शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

दररोज २६३० चाचण्यांचे उद्दिष्ट पूर्ण कसे होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 10:42 IST

Akola Corona News २,६३० चाचण्यांचे उद्दिष्ट देण्यात आले; मात्र प्रत्यक्षात केवळ १९ टक्केच चाचण्या होत आहेत.

अकाेला: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला चाचण्यांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार अकोला जिल्ह्याला २,६३० चाचण्यांचे उद्दिष्ट देण्यात आले; मात्र प्रत्यक्षात केवळ १९ टक्केच चाचण्या होत असल्याचे वास्तव आहे. अशा परिस्थितीत कोविड चाचण्यांचे दररोजचे उद्दिष्ट पूर्ण कसे होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्यात दररोज जवळपास दीड लाख चाचण्या करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाच्या सचिवांनी सर्व जिल्हे व महापालिकांना दिले आहे. या उद्दिष्टांपैकी ६५ टक्के चाचण्या आरटीपीसीआर आणि २५ टक्के चाचण्या ॲन्टिजन करण्यास सांगितले आहे. त्यानुसार, अकोला जिल्ह्याला २,६३० चाचण्यांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे; मात्र प्रत्यक्षात दररोज जवळपास ५०० चाचण्या केल्या जात असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या केवळ १९ टक्के आहे. जिल्ह्यातील अनेक भागात नागरिकांची उदासीनता असल्याचे दिसून, येत आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास चाचण्यांचे उद्दिष्ट पूर्ण कसे होणार, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.

दररोज चाचण्या कराव्या लागणार - २,६३०

सध्या दररोज चाचण्या होत आहेत. - ५००

 

चाचण्यांचे उद्दिष्ट पूर्ण करणे शक्य

जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव राखण्यासाठी आवश्यक प्रयत्न केले जात आहेत; मात्र कोरोनाच्या भीतीने अनेक जण चाचण्या करण्यास टाळत असल्याचे समोर आले आहे. नागरिकांमध्ये चाचणीविषयी असलेली भीती घालविल्यास चाचण्यांचे उद्दिष्ट पूर्ण करणे शक्य आहे.

काेरोनाला हरविण्यासाठी आराेग्य विभाग सर्वच स्तरावर प्रयत्न करत आहे; मात्र अनेक ठिकाणी नागरिकांकडून चाचणीला नकार देत आहेत. ॲन्टिजनपेक्षा आरटीपीसीआर चाचण्यांवर अधिक भर आहे. चाचण्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आरोग्य विभागाकडून आवश्यक प्रयत्न केले जात आहेत.

- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या