शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
2
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
3
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
4
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
5
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
6
Viral Video : भर रस्त्यात हाय वोल्टेज ड्रामा! पत्नीने पतीच्या कानशिलात लगावल्या, कशावरून सुरू झालेला वाद?
7
आमिर खानच्या कुटुंबियांनी जारी केलं स्टेटमेंट, भाऊ फैजल खानचे सर्व आरोप फेटाळले
8
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
9
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
10
Video: अल्लू अर्जुनने विमानतळावर अधिकाऱ्यासमोर दाखवला माज; अखेर काढावाच लागला मास्क
11
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
12
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
13
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
14
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
15
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
16
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
17
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
18
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
19
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
20
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार

शेकडो प्रकल्पग्रस्त कुटुंबांना पुनर्वसनाची प्रतीक्षा!

By admin | Updated: April 19, 2017 01:40 IST

सहा वर्षांपासून काम रखडले; पाटबंधारे विभागाला व्याजापोटी लाखोंचा आर्थिक भुर्दंड

अकोला : बाळापूर तालुक्यातील शंभराच्यावर धरण प्रकल्पग्रस्त कुटुंबांचे मागील सहा वर्षांपासून पुनवर्सन झाले नसल्याने, या कुटुंबांची अवस्था बेघरासारखी झाली आहे. पुनर्वसन रखडल्याने पाटबंधारे विभागाला महिन्याला व्याजापोटी सात लाख रुपये याप्रमाणे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.बाळापूर तालुक्यातील कारंजा रमजानपूर गावाजवळ धरणाचे काम सुरू आहे. या धरणामुळे अंत्री मलकापूर व परिसरातील गावातील शंभराच्यावर कुटुंबे बाधित झाली आहेत. २००१ मध्ये या कुटुंबांचे पुनवर्सन करण्याचा प्रस्ताव पाटबंधारे विभागाने महसूल विभागाकडे पाठविला होता. यावर २०१५ मध्ये महसूल विभागाने प्राथमिक अधिसूचना जारी केली, तसेच नवीन भूसंपादन कायद्याप्रमाणे जिल्हा पुनर्वसन समितीने पुनर्वसन योजना जुलै २०१६ मध्ये मंजूर करू न अंतिम मान्यतेसाठी प्रकरण महसूल आयुक्त अमरावतीकडे पाठविण्यात आले. यातील काही कुटुंबांना वगळून १०३ कुटुंबांची योजना आयुक्तालयाने मंजूर केूली; परंतु या कुटुंबांना रक्कम देण्यासाठी शासनाकडून खुलासा मागवून प्रस्ताव सादर करण्याची नवी अट टाकण्यात आली. यानुसार मागील सहा महिन्यांपासून हा खुलासा मागविण्यात येत आहे; परंतु याबाबत शासनाकडून अद्याप कोणतही उत्तर मिळाले नाही. याबाबत मागील आठवड्यात येथील गावकऱ्यांनी मंत्रालयात धडक दिली; पण शासनाला हा प्रस्तावच मिळाला नसल्याचे वृत्त आहे.दरम्यान, या गावांचा संपादित होणाऱ्या मालमत्तेचा मोबदला अंदाजे सात कोटी रुपये आहे. पाटबंधारे विभागाला ही रक्कम द्यावी लागणार आहे. प्राथमिक अधिसूचनेपासून आजतागायत त्यावर वार्षिक १२ टक्के दराने व्याजाची आकारणी करण्यात येत आहे. म्हणजे मासिक एक टक्का याप्रमाणे प्रतिमहिना सात लाख रुपये व्याजाचा भुर्दंड पाटबंधारे विभागाला द्यावा लागणार आहे. जुलै २०१६ मध्ये आयुक्तालयाने ही मान्यता दिल असती, तर आतापर्यंत दहा महिन्यांचे ७० लाख रुपये वाचू शकले असते. जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावावर शासनाकडून खुलासा आला, तर उर्वरित कुटुंबांनादेखील स्वतंत्रपणे रक्कम देता येऊ शकते. नाहीतर ही कुटुंबं आर्बिट्रेशनमध्ये न्याय मागू शकतात, अशी परिस्थिती आहे. या सर्व गोंधळात मात्र प्रकल्पगस्त तद्वतच प्रकल्पाचा खर्च वाढत आहे. याबाबत प्रकल्पग्रस्तांनी धरणे आंदालने, उपोषणे केली; मात्र या यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याने प्रकल्पग्रस्तांवर बेघर होण्याची वेळ आली आहे.पुनर्वसनाची तयारी नवीन गावठानात केली जाणार आहे. त्यासाठी कलम १८ नुसार परवानगी हवी आहे. नवीन भूसंपादन कायद्याच्या संवैधानिक बाबी पूर्ण कराव्या लागणार आहेत. आम्ही पैस भरले आहेत.- विजय लोळे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, अकोला.