शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
2
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
3
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
4
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
5
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
6
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
7
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
8
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
9
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
10
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
11
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
12
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
13
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
14
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
15
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
16
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
17
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
18
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
19
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
20
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर

बेताल वाहतुकीला शिस्त लावायची कुणी?

By admin | Updated: July 5, 2017 01:22 IST

सुविधाही हव्यात : पोलीस कारवाईचा प्रभाव तात्कालिक

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवरील बेताल वाहतुकीमुळे दररोज अपघाताच्या घटना घडत आहेत. दिवसेंदिवस रस्त्यांवर वाहनांची भरमसाट गर्दी वाढत असल्याने, वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे बेताल वाहतुकीला शिस्त लावायची कुणी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीस वाहनचालकांवर कारवाई करतात; परंतु पोलिसांच्या कारवाईचा प्रभाव तात्कालिक असल्याने, पुन्हा ‘जैसे थे’ स्थिती निर्माण होते. वाहन चालविताना मोबाइल फोनवर बोलणे, ट्रिपलसिट वाहन चालविणे, सिग्नल तोडून भरधाव जाणे; वाहतूक नियमांचे नेहमीच होणारे अशा प्रकारचे उल्लंघन नित्याचे झाले आहे. नियमांचे सर्रास होणारे उल्लंघन वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या जीवावर बेतते. भरचौकात उभे राहणारे आॅटोरिक्षा, रस्त्यांवरील उभी केलेली वाहने, वाढते अतिक्रमण, तसेच फेरीवाल्यांमुळेही वाहतुकीची कोंडी होत आहे. अतिक्रमण हटविण्यासाठी मनपा उदासीन आहे. वाहतूक पोलीस कारवाई करतात; परंतु त्याचा वाहनचालकांवर प्रभावी परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहे. वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी पोलिसांनी नियोजन करून वाहनचालकांवर कडक कारवाई करून वठणीवर आणावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. उपप्रादेशिक परिवहन विभाग व शहर वाहतूक पोलिसांकडून नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागृतीसाठी रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येते; मात्र या अभियानाचा फायदा होत नाही.वाहतूक नियमांचे पालन करणे हे आपल्याच सुरक्षेसाठी आवश्यक आहे, ही जाणीव वाहनचालक आणि पादचाऱ्यांमध्ये होणे आवश्यक आहे.दुचाकी पार्किंगची सुविधाच नाहीशहरात पुरेसे वाहनतळ नसल्यामुळेच शहराच्या वाहतुकीची कोंडी होत आहे़ महापालिकेने काही वर्षांपासून वाहनतळ कंत्राट पद्धतीने देणे सुरू केले होते. या वाहनतळांचे कंत्राट निविदा बोलावून दिले जाते; परंतु काही वर्षांमध्ये वाहनतळ नावापुरतेच उरले आहेत़ दोन ते तीन वाहनतळ असूनही कोणी वाहनतळावर वाहने ठेवतच नाहीत़ नागरिकांनादेखील वाहनतळांची सवय नसल्यामुळे वाटेल तिथे वाहने उभी केली जातात आणि त्याचा त्रास रहदारी करणाऱ्यांना होतो़जड वाहनांचे अनधिकृत ‘पार्किंग झोन’शहरात नियमबाह्यपणे जड वाहने प्रवेश करतात. ट्रक कुठेही रस्त्यांवर उभे करण्यात येत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. फतेह चौक ते दामले चौक, बाळापूर रोड-भांडपुरा, अकोट स्टँड, रेल्वेस्थानक परिसरासत ट्रक मोठ्या प्रमाणात उभे असतात. जड वाहने उभी करण्यासाठी एमआयडीसी परिसरात जागा उपलब्ध (ट्रान्सपोर्टनगर) करून देण्यात आली आहे; मात्र या ठिकाणी कोणीच जड वाहने उभी राहत नाहीत. जड वाहने उभी करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मोहीम राबविण्याची गरज आहे. जीव महत्त्वाचा की वेळ? सिग्नल तोडून चौकातून भरधाव जाणे, ही तर फॅशनच झाली आहे. सिग्नल तोडून वाहन दामटण्याचे प्रमाण युवक, युवतींमध्ये सर्वाधिक आहे. सिग्नलवर काही मिनिटे थांबण्यास वाहनचालकांजवळ वेळ नसतो. सिग्नलवरील वेळ पूर्ण होण्याच्या आधीच सुसाट वाहने पळविली जातात. यामुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वाहनचालकांनी जीव महत्त्वाचा की वेळ, हे ठरवावे. ट्रिपलसिट वाहन चालविणे आमचा हक्कचट्रिपलसिट वाहन चालविण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. पोलिसांच्या डोळ्यांदेखत अनेक जण ट्रिपलसिट दुचाकी दामटतात. तरीही पोलीस कारवाईकडे कानाडोळा करतात. पोलिसांनी अडविले तर कोणत्या राजकीय नेत्याला, पोलीस अधिकाऱ्याची ओळख सांगून, फोन करून कारवाई टाळण्याचा प्रयत्न केला जातो. वाहतूक पोलीसही उगाच वाद नको म्हणून ट्रिपलसिट वाहन चालविणाऱ्यास सोडून देतात. उपाययोजना केल्यास बदल शक्येशहरातील वाहतूक व्यवस्था किती बेशिस्त झाली आहे, हे रस्त्यांवर वाहन चालविताना कळते. वाहतूक पोलीस दिवस निघाला की त्यांचे ‘टार्गेट’ पूर्ण करण्यात मग्न असतात. कुणीही, कुठूनही मनात येईल तशा गाड्या घुसवतो. प्रत्येकाच्या मागे विलक्षण ‘मरण’घाई. असते. या बेताल वाहतुकीवर उपाय आहेत; त्यासाठी प्रशासनाला फारसा खर्च येईल, असेही नाही. शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर दोन्ही बाजूने पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे पट्टे, झेब्रा क्रॉसिंग, पार्किंग झोन, वाहतूक नियमांच्या माहितीचे फलक लावण्याची गरज आहे. आम्ही काम करतो; परंतु आमच्यासमोर काही समस्या आहेत. सिग्नल व्यवस्था नाही. दिशादर्शक फलक, पार्किंगची सुविधा नाही. अनेक रोडचे बांधकाम अपूर्ण आहे. फुटपाथ नाहीत. दररोज अतिक्रमण काढायला हवे. आॅटोरिक्षा स्टॉपसाठी जागा नाही. रस्त्यांवर गुरे-ढोरे फिरतात. मनपाने सहकार्य केल्यास शहराची बेताल वाहतूक ताळ्यावर आणण्यास वेळ लागणार नाही. गत सहा महिन्यांमध्ये वाहनचालकांवर कारवाई करून ७0 लाख रुपयांचा दंड वसूल केला. - विलास पाटील, पोलीस निरीक्षक वाहतूक नियंत्रण शाखा