शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी शेकडो उद्योग धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 01:43 IST

अकोला : महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास  महामंडळच्या वसाहतीमधील ८९0 उद्योगांना पाणी पुरवठा करणारे जलसाठे कोरडे पडत असल्याने शेकडो  उद्योग बंद पडण्याची शक्यता आहे. धोक्यात सापडलेले  उद्योग वाचविण्यासाठी आता एमआयडीसी प्रशासनाने  परिसरातील विहिरी अधिग्रहणाच्या विचारात आहेत.

ठळक मुद्देपाणी-बाणी एमआयडीसीसाठी चार विहिरी अधिग्रहणाचा प्रस्ताव तीन महिनेच पुरेल कुंभारीचे पाणी!गिट्टी खदानमधील पाण्याचाही उपयोग

संजय खांडेकर। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास  महामंडळच्या वसाहतीमधील ८९0 उद्योगांना पाणी पुरवठा करणारे जलसाठे कोरडे पडत असल्याने शेकडो  उद्योग बंद पडण्याची शक्यता आहे. धोक्यात सापडलेले  उद्योग वाचविण्यासाठी आता एमआयडीसी प्रशासनाने  परिसरातील विहिरी अधिग्रहणाच्या विचारात आहेत.विदर्भातील अनेक जिल्ह्यात पुरेसा पाऊस नसल्याने  पाण्याची भीषण समस्या उग्र रूप धारण करीत आहे.  पावसाअभावी अकोल्यातील सर्वच जलसाठे कोरडेच  आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासोबत आता  उद्योगांनाही झळ सोसावी लागत आहे. औद्योगिक  वसाहतीमधील रासायनिक उद्योगांसाठी मोठय़ा प्रमाणा त पाण्याची आवश्यकता असते. अकोल्यात लेबेन,  टाटा रॅलीजसारख्या काही उद्योगांना पाण्याची नितांत  आवश्यकता असते. पाण्याचा पुरेसा साठा न  मिळाल्यास असे उद्योग बंद पडण्याची शक्यता असते.  उन्हाळ्य़ात जाणवेल अशी स्थिती अकोल्यात  पावसाळ्य़ातच निर्माण झाल्याने एमआयडीसी प्रशासन  चिंतातुर झाले आहेत. औद्योगिक वसाहतीमधील ८९0  उद्योगांना कधीकाळी कुंभारी तलावातूनच पाणी  मिळायचे. मात्र, उद्योगांसाठी राखीव ठेवलेल्या खांबोरा  प्रकल्पातून एप्रिलपासून पाणी दिले गेले. पावसाने दडी  मारल्याने, पाणी समस्या गंभीर झाली. त्यामुळे पिण्याचे  पाणी राखून ठेवण्याच्या दृष्टीने ३१ ऑगस्टपासून  खांबोरा प्रकल्पातून होणारा पाणीपुरवठा खंडित झाला.  त्यामुळे एमआयडीसी प्रशासनाने पुन्हा कुंभारी तलावा तून पाणी घेण्यास सुरुवात केली. मात्र, नोव्हेंबर १७  पर्यंंत पुरेल एवढाच जलसाठा या तलावात शिल्लक  आहे. नोव्हेंबरनंतर अकोल्यातील उद्योगांना जिवंत  ठेवणे कठीण झाले आहे. दोन दिवसाआधी  जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी घेतलेल्या  आढावा बैठकीत या बाबींवर सविस्तर चर्चा झाली.  अकोल्यातील उद्योगांना जिवंत ठेवण्यासाठी आता  काय नवी शक्कल लढविता येते, याकडे सर्वांंचे लक्ष  लागून आहे. जर पुरेशा पाण्याचा साठा उद्योजकांना  पुरविला गेला नाही, तर अकोल्यातील शेकडो उद्योग- कारखान्याला ताळे लागण्याची वेळ येऊ शकते. त्याचा  प्रभाव अकोल्यातील इतर जोडधंदे आणि  जनमाणसावरही होण्याची शक्यता आहे. जिल्हा  प्रशासनावर याआधी पावसाळ्य़ात पाण्याचे नियोजन  करण्याची वेळ कधी आली नाही. त्यामुळे यासाठी  भविष्यात आपत्कालीन बैठक बोलाविली जाण्याची  वेळही नाकारता येत नाही. अकोलेकरांची तहान   आणि उद्योगांना संजीवनी देण्यासाठी जिल्हा प्रशासन  ही पाणी समस्या कशी सोडविते, याकडे सर्वाचे लक्ष  लागून आहे.

गिट्टी खदानमधील पाण्याचाही उपयोगएमआयडीसी परिसरात अनेक ठिकाणी गिट्टी  खदानीमध्ये पाणी साचले आहे. अनेक दिवसांचे  साचलेले पाणी पिण्यायोग्य नसले, तरी बांधकाम आणि  इतर कामासाठी त्याचा उपयोग शक्य आहे. टँकरने हे  पाणी मिळविल्या जाऊ शकते. सोबतच एमआयडीसी तील हायड्रंट आणि इतर खासगी स्रोतावरही लक्ष केंद्रित  करण्याच्या दिशेनेही विचार सुरू आहे.

औद्योगिक वसाहत परिसरात भरपूर पाणी असलेल्या  चार विहिरी आहेत. यापैकी एक विहीर एमआयडीसीची  असून, इतर विहिरी खासगी आहेत. या चारही विहिरींचे  अधिग्रहण करून अकोल्यातील उद्योगांना जीवनदान  देण्याचा प्रयत्न आमचा आहे. उन्हाळ्य़ातही  उद्भवणार नाही, अशी स्थिती यंदा आहे. यासाठी  जिल्हाधिकारी यांच्याकडे अधिग्रहणाचा प्रस्ताव तयार  केला जातो आहे.- राहुल बन्सोड, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी,  अकोला.-