शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

नव्या प्रदेशाध्यक्षांमुळे अकाेल्यात काँग्रेसमध्ये बदलाच्या आशा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:16 IST

भाकरी का करपली, पाने का सडली, घोडा का अडला, या सर्व प्रश्नांना उत्तर एकच ते म्हणजे न फिरविल्याने. या ...

भाकरी का करपली, पाने का सडली, घोडा का अडला, या सर्व प्रश्नांना उत्तर एकच ते म्हणजे न फिरविल्याने. या लहानशा बोधकथेतून बोध घेत अनेकदा राजकीय पक्ष नेतृत्वाची भाकरी फिरवितात. मात्र, ती भाकरी फिरविणे म्हणजे जुन्याचे नवे करणे किंवा ताटातले वाटीत अन् वाटीतले ताटात करणे असेच असते. काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकांमध्ये साधारणपणे असेच चित्र अनेकदा दिसून आले आहे. यावेळी मात्र नाना पटाेले यांच्या रूपाने काँग्रेसने प्रदेशस्तरावर नव्या दमाचे नेतृत्व दिले असून, प्रदेश कार्यकारिणीतही सत्तेचे विकेंद्रीकरण केले आहे. त्यामुळे अकाेल्यातील काँग्रेसजनांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

गेल्या लाेकसभा निवडणुकीपूर्वीपासून अकाेला जिल्हा व महानगर काँग्रेसच्या कार्यकारिणीत बदल हाेणार आहेत, अशा वावड्या उठत हाेत्या. मात्र, काँग्रेसने कुठलाही बदल केला नाही. त्यामुळे काँग्रेसमध्ये मरगळ आल्याचे चित्र आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेत प्रचंड उत्साह निर्माण झाला हाेता. मात्र, अल्पावधीतच काँग्रेसचा उत्साह मावळलेला दिसला. राष्ट्रवादीला अमाेल मिटकरी यांच्या रूपाने आमदार मिळाला, तर शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी आक्रमकपणे सत्तेचे फायदे मतदारसंघासाठी पाेहोचविण्याचा प्रयत्न सुरू केला. यामध्ये काँग्रेस खूपच मागे राहिल्याचे दिसत आहे. पालकमंत्र्यांच्या संमतीने जिल्हास्तरावर केल्या जाणाऱ्या शासकीय व निमशासकीय समित्यांचेही वाटप झालेले नसल्याने काँग्रेसच्या सामान्य पदाधिकाऱ्यांपर्यंत सत्तेचा वाटा आला नाहीच. दुसरीकडे पक्षाकडून आलेले कार्यक्रम व आंदाेलनापलीकडे अकाेल्यातील काँग्रेसने आपले अस्तित्व दर्शविले नाही. त्यामुळेच जिल्हा व महानगर काँग्रेसमध्ये फेरबदल करण्याची मागणी अनेक नेत्यांनी प्रदेश कार्यकारिणीपर्यंत पाेहोचविली आहे. मात्र, प्रदेशस्तरावरच अस्थिरता असल्याने या मागणीची दखल घेतली गेली नाही. आता नवे प्रदेशाध्यक्ष नियुक्त झाले आहेत. त्यांना अकाेल्यातील राजकारणाची जाण आहे. विशेष म्हणजे भाजपमधून राजीनामा दिल्यानंतर त्यांचा पहिला जाहीर कार्यक्रम अकाेल्यातच झाला हाेता, तसेच यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वातील आंदाेलनातही नाना पटाेले सक्रिय हाेते. त्यामुळे नव्या बदलाची काँग्रेसमध्ये चर्चा सुरू झाली आहे. पक्षात जिल्हाध्यक्षपदासाठी अविनाश देशमुख, प्रकाश तायडे, अशोक अमानकर, प्रशांत गावंडे, डॉ. अभय पाटील, डॉ. पुरुषोत्तम दातकर, डॉ. सुधीर ढोणे, हेमंत देशमुख यांची नावे शर्यतीत आहेत, तर महानगर अध्यक्षपदासाठी प्रदीप वखारिया, नितीन ताकवाले, साजीद खान पठाण, कपिल रावदेव, अविनाश देशमुख, डाॅ. जिशान हुसेन यांच्या नावांची चर्चा आहे.

बाॅक्स

शेतकरी आंदाेलनात काँग्रेसचे नेते सक्रिय

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदाेलनाला पाठिंबा देण्यासाठी जिल्हाभरातही शेतकऱ्यांना जागृत करून आंदाेलन उभारण्यात काँग्रेसचे नेते सक्रिय राहिले. या नेत्यांनी शेतकरी जागर मंच, किसान विकास मंचच्या माध्यमातून अधिक सक्रिय लढा दिल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सर्वांना साेबत घेऊन चालण्याचा प्रयत्न यानिमित्ताने दिसून आला. किसान विकास मंचने, तर थेट दिल्लीपर्यंत धडक दिली. त्यामुळे काँग्रेसमधील फेरबदल झाल्यास पक्षातील मरगळ दूर हाेण्याचे संकेतही अशा आंदाेलनातून समाेर आले आहेत.