुतांश अधिकारी दोन वर्षांपेक्षा जास्त काळ टिकले नाहीत.

शासनाकडून दुर्लक्षित

नफ्यात चालणारे हे शेतकऱ्यांचे महामंडळ आयएएस अधिकाऱ्यांना इतके नापसंतीचे ठिकाण का झाले असावे, याबाबत शेतकऱ्यांमध्येही आश्‍चर्य व्यक्त होत आहे; मात्र शासनाकडूनही हे महामंडळ दुर्लक्षित होत असल्याचे दिसून येत आहे.

सात-आठ वर्षांपासून एमडीपदावर अधिकारी टिकूनच राहत नाही. शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण वर्ण असलेल्या या महामंडळात एखादा एमडी म्हणून अधिकारी रुजू झाल्यास त्याला तीन वर्षांचा काळ पूर्ण करण्याची सक्ती केली पाहिजे. शासनाने याकडे लक्ष द्यावे.

- वल्लभराव देशमुख, संचालक, महाबीज, अकोला

पद रिक्तच!

काही दिवसांआधी राज्यात झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालकपदावर कुणाचीही नेमणूक झाली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा हे पद अधांतरी लटकले आहे. या पदावर अद्याप कोणाची नेमणूक होणार, याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :MahabeejमहाबीजAkolaअकोला