शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

शपथपत्र लिहून घेतल्यावर उघडणार हाॅटेल, मंगल कार्यालये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:23 IST

शहरातील काही मंगल कार्यालये, हाॅटेल व लाॅन्समध्ये वर्षभर लग्न साेहळ्यांसह विविध कार्यक्रम पार पडतात. यादरम्यान, वाहनतळाची सुविधा नसल्यामुळे रस्त्यांच्या ...

शहरातील काही मंगल कार्यालये, हाॅटेल व लाॅन्समध्ये वर्षभर लग्न साेहळ्यांसह विविध कार्यक्रम पार पडतात. यादरम्यान, वाहनतळाची सुविधा नसल्यामुळे रस्त्यांच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागतात. कार्यक्रमादरम्यान कर्णकर्कश आवाजात डीजेचा वापर केला जाताे. उष्टे अन्न सर्व्हिस लाइनमध्ये उघड्यावर फेकून दिले जाते. सांडपाण्याचा याेग्यरीत्या निचरा केला जात नाही. हाॅटेल, मंगल कार्यालयात अग्निशमन यंत्रणा अस्तित्वात नसल्याचे दिसून येते. एकूणच, या सर्व प्रकाराचा स्थानिक रहिवाशांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागताे. यासंदर्भात महापालिका तसेच जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी केल्यानंतरही याेग्य दखल घेतली जात नसल्याने थेट राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रार करण्यात आली. त्या अनुषंगाने लवादाने निकषांची पूर्तता न करणाऱ्या मंगल कार्यालयांसह हाॅटेल, लाॅन्स व रेस्टाॅरन्टला सील लावण्याचा आदेश जारी केला. लवादाच्या आदेशाचे पालन करीत मनपा प्रशासनाने या सर्व प्रतिष्ठानला सील लावण्याची माेहीम सुरू केली आहे. यामुळे व्यावसायिकांसह लग्न साेहळ्यांचे आयाेजन करणाऱ्यांसमाेर धर्मसंकट उभे ठाकले आहे.

लवादाच्या आदेशानंतरच कारवाई का?

मंगल कार्यालये, हाॅटेल व लाॅन्स संचालकांना व्यवसायासाठी अनेक निकषांची पूर्तता करणे भाग आहे. हरित लवादाच्या आदेशानंतरच मनपाला कारवाईसाठी जाग आल्याने प्रशासनाच्या धाेरणात्मक भूमिकेवर प्रश्नचिन्हं उपस्थित झाली आहेत. अर्थात, व्यवसायासाठी परवाना देऊन प्रशासन नामानिराळे हाेत असल्याचे या कारवाईवरून दिसून येत आहे.

शपथपत्र घेणार कधी?

मंगल कार्यालये, हाॅटेल व लाॅन्सला सील लावल्यानंतर ते नेमके उघडणार कधी, असा सवाल उपस्थित हाेत आहे. मनपाच्या भूमिकेमुळे व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे प्रशासन शपथपत्र लिहून घेणार असले तरी कधी, याकडे लक्ष लागले आहे.