शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

वाळू टंचाईत अडकली घरकुल, जलसंधारणाची कामे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 12:45 IST

अकोला: वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया रखडल्याने, वाळू टंचाईत जिल्ह्यातील घरकुल, जलसंधारणाची कामे अडकली असून, खासगी बांधकामेही प्रभावित झाली आहेत.

- संतोष येलकरअकोला: वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया रखडल्याने, वाळू टंचाईत जिल्ह्यातील घरकुल, जलसंधारणाची कामे अडकली असून, खासगी बांधकामेही प्रभावित झाली आहेत. त्यामुळे वाळू घाटांचा लिलाव होणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.राष्ट्रीय हरित लवादाच्या ११ डिसेंबर २०१८ रोजीच्या आदेशानुसार वाळू घाटांसंदर्भात पर्यावरण विभागाने गत १५ जानेवारी २०१६ रोजी काढलेली अधिसूचना निलंबित करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील जिल्हास्तरीय पर्यावरण समित्या बरखास्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वच जिल्ह्यांत वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया रखडली आहे. राज्य पर्यावरण समितीकडून मान्यता मिळाल्यानंतरच वाळू घाटांचा लिलाव होणार आहे. वाळू घाटांचा अद्याप लिलाव झाला नसल्याने, वाळू उपलब्ध नसल्याच्या स्थितीत जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल, सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत विविध बांधकामे, पाटबंधारे व सिंचन अनुशेष योजनेंतर्गत जलसंधारणाची कामे रखडली आहेत. यासोबतच वाळू टंचाईत खासगी इमारत बांधकामेही प्रभावित झाली आहेत. वाळू उपलब्ध नसल्याने, इमारतींची बांधकामे रखडली आहेत. त्यानुषंगाने जिल्ह्यातील वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया केव्हा मार्गी लागणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.चोरट्या मार्गाने वाळूची अवैध वाहतूक वाढली!जिल्ह्यातील वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया रखडली असल्याने, बांधकामांसाठी वाळू उपलब्ध नाही. त्यामुळे चोरट्या मार्गाने वाळू घाटांतील वाळूची अवैध वाहतूक वाढली आहे. खासगी बांधकामांसाठी मध्य प्रदेश आणि इतर ठिकाणच्या वाळूचा वापर करण्यात येत असल्याचेही चित्र आहे.यंत्रणानिहाय कामांसाठी वाळू मागणीची मागितली माहिती!वाळू उपलब्ध नसल्याने, विविध यंत्रणांची बांधकामे रखडली आहेत. त्यानुषंगाने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुले, जलसंधारणाची कामे मार्गी लावण्यासाठी जिल्ह्यात उपलब्ध वाळू साठा आणि कामांची लागणारी वाळू यासंदर्भात यंत्रणानिहाय वाळू मागणीची माहिती राज्य पर्यावरण समितीकडून मागविण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालयामार्फत यंत्रणानिहाय कामांसाठी वाळू मागणीची माहिती राज्य पर्यावरण समितीकडे सादर करण्यात येणार आहे. 

जिल्ह्यातील घरकुल, जलसंधारणाच्या कामांसाठी संबंधित यंत्रणांकडून वाळू मागणीची मागणी राज्य पर्यावरण समितीकडून मागविण्यात आली आहे. त्यानुसार वाळू मागणीची माहिती लवकरच राज्य पर्यावरण समितीकडे सादर करण्यात येणार आहे.-डॉ. अतुल दोड,जिल्हा खनिकर्म अधिकारी.

 

टॅग्स :Akolaअकोलाsandवाळू