शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शेकडो हेक्टर सोयाबीन उगवले नाही; शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट!

By रवी दामोदर | Updated: July 19, 2023 13:55 IST

या वर्षी पाऊस लांबल्याने खरीप हंगामातील पेरण्यांना उशिरा सुरुवात झाली.

अकोला : जिल्ह्यात पेरणी सुरू असतानाच बियाणे उगविले नसल्याचे संकट शेतकऱ्यांपुढे उभे राहिले आहे. जिल्ह्यातील शेकडो हेक्टरवरील सोयाबीन बियाणे उगवले नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. सातही तालुक्यांतून बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारींचा ओघ वाढत असून, दि.१८ जुलैपर्यंत जिल्हा परिषद कृषी विभागाकडे शेतकऱ्यांच्या ५० लेखी तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी त्वरित भरपाई देण्याची मागणी तक्रारीतून केली आहे. यात सर्वाधिक तक्रारी ‘महाबीज’च्या बियाण्यांसंदर्भात असल्याचे समजते.

या वर्षी पाऊस लांबल्याने खरीप हंगामातील पेरण्यांना उशिरा सुरुवात झाली. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून सार्वत्रिक पाऊस झाल्याने पेरण्यांना वेग आला. आता खरिपाची पेरणीदेखील अंतिम टप्प्यावर असून, सोयाबीन पेरणीने सरासरीचा टक्का ओलांडला आहे. अशातच सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. यंदा काही शेतकऱ्यांनी महाबीज व अन्य कंपन्यांचे बियाणे खरेदी करून पेरणी केली. 

यामध्ये महाबीजच्या बियाण्यांची उगवण क्षमता दोन टक्क्यांपेक्षा कमी आढळल्याचे कृषी व पीकेव्हीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यातून दिसून आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधित शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

तालुकानिहाय तक्रारीपातूर - १९अकोला - ४तेल्हारा - ४बाळापूर - ६बार्शीटाकळी - १०मूर्तिजापूर -  ४अकोट - ३

सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार कृषी विभाग, पीकेव्हीचे अधिकारी यांचे पथक सदर प्लॉटचे पंचनामे करीत आहेत. उगवणक्षमता कमी आढळल्यास त्याच बियाण्यांचे आणखी प्लॉट तपासल्या जातात. बियाणे उगविले नसल्यास शेतकऱ्यांनी स्थानिक स्तरावर कृषी सहायक, तालुका कृषी अधिकारी किंवा तक्रार निवारण कक्षात भेट द्यावी.महेंद्र सालके, कृषी विकास अधिकारी, जि.प., अकोला

टॅग्स :Akolaअकोला