शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

हॉकीचे मैदान, विज्ञान केंद्र अन् बालसुरक्षेला प्राधान्य! -बालदिनानिमित्त पालकमंत्र्यांनी दिली ग्वाही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 12:23 IST

शहरात हॉकीचे मैदान, विद्यार्थ्यांसाठी विज्ञान केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विज्ञान केंद्रासाठी जागेचा शोध सुरू आहे. लवकरच विज्ञान केंद्र उभे राहील, तसेच बालसुरक्षेला प्राधान्य देण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली.

अकोला : राजकारणात जनतेचा सेवक म्हणून काम करायचे असून, महाराष्ट्रात अकोला जिल्ह्याला सर्वच क्षेत्रात परिपूर्ण बनविण्याचे ध्येय आहे. सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याला विकासाच्या उंचीवर न्यायचे आहे. शहरात हॉकीचे मैदान, विद्यार्थ्यांसाठी विज्ञान केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विज्ञान केंद्रासाठी जागेचा शोध सुरू आहे. लवकरच विज्ञान केंद्र उभे राहील, तसेच बालसुरक्षेला प्राधान्य देण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली.भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून १४ नोव्हेंबर रोजी साजरी करण्यात येते. बालदिनानिमित्त लोकमत कार्यालयात सोमवारी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांची मुलाखत आयोजित केली होती. यावेळी पालकमंत्र्यांनी शहरातील निवडक शाळांमधून आलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांसोबत दोन तास मुक्त संवाद साधला आणि विद्यार्थ्यांच्या समर्पक प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी पालकमंत्री डॉ. पाटील यांची मुलाखत घेताना त्यांचे बालपण, शिक्षण, वैद्यकीय सेवा आणि राजकारणासोबतच त्यांचे जिल्ह्याच्या विकासाविषयीचे व्हिजन जाणून घेतले. शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून अकोला शहर आणि जिल्हा अग्रेसर राहावा, यासाठी कोणत्या योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे, याविषयीसुद्धा चिमुकल्या विद्यार्थ्यांनी त्यांना प्रश्न विचारले. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शहराच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. शहराचा शैक्षणिक, सांस्कृतिक, कृषी आणि सामाजिक विकास व्हावा, यासाठी शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी सुरू असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. (प्रतिनिधी)विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला आणि नीट परीक्षा केंद्र सुरू झाले!लोकमत कार्यालयात दोन तास रंगलेल्या मुलाखतीदरम्यान विद्यार्थ्यांनी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांना वैद्यकीय अभ्यासक्रम परीक्षेसाठी केंद्र शासनाने नीट परीक्षा अनिवार्य केली. या परीक्षेचे केंद्र अकोल्यात सुरू करावे, अशी विद्यार्थ्यांनी मागणी केली. यासंदर्भात पालकमंत्री डॉ. पाटील यांनी अमरावती विभागात केंद्र सुरू करण्याबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला आहे, असे सोमवारी विद्यार्थ्यांना सांगितले आणि मंगळवारीच वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांना पत्र पाठवून केंद्र शासनाने अकोला, बुलडाणा आणि अमरावतीमध्ये नीट परीक्षा केंद्र सुरू केले, असे कळविले.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटील