शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

६८ गाव पाणीपुरवठा योजना मंजूर कशी? मूळ कागदपत्रे न्यायालयात सादर करा

By राजेश शेगोकार | Updated: February 28, 2023 18:53 IST

शासनाला नाेटीस : उच्च न्यायालय तपासणार निर्णय प्रक्रिया

राजेश शेगाेकार

अकोला : बाळापूर मतदारसंघातील ६९ गाव पाणीपुरवठा योजनेला मान्यता दिल्याविरुद्ध तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली असून, त्याची साेमवार २७ फेब्रुवारी राेजी सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने कवठा बॅरेजमध्ये पानी उपलब्ध असल्याचा प्रस्ताव असताना आणि कवठा हे गाव सदर ६८ गाव पाणीपुरवठा योजनेत समाविष्ट असतानाही सदर गावांना ३० किलो मीटरपेक्षा दूर असलेल्या वान धरणावरून याेजना कशी मंजूर झाली, याबाबत प्रश्न उपस्थित करून शासनाला या याेजनेच्या अनुषंगाने सर्व कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

वान प्रकल्प हा पूर्णतः सिंचनासाठी उभारलेला असताना अकोट, जळगाव जामोद, तेल्हारा, शेगाव या शहरांना, तसेच वेगवेगळ्या पाणीपुरवठा योजनेद्वारे पिण्याचे पाण्याचे आरक्षण दिले. त्यामुळे १८ हजार हेक्टर सिंचन क्षमता कमी होऊन ४ हजार हेक्टर एवढी कमी झाली, अकोला शहर अमृत पाणीपुरवठा योजना तूर्तास स्थगित आहे. तरीही नव्याने बाळापूर मतदारसंघातील ६९ गाव पाणीपुरवठा योजनेला जलसंपदा विभागाने ३.३५ दलघमी पाण्याची मान्यता दिली. या याेजनेत बाळापूर मतदारसंघातील ६८ गावांचा पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव बाळापूर तालुक्यातील कवठा बॅरेजवरून संपूर्ण तपासणी करून यंत्रणेद्वारा मंजुरीकरिता पाठविला असता तो पुढे पाठविण्यात आला नाही. मात्र आर्थिकदृष्टीने खर्चाचे असताना ६८ गावांसाठीची योजना तेल्हारा तालुक्यातील वान प्रकल्पावरून मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे  शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.शेतकऱ्यांच्या बाजूने वरिष्ठ वकील ॲड. मुकेश समर्थ आणि ॲड. प्रदीप क्षीरसागर काम पहात आहे

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणी