शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

आणखी किती शेतकर्‍यांच्या रक्ताचा नैवेद्य हवा - रविकांत तुपकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 02:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : तोडा, फोडा आणि राज्य करा, ही भाजप सरकारची नीती आहे.  उसाला भाव मिळण्यासाठी खा. राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनात ऊस उत्पादक शे तकर्‍यांचे आंदोलन झाले. लाख, दीडलाख शेतकरी आंदोलनात सहभागी  झाले. गोळीबार झाला. शेतकरी जखमी झाले. तेव्हा कुठे २५५0 रुपये  िक्वंटलप्रमाणे उसाची खरेदी सुरू झाली. विदर्भात कापूस ...

ठळक मुद्देरविकांत तुपकर यांचा शासनाला सवाल कापूस उत्पादक शेतकर्‍यांनी पेटून उठण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : तोडा, फोडा आणि राज्य करा, ही भाजप सरकारची नीती आहे.  उसाला भाव मिळण्यासाठी खा. राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनात ऊस उत्पादक शे तकर्‍यांचे आंदोलन झाले. लाख, दीडलाख शेतकरी आंदोलनात सहभागी  झाले. गोळीबार झाला. शेतकरी जखमी झाले. तेव्हा कुठे २५५0 रुपये  िक्वंटलप्रमाणे उसाची खरेदी सुरू झाली. विदर्भात कापूस मोठय़ा प्रमाणात पिक तो; परंतु कापसाला भाव नाही. त्यासाठी आणखी किती शेतकर्‍यांच्या रक्ताचा  नैवेद्य शासनाला द्यावा, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते  रविकांत तुपकर यांनी केला. 

शेतकरी जागर मंचातर्फे आयोजित कासोधा (कापूस, सोयाबीन, धान) परिषदे त ते बोलत होते. तुपकर म्हणाले, की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,  गाडगेबाबांच्या विचारांनी प. महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठतो.  मग विदर्भातील कापूस उत्पादक शेतकरी पेटून का उठत नाही. ऊस परिषदेला  दीड लाख शेतकरी जमतात; परंतु कासोधा परिषदेला कापूस, सोयाबीन उत् पादक शेतकरी येत नाही. याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आणि सरसकट  कर्जमाफी देण्याचे वचन भाजप सरकारने दिले होते; परंतु त्यात ‘तत्त्वत:  कर्जमाफी’ असा शब्द घालून शेतकर्‍यांची फसवणूक केली, असा आरोप  करीत तुपकर यांनी, पंतप्रधान मोदी हिटलरसारखे वागत आहेत. नोटबंदीमुळे  ३६00 कोटी रुपयांचे बँकांचे नुकसान केले. तसेच १५ लाख लोकांना  नोकर्‍या गमवाव्या लागल्या. भाजपने उद्योजक अदानी, अंबानी, मल्ल्यांचे  अब्जावधी रुपयांचे कर्ज माफ केले आणि आमच्या शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचे  अर्ज भरण्यासाठी पत्नीसह अंगठय़ाचे ठसे घेतले जातात. यावरून मोदी व  फडणवीस सरकार शेतकर्‍यांचे कसे शोषण करते, हे दिसून येते, असेही  रवीकांत तुपकर यांनी स्पष्ट केले. कासोधा परिषदेमध्ये गजानन अमदाबादकर, तात्या कृपाळ, जि.प. सदस्य  सम्राट डोंगरदिवे, सय्यद वासिफ, मनोज तायडे, प्रिया लोडम, चंद्रकांत  डोईफोडे, कपिल ढोके, ज्ञानेश्‍वर सुलताने, कृष्णा अंधारे, अश्‍विनी देशमुख  आदींची भाषणे झाली. कासोधा परिषदेमध्ये एकूण नऊ ठराव मांडण्यात आले.  या ठरावाचे सुचक व अनुमोदक म्हणून ज्ञानेश्‍वर गावंडे, शिवा टेके, रवी  पाटील अरबट, केदार बकाल, प्रमोद पागृत, विजय देशमुख, दिनकर वाघ,  दिलीप मोहोड, भीमा जयस्वाल, शेख अन्सार, सुनील गोंडचवर, टिना  देशमुख, प्रशांत नागे आदी होते. 

कापूस आंदोलनाची ठिणगी पेटवा - धोंडगे१९८६ मध्ये अकोल्यात कापूस परिषद झाली होती. त्यावेळी प्रखर आंदोलन  पेटले. त्या आंदोलनाची ठिणगी आणखी पेटविण्याची गरज असल्याचे शेतकरी  नेते माजी आ. शंकरअण्णा धोंडगे यांनी सांगत, आता रडण्यापेक्षा लढण्याची  गरज आहे. लढल्याशिवाय शासन काही पदरात टाकणार नाही. शासन शे तकर्‍यांसोबत आकसपूर्ण वागत आहे. त्यामुळे शेती आणि शेतकर्‍यांच्या अस् ितत्वाची चिंता वाटत आहे. मुख्यमंत्री, कृषिमंत्री, अर्थमंत्री, ऊर्जामंत्री विदर्भा तील असूनही येथील शेतकर्‍यांवर अन्याय होतो. त्यामुळे हे राज्यकर्ते नव्हे, तर  शोषणकर्ते असल्याचा आरोप शंकरअण्णा धोंडगे यांनी केला.

सिन्हा यांनी शेतकर्‍याच्या घरी घेतला खिचडीचा आस्वादकासोधा परिषदेला अकोल्यात आलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा  यांनी उगवा येथील शेतकरी केशवराव देशमुख यांच्या घरी जेवणाचा आस्वाद  घेतला. परिषद संपल्यानंतर सिन्हा यांनी शेतकर्‍याच्या घरी जेवणाची इच्छा  दर्शवली. त्यांनी उगवा येथे देशमुख यांच्या घरी खिचडीचा आस्वाद घेतला. शे तकर्‍याच्या घरी जाऊन जेवल्याने खूप समाधान वाटल्याचे ते म्हणाले.

निवडणुकीसाठी संसदेचे सत्र पुढे ढकलणे निंदनीयगुजरात निवडणुकीला मोदी सरकार एवढं महत्त्व देत आहे, की या सरकारने  निवडणुकीच्या प्रचारात खोळंबा निर्माण होऊ नये, यासाठी संसदेचे हिवाळी  अधिवेशन पुढे ढकलल्याचा आरोप माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी  केला. यावरून मोदी सरकारची मानसिकता लक्षात घेतली पाहिजे.

टॅग्स :Ravikant Tupkarरविकांत तुपकरAkola cityअकोला शहर