शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

जिह्यात दुष्काळी सवलतींची आस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:19 IST

संतोष येलकर...........अकोला: जिल्ह्यातील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ४७ पैसे जाहीर करण्यात आल्याने जिल्ह्यात दुष्काळाचे सावट असल्याचे वास्तव समोर आले ...

संतोष येलकर...........अकोला: जिल्ह्यातील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ४७ पैसे जाहीर करण्यात आल्याने जिल्ह्यात दुष्काळाचे सावट असल्याचे वास्तव समोर आले आहे. अंतिम पैसेवारी जाहीर होऊन दीड महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र अद्यापही जिल्ह्यात दुष्काळी सवलती लागू करण्यात आल्या नाही. त्यामुळे शासनामार्फत जिल्ह्यात दुष्काळी सवलती लागू होणार तरी केव्हा, याबाबतची आस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लागली आहे.

यावर्षीच्या पावसाळ्यात सतत पाऊस आणि पुरामुळे जिल्ह्यात खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. मूग व उडीद पिकांचे उत्पादन बुडाले तसेच सोयाबीन, कपाशी, ज्वारी, तूर आदी पिकांच्या उत्पादनातही मोठ्या प्रमाणात घट झाली. हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने, जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ३१ डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील लागवडीयोग्य ९९० गावांमधील खरीप पिकांची अंतिम सरासरी पैसेवारी ४७ पैसे आहे. खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी म्हणजेच ४७ पैसे असल्याने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीचे सावट असल्याचे वास्तव समोर आले आहे. अंतिम पैसेवारी जाहीर होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला; मात्र अद्यापही जिल्ह्यात दुष्काळी सवलती लागू करण्यात आल्या नाही. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी सवलती लागू करण्याचा आदेश शासनाकडून केव्हा काढण्यात येणार, याबाबतची आस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लागली आहे.

लागवडीयोग्य गावांतील अंतिम

पैसेवारीचे असे आहे वास्तव!

तालुका गावे पैसेवारी

अकोला १८१ ४६

अकोट १८५ ४८

तेल्हारा १०६ ४५

बाळापूर १०३ ४७

पातूर ९४ ४८

मूर्तिजापूर १६४ ४७

बार्शीटाकळी १५७ ४८

...................................................................

एकूण ९९० ४७

‘या’ सवलती लागू होण्याची आहे प्रतीक्षा!

जिल्ह्यातील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी म्हणजेच ४७ पैसे असल्याने दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यात जमीन महसुलात सूट, कृषी पंपांच्या वीज देयकांत सूट, शेतकऱ्यांच्या पाल्यांना परीक्षा शुल्क माफी, शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन, कर्ज वसुलीस स्थगिती इत्यादी दुष्काळी सवलती लागू होण्याची प्रतीक्षा केली जात आहे.