शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शिधापत्रिका नसलेल्या गरीब कुटुंबांवर उपासमारीचे संकट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 17:20 IST

लॉकडाउनमध्ये हाताला काम नसल्याने पोटाची खळगी भरणार तरी कशी, असा प्रश्न गरीब मजूर कुटुंबांसमोर निर्माण झाला आहे.

- संतोष येलकर

अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लागू करण्यात आलेल्या ‘लॉकडाउन’ मध्ये शिधापत्रिकाधारकांना रास्त भाव दुकानांमधून धान्य वितरित करण्यात येत असले तरी, शिधापत्रिका नसलेल्या अनेक गरीब कुटुंबांना रास्त भावाच्या धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या आणि शिधापत्रिका नसलेल्या गरीब मजूर कुटुंबांसमोर उपासमारीचे संकट निर्माण झाले आहे. लॉकडाउनमध्ये हाताला काम नसल्याने पोटाची खळगी भरणार तरी कशी, असा प्रश्न गरीब मजूर कुटुंबांसमोर निर्माण झाला आहे.लॉकडाउनच्या कालावधीत नागरिकांनी घराबाहेर पडू नये तसेच कोणताही व्यक्ती अन्नधान्यापासून वंचित राहू नये, यासाठी शासनामार्फत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारक आणि अंत्योदय योजनेअंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थींना सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत दरमहा वितरित करण्यात येत असलेल्या धान्यासह एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांच्या कालावधीत दरमहा प्रत्येक लाभार्थीला ५ किलोप्रमाणे मोफत तांदूळ वितरित करण्यात येत आहे. यासोबतच केशरी शिधापत्रिकाधारक ( एपीएल) लाभार्थींनादेखील मे व जून या दोन महिन्यांच्या कालावधीत सवलतीच्या दरात धान्य वितरित करण्यात येणार आहे; परंतु अनेक गरीब मजूर कुटुंबांकडे शिधापत्रिका नाहीत. लॉकडाउनच्या परिस्थितीत हाताला काम नाही आणि शिधापत्रिका नसल्याने रास्त भाव दुकानांमधून धान्य मिळत नाही. त्यामुळे हातावर पोट असलेल्या गरीब कुटुंबांसमोर उपासमारीचे संकट निर्माण झाले आहे. त्यानुषंगाने लॉकडाउनच्या कालावधीत पोटाची खळगी भरणार कशी, याबाबतची चिंता गरीब मजूर कुटुंबांना सतावत आहे.जिल्ह्यातील ज्या गरीब, मजूर कुटुंबांकडे शिधापत्रिका नाही अशा कुटुंबांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबांना शिधापत्रिका उपलब्ध करून पात्र लाभार्थी कुटुंबांना धान्य वितरित करण्यात येणार आहे.- बी. यू. काळेजिल्हा पुरवठा अधिकारी 

 

 

टॅग्स :Akolaअकोला