शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

HSC Result : अकोला जिल्ह्याचा निकाल ९९.२६: जिल्ह्यातून मुली आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2021 18:25 IST

HSC Result: पहिल्यांदाच बारावीच्या निकालात जिल्ह्याने ९९.२६ टक्क्यांवर झेप घेतली आहे.

पहिल्यांदाच बारावीत जिल्ह्याची ९९ टक्क्यांवर झेप!अकोला: यंदा कोरोनामुळे बारावीची परीक्षा रद्द करण्यात आल्यामुळे मूल्यमापन कार्यपद्धती व दहावीत सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचे सरासरी गुण, अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण व बारावीतील अंतर्गत गुणांच्या आधारे मंगळवारी दुपारी ऑनलाइन निकाल जाहिर करण्यात आला. पहिल्यांदाच बारावीच्या निकालात जिल्ह्याने ९९.२६ टक्क्यांवर झेप घेतली आहे. अपेक्षेप्रमाणे यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा बारावीची परीक्षा रद्द झाली. परंतु परीक्षेसाठी जिल्ह्यातून १२ हजार २१८ मुले आणि ११ हजार २२ मुलींनी असे एकूण २३ हजार २४० विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. मंगळवारी दुपारी ऑनलाईन निकाल जाहिर झाला. निकालामध्ये जिल्ह्याचा प्रथमच एकूण निकाल ९९.२६ टक्के लागला असून, १२ हजार १०१ मुले व १० हजार ९६९ मुली असे एकूण २३ हजार ७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातून केवळ १७० विद्यार्थीच बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण झाले आहेत. मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९९.०४ आहे तर मुलींची टक्केवारी ९९.५१ टक्के आहे.

 

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालAkolaअकोलाEducation Sectorशिक्षण क्षेत्र