शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

पाण्याअभावी शेकडो उद्योग धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 01:43 IST

अकोला : महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास  महामंडळच्या वसाहतीमधील ८९0 उद्योगांना पाणी पुरवठा करणारे जलसाठे कोरडे पडत असल्याने शेकडो  उद्योग बंद पडण्याची शक्यता आहे. धोक्यात सापडलेले  उद्योग वाचविण्यासाठी आता एमआयडीसी प्रशासनाने  परिसरातील विहिरी अधिग्रहणाच्या विचारात आहेत.

ठळक मुद्देपाणी-बाणी एमआयडीसीसाठी चार विहिरी अधिग्रहणाचा प्रस्ताव तीन महिनेच पुरेल कुंभारीचे पाणी!गिट्टी खदानमधील पाण्याचाही उपयोग

संजय खांडेकर। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास  महामंडळच्या वसाहतीमधील ८९0 उद्योगांना पाणी पुरवठा करणारे जलसाठे कोरडे पडत असल्याने शेकडो  उद्योग बंद पडण्याची शक्यता आहे. धोक्यात सापडलेले  उद्योग वाचविण्यासाठी आता एमआयडीसी प्रशासनाने  परिसरातील विहिरी अधिग्रहणाच्या विचारात आहेत.विदर्भातील अनेक जिल्ह्यात पुरेसा पाऊस नसल्याने  पाण्याची भीषण समस्या उग्र रूप धारण करीत आहे.  पावसाअभावी अकोल्यातील सर्वच जलसाठे कोरडेच  आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासोबत आता  उद्योगांनाही झळ सोसावी लागत आहे. औद्योगिक  वसाहतीमधील रासायनिक उद्योगांसाठी मोठय़ा प्रमाणा त पाण्याची आवश्यकता असते. अकोल्यात लेबेन,  टाटा रॅलीजसारख्या काही उद्योगांना पाण्याची नितांत  आवश्यकता असते. पाण्याचा पुरेसा साठा न  मिळाल्यास असे उद्योग बंद पडण्याची शक्यता असते.  उन्हाळ्य़ात जाणवेल अशी स्थिती अकोल्यात  पावसाळ्य़ातच निर्माण झाल्याने एमआयडीसी प्रशासन  चिंतातुर झाले आहेत. औद्योगिक वसाहतीमधील ८९0  उद्योगांना कधीकाळी कुंभारी तलावातूनच पाणी  मिळायचे. मात्र, उद्योगांसाठी राखीव ठेवलेल्या खांबोरा  प्रकल्पातून एप्रिलपासून पाणी दिले गेले. पावसाने दडी  मारल्याने, पाणी समस्या गंभीर झाली. त्यामुळे पिण्याचे  पाणी राखून ठेवण्याच्या दृष्टीने ३१ ऑगस्टपासून  खांबोरा प्रकल्पातून होणारा पाणीपुरवठा खंडित झाला.  त्यामुळे एमआयडीसी प्रशासनाने पुन्हा कुंभारी तलावा तून पाणी घेण्यास सुरुवात केली. मात्र, नोव्हेंबर १७  पर्यंंत पुरेल एवढाच जलसाठा या तलावात शिल्लक  आहे. नोव्हेंबरनंतर अकोल्यातील उद्योगांना जिवंत  ठेवणे कठीण झाले आहे. दोन दिवसाआधी  जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी घेतलेल्या  आढावा बैठकीत या बाबींवर सविस्तर चर्चा झाली.  अकोल्यातील उद्योगांना जिवंत ठेवण्यासाठी आता  काय नवी शक्कल लढविता येते, याकडे सर्वांंचे लक्ष  लागून आहे. जर पुरेशा पाण्याचा साठा उद्योजकांना  पुरविला गेला नाही, तर अकोल्यातील शेकडो उद्योग- कारखान्याला ताळे लागण्याची वेळ येऊ शकते. त्याचा  प्रभाव अकोल्यातील इतर जोडधंदे आणि  जनमाणसावरही होण्याची शक्यता आहे. जिल्हा  प्रशासनावर याआधी पावसाळ्य़ात पाण्याचे नियोजन  करण्याची वेळ कधी आली नाही. त्यामुळे यासाठी  भविष्यात आपत्कालीन बैठक बोलाविली जाण्याची  वेळही नाकारता येत नाही. अकोलेकरांची तहान   आणि उद्योगांना संजीवनी देण्यासाठी जिल्हा प्रशासन  ही पाणी समस्या कशी सोडविते, याकडे सर्वाचे लक्ष  लागून आहे.

गिट्टी खदानमधील पाण्याचाही उपयोगएमआयडीसी परिसरात अनेक ठिकाणी गिट्टी  खदानीमध्ये पाणी साचले आहे. अनेक दिवसांचे  साचलेले पाणी पिण्यायोग्य नसले, तरी बांधकाम आणि  इतर कामासाठी त्याचा उपयोग शक्य आहे. टँकरने हे  पाणी मिळविल्या जाऊ शकते. सोबतच एमआयडीसी तील हायड्रंट आणि इतर खासगी स्रोतावरही लक्ष केंद्रित  करण्याच्या दिशेनेही विचार सुरू आहे.

औद्योगिक वसाहत परिसरात भरपूर पाणी असलेल्या  चार विहिरी आहेत. यापैकी एक विहीर एमआयडीसीची  असून, इतर विहिरी खासगी आहेत. या चारही विहिरींचे  अधिग्रहण करून अकोल्यातील उद्योगांना जीवनदान  देण्याचा प्रयत्न आमचा आहे. उन्हाळ्य़ातही  उद्भवणार नाही, अशी स्थिती यंदा आहे. यासाठी  जिल्हाधिकारी यांच्याकडे अधिग्रहणाचा प्रस्ताव तयार  केला जातो आहे.- राहुल बन्सोड, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी,  अकोला.-