शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

सनदी अधिकाऱ्यांना ‘महाबीज’चे वावडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 10:55 IST

MAHABEEJ : गत ११ वर्षांच्या काळात तब्बल १७ वेळा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली.

- सागर कुटे

अकोला : शेतकऱ्यांना बियाण्यांचा पुरवठा करण्यात महत्त्वाचे असलेल्या महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे (महाबीज) सनदी अधिकाऱ्यांना चांगलेच वावडे आहे. सौरभ विजय यांच्यानंतर गत ११ वर्षांच्या काळात तब्बल १७ वेळा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. त्यामुळे हे पद आयएएस अधिकाऱ्यांना नको असल्याचे दिसून येत आहे. बियाण्यांचे उत्पादन, प्रक्रिया, प्रमाणीकरण, गुणवत्ता नियंत्रण, विपणन व विक्री हे सर्व कार्य महाबीजमार्फत केले जाते. महाबीजचे मुख्यालय हे अकोल्यात असून या महामंडळाची सर्वस्वी जबाबदारी व्यवस्थापकीय संचालकाची असते. या पदावर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते. काही मोजके अधिकारी सोडता इतर अधिकारी दोन वर्षांपेक्षा जास्त काळ पदावर राहिले नाही. डिसेंबर २०२० मध्ये अनिल भंडारी यांची बदली झाल्यानंतर जी. श्रीकांत यांची नियुक्ती करण्यात आली. ते १७ फेब्रुवारीला रुजू झाले; परंतु अवघ्या आठवडाभरात त्यांची औरंगाबादमध्ये सेल्स टॅक्स विभागात नियुक्ती झाली. त्यांच्या जागेवर राहुल रेखावार यांची नियुक्ती केली. तेही महिनाभरानंतर रुजू झाले. तीन महिन्यांतच रेखावार यांची बदली झाली. त्यामुळे या पदाबाबत असलेली उदासीनता पुन्हा दिसून आली.

असा आहे महाबीजमध्ये अधिकाऱ्यांचा कार्यकाळ

महाबीजच्या ४५ वर्षांच्या कार्यकाळात आतापर्यंत ३२ अधिकाऱ्यांची व्यवस्थापकीय संचालकपदावर नेमणूक करण्यात आली. टी. बालारमण महाबीजचे पहिले एमडी होते. त्यानंतर, व्ही. रंगनाथन हे एमडी झाले. व्ही.एस. धुमाल, डॉ. प्रदीप व्यास या अधिकाऱ्यांनी चार वर्षांचा, तर सौरभ विजय यांनी तीन वर्षे १० महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण केला. त्यानंतर, एमडीपदावर बहुतांश अधिकारी दोन वर्षांपेक्षा जास्त काळ टिकले नाहीत.

शासनाकडून दुर्लक्षित

नफ्यात चालणारे हे शेतकऱ्यांचे महामंडळ आयएएस अधिकाऱ्यांना इतके नापसंतीचे ठिकाण का झाले असावे, याबाबत शेतकऱ्यांमध्येही आश्‍चर्य व्यक्त होत आहे; मात्र शासनाकडूनही हे महामंडळ दुर्लक्षित होत असल्याचे दिसून येत आहे.

सात-आठ वर्षांपासून एमडीपदावर अधिकारी टिकूनच राहत नाही. शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण वर्ण असलेल्या या महामंडळात एखादा एमडी म्हणून अधिकारी रुजू झाल्यास त्याला तीन वर्षांचा काळ पूर्ण करण्याची सक्ती केली पाहिजे. शासनाने याकडे लक्ष द्यावे.

- वल्लभराव देशमुख, संचालक, महाबीज, अकोला

पद रिक्तच!

काही दिवसांआधी राज्यात झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालकपदावर कुणाचीही नेमणूक झाली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा हे पद अधांतरी लटकले आहे. या पदावर अद्याप कोणाची नेमणूक होणार, याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :MahabeejमहाबीजAkolaअकोला