शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कसे भरणार धरण...? काटेपूर्णा धरणावरील १२ प्रकल्प कोरडेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 14:17 IST

धरणाच्या वरील प्रकल्प तुडुंब पाण्याने भरतील, तेव्हाच काटेपूर्णा धरणात पाणी संकलन होईल.

ठळक मुद्देवाशिम जिल्ह्यातील काटा येथून काटेपूर्णा धरणाचे पानलोट क्षेत्र सुरू होते. काटापासून या क्षेत्रात १२ छोटे-मोेठे प्रकल्प आहेत. हे प्रकल्प आणखी कोरडेच आहेत.

- राजरत्न सिरसाट  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : काटेपूर्णा धरणाच्या पानलोट क्षेत्रात अद्याप दमदार पाऊस पडला नसल्याने जलसाठ्यात अद्याप वाढ झाली नाही. या धरणाच्या वर छोटे-मोठे १२ प्रकल्प आहेत. हे प्रकल्पच कोरडे असल्याने काटेपूर्णा धरण पाण्याने भरणार कसे, असा प्रश्न उभा ठाकला आहे. काटेपूर्णा धरणात गुरुवार सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत ३.६८ टक्के एवढाच जलसाठा उपलब्ध होता. या पृष्ठभूमीवर प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची पूर्वतयारी करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात २३ जून, २६ जुलै व ७ आॅगस्ट असा तीनच दिवस बऱ्यापैकी पाऊस पडला. काटेपूर्णा धरणाच्या साठ्यात वाढ होण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात जोरदार पर्जन्यवृष्टीची गरज आहे; परंतु असा पाऊस झालाच नाही. वाशिम जिल्ह्यातील काटा येथून काटेपूर्णा धरणाचे पानलोट क्षेत्र सुरू होते. काटापासून या क्षेत्रात १२ छोटे-मोेठे प्रकल्प आहेत. हे प्रकल्प आणखी कोरडेच आहेत. काटानंतर पहिलाच सुकांडा प्रकल्प आहे. या प्रकल्पाची जलाशय पातळी २.३७ दशलक्ष घनमीटर आहे. त्यानंतरचा कुºहाळ प्रकल्प आहे. या प्रकल्पाची पातळी ३.०० दलघमी आहे.

तसेच कोल्ही प्रकल्प ५.२७ दलघमी, रिधोरा १.०, मसला १.६३, खडकी २.०७, मालेगाव २.०४, बोरगाव १.१४, कुत्तरडोह २.०१, डव्हा संग्राहक तलाव १.४४, सुदी संग्राहक तलाव १.४७ तर चाकातीर्थ सर्वात जास्त ९.३६ दलघमी जलसाठा असलेला प्रकल्प आहे. सर्व प्रकल्प आणखी कोरडेच असल्याने काटेपूर्णा धरणाच्या पानलोट क्षेत्रात जो काही पाऊस पडला, तो अद्याप काटेपूर्णा धरणात पोहोेचलाच नाही.यावर्षी आॅगस्ट महिन्याचा पहिला आठवडा संपला तरी दमदार पाऊस झाला नाही. दमदार पाऊस  पडला तरी अगोदर धरणाच्या वरील प्रकल्प तुडुंब पाण्याने भरतील, तेव्हाच काटेपूर्णा धरणात पाणी संकलन होईल. त्यामुळे यावर्षीचे चित्र भीषण आहे. असे असले तरी आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

काटेपूर्णा धरणावरील प्रकल्प यावर्षी अद्याप कोेरडेच आहेत. हे प्रकल्प पाण्याने भरल्यानंतरच काटेपूर्णा धरणात जलसंचय होईल. पाऊस येईल, अशी अपेक्षा असून, धरणात जलसाठा उपलब्ध होईल. आता जे पाणी उपलब्ध आहे, त्याचे मात्र काळजीपूर्वक नियोजन करणे गरजेचे आहे.-चिन्मय वाकोडे,कार्यकारी अभियंता,पाटबंधारे विभाग, अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरण