शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कसे भरणार धरण...? काटेपूर्णा धरणावरील १२ प्रकल्प कोरडेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 14:17 IST

धरणाच्या वरील प्रकल्प तुडुंब पाण्याने भरतील, तेव्हाच काटेपूर्णा धरणात पाणी संकलन होईल.

ठळक मुद्देवाशिम जिल्ह्यातील काटा येथून काटेपूर्णा धरणाचे पानलोट क्षेत्र सुरू होते. काटापासून या क्षेत्रात १२ छोटे-मोेठे प्रकल्प आहेत. हे प्रकल्प आणखी कोरडेच आहेत.

- राजरत्न सिरसाट  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : काटेपूर्णा धरणाच्या पानलोट क्षेत्रात अद्याप दमदार पाऊस पडला नसल्याने जलसाठ्यात अद्याप वाढ झाली नाही. या धरणाच्या वर छोटे-मोठे १२ प्रकल्प आहेत. हे प्रकल्पच कोरडे असल्याने काटेपूर्णा धरण पाण्याने भरणार कसे, असा प्रश्न उभा ठाकला आहे. काटेपूर्णा धरणात गुरुवार सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत ३.६८ टक्के एवढाच जलसाठा उपलब्ध होता. या पृष्ठभूमीवर प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची पूर्वतयारी करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात २३ जून, २६ जुलै व ७ आॅगस्ट असा तीनच दिवस बऱ्यापैकी पाऊस पडला. काटेपूर्णा धरणाच्या साठ्यात वाढ होण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात जोरदार पर्जन्यवृष्टीची गरज आहे; परंतु असा पाऊस झालाच नाही. वाशिम जिल्ह्यातील काटा येथून काटेपूर्णा धरणाचे पानलोट क्षेत्र सुरू होते. काटापासून या क्षेत्रात १२ छोटे-मोेठे प्रकल्प आहेत. हे प्रकल्प आणखी कोरडेच आहेत. काटानंतर पहिलाच सुकांडा प्रकल्प आहे. या प्रकल्पाची जलाशय पातळी २.३७ दशलक्ष घनमीटर आहे. त्यानंतरचा कुºहाळ प्रकल्प आहे. या प्रकल्पाची पातळी ३.०० दलघमी आहे.

तसेच कोल्ही प्रकल्प ५.२७ दलघमी, रिधोरा १.०, मसला १.६३, खडकी २.०७, मालेगाव २.०४, बोरगाव १.१४, कुत्तरडोह २.०१, डव्हा संग्राहक तलाव १.४४, सुदी संग्राहक तलाव १.४७ तर चाकातीर्थ सर्वात जास्त ९.३६ दलघमी जलसाठा असलेला प्रकल्प आहे. सर्व प्रकल्प आणखी कोरडेच असल्याने काटेपूर्णा धरणाच्या पानलोट क्षेत्रात जो काही पाऊस पडला, तो अद्याप काटेपूर्णा धरणात पोहोेचलाच नाही.यावर्षी आॅगस्ट महिन्याचा पहिला आठवडा संपला तरी दमदार पाऊस झाला नाही. दमदार पाऊस  पडला तरी अगोदर धरणाच्या वरील प्रकल्प तुडुंब पाण्याने भरतील, तेव्हाच काटेपूर्णा धरणात पाणी संकलन होईल. त्यामुळे यावर्षीचे चित्र भीषण आहे. असे असले तरी आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

काटेपूर्णा धरणावरील प्रकल्प यावर्षी अद्याप कोेरडेच आहेत. हे प्रकल्प पाण्याने भरल्यानंतरच काटेपूर्णा धरणात जलसंचय होईल. पाऊस येईल, अशी अपेक्षा असून, धरणात जलसाठा उपलब्ध होईल. आता जे पाणी उपलब्ध आहे, त्याचे मात्र काळजीपूर्वक नियोजन करणे गरजेचे आहे.-चिन्मय वाकोडे,कार्यकारी अभियंता,पाटबंधारे विभाग, अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरण