शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

पाण्याअभावी शेकडो उद्योग धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 01:43 IST

अकोला : महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास  महामंडळच्या वसाहतीमधील ८९0 उद्योगांना पाणी पुरवठा करणारे जलसाठे कोरडे पडत असल्याने शेकडो  उद्योग बंद पडण्याची शक्यता आहे. धोक्यात सापडलेले  उद्योग वाचविण्यासाठी आता एमआयडीसी प्रशासनाने  परिसरातील विहिरी अधिग्रहणाच्या विचारात आहेत.

ठळक मुद्देपाणी-बाणी एमआयडीसीसाठी चार विहिरी अधिग्रहणाचा प्रस्ताव तीन महिनेच पुरेल कुंभारीचे पाणी!गिट्टी खदानमधील पाण्याचाही उपयोग

संजय खांडेकर। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास  महामंडळच्या वसाहतीमधील ८९0 उद्योगांना पाणी पुरवठा करणारे जलसाठे कोरडे पडत असल्याने शेकडो  उद्योग बंद पडण्याची शक्यता आहे. धोक्यात सापडलेले  उद्योग वाचविण्यासाठी आता एमआयडीसी प्रशासनाने  परिसरातील विहिरी अधिग्रहणाच्या विचारात आहेत.विदर्भातील अनेक जिल्ह्यात पुरेसा पाऊस नसल्याने  पाण्याची भीषण समस्या उग्र रूप धारण करीत आहे.  पावसाअभावी अकोल्यातील सर्वच जलसाठे कोरडेच  आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासोबत आता  उद्योगांनाही झळ सोसावी लागत आहे. औद्योगिक  वसाहतीमधील रासायनिक उद्योगांसाठी मोठय़ा प्रमाणा त पाण्याची आवश्यकता असते. अकोल्यात लेबेन,  टाटा रॅलीजसारख्या काही उद्योगांना पाण्याची नितांत  आवश्यकता असते. पाण्याचा पुरेसा साठा न  मिळाल्यास असे उद्योग बंद पडण्याची शक्यता असते.  उन्हाळ्य़ात जाणवेल अशी स्थिती अकोल्यात  पावसाळ्य़ातच निर्माण झाल्याने एमआयडीसी प्रशासन  चिंतातुर झाले आहेत. औद्योगिक वसाहतीमधील ८९0  उद्योगांना कधीकाळी कुंभारी तलावातूनच पाणी  मिळायचे. मात्र, उद्योगांसाठी राखीव ठेवलेल्या खांबोरा  प्रकल्पातून एप्रिलपासून पाणी दिले गेले. पावसाने दडी  मारल्याने, पाणी समस्या गंभीर झाली. त्यामुळे पिण्याचे  पाणी राखून ठेवण्याच्या दृष्टीने ३१ ऑगस्टपासून  खांबोरा प्रकल्पातून होणारा पाणीपुरवठा खंडित झाला.  त्यामुळे एमआयडीसी प्रशासनाने पुन्हा कुंभारी तलावा तून पाणी घेण्यास सुरुवात केली. मात्र, नोव्हेंबर १७  पर्यंंत पुरेल एवढाच जलसाठा या तलावात शिल्लक  आहे. नोव्हेंबरनंतर अकोल्यातील उद्योगांना जिवंत  ठेवणे कठीण झाले आहे. दोन दिवसाआधी  जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी घेतलेल्या  आढावा बैठकीत या बाबींवर सविस्तर चर्चा झाली.  अकोल्यातील उद्योगांना जिवंत ठेवण्यासाठी आता  काय नवी शक्कल लढविता येते, याकडे सर्वांंचे लक्ष  लागून आहे. जर पुरेशा पाण्याचा साठा उद्योजकांना  पुरविला गेला नाही, तर अकोल्यातील शेकडो उद्योग- कारखान्याला ताळे लागण्याची वेळ येऊ शकते. त्याचा  प्रभाव अकोल्यातील इतर जोडधंदे आणि  जनमाणसावरही होण्याची शक्यता आहे. जिल्हा  प्रशासनावर याआधी पावसाळ्य़ात पाण्याचे नियोजन  करण्याची वेळ कधी आली नाही. त्यामुळे यासाठी  भविष्यात आपत्कालीन बैठक बोलाविली जाण्याची  वेळही नाकारता येत नाही. अकोलेकरांची तहान   आणि उद्योगांना संजीवनी देण्यासाठी जिल्हा प्रशासन  ही पाणी समस्या कशी सोडविते, याकडे सर्वाचे लक्ष  लागून आहे.

गिट्टी खदानमधील पाण्याचाही उपयोगएमआयडीसी परिसरात अनेक ठिकाणी गिट्टी  खदानीमध्ये पाणी साचले आहे. अनेक दिवसांचे  साचलेले पाणी पिण्यायोग्य नसले, तरी बांधकाम आणि  इतर कामासाठी त्याचा उपयोग शक्य आहे. टँकरने हे  पाणी मिळविल्या जाऊ शकते. सोबतच एमआयडीसी तील हायड्रंट आणि इतर खासगी स्रोतावरही लक्ष केंद्रित  करण्याच्या दिशेनेही विचार सुरू आहे.

औद्योगिक वसाहत परिसरात भरपूर पाणी असलेल्या  चार विहिरी आहेत. यापैकी एक विहीर एमआयडीसीची  असून, इतर विहिरी खासगी आहेत. या चारही विहिरींचे  अधिग्रहण करून अकोल्यातील उद्योगांना जीवनदान  देण्याचा प्रयत्न आमचा आहे. उन्हाळ्य़ातही  उद्भवणार नाही, अशी स्थिती यंदा आहे. यासाठी  जिल्हाधिकारी यांच्याकडे अधिग्रहणाचा प्रस्ताव तयार  केला जातो आहे.- राहुल बन्सोड, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी,  अकोला.-