शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

तुटपुंज्या मदतीने दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या तोंडाला पुसली पाने

By admin | Updated: January 20, 2015 00:34 IST

एकरी खर्च १५ हजार; सरकारी मदत १८00 रुपये!

संतोष येलकर/अकोला : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कोरडवाहू शेतीसाठी हेक्टरी ४५00 म्हणजेच एकरी केवळ १८00 रुपये मदत दिली जात आहे. पिकांसाठी एकरी १५ हजारांवर खर्च येत असताना, त्या तुलनेत सरकारकडून दिली जाणारी मदत अत्यंत तुटपुंजी असून मदतीच्या नावाखाली दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत. यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यात खरीप हंगामातील पिके शेतकर्‍यांच्या हातून गेली. नापिकीमुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला. या पृष्ठभूमीवर विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात ११ डिसेंबर रोजी दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारकडून सात हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले. त्यामध्ये दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी मदतही जाहीर करण्यात आली. त्यानुसार मदत वाटपाच्या पहिल्या टप्प्यात शासनाकडून जिल्हानिहाय निधीचे वितरणही करण्यात आले. ५ ऑगस्ट २0१४ च्या शासन निर्णयानुसार दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मदतीचे वाटप करण्यात येत आहे. त्यानुसार अल्प व अत्यल्पभूधारक शेतकर्‍यांना दोन हेक्टर र्मयादेपर्यंत आणि बहुभूधारक शेतकर्‍यांना एक हेक्टर र्मयादेपर्यत मदतीचे वाटप करण्यात येत आहे. त्यामध्ये जिरायती (कोरडवाहू) शेतीसाठी हेक्टरी ४ हजार ५00 रुपये, बागायती शेतीसाठी हेक्टरी नऊ हजार रुपये आणि फळबागांसाठी हेक्टरी १२ हजार रुपये शेतकर्‍यांना मदत दिली जात आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कोरडवाहू शेतकर्‍यांना दोन हेक्टर र्मयादेपर्यंंत हेक्टरी ४ हजार ५00 रुपये म्हणजेच एकरी १ हजार ८00 रुपये मदत दिली जात आहे. वास्तविक, शेतीच्या मशागतीपासून तर कापणी-मळणीपर्यंत खर्चच कमीत कमी एकरी १५ हजार रुपयांचा येतो. त्या तुलनेत सरकारकडून दिली जाणारी एकरी १८00 रुपयांची मदत अत्यंत तोकडी आहे. दुष्काळी परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी येत्या पावसाळ्यापर्यंंत संसाराचा गाडा हाकण्यासाठी पुरेल एवढी नव्हे, तर किमान पिकांसाठी केलेल्या खर्चाची भरपाई करणारी मदत मिळावी, अशी शेतकर्‍यांना अपेक्षा आहे. शेतीची मशागत, पेरणी, कापणी व मळणीपर्यंंत पिकांसाठी एकरी १५ ते २0 हजार रुपयांचा शेतकर्‍यांना खर्च करावा लागतो. सरकारकडून कोरडवाहू शेतकर्‍यांना हेक्टरी ४५00 रुपये म्हणजेच एकरी १८00 रुपयांची मदत दिली जात आहे. पिकांसाठी एकरी लागणारा खर्च आणि त्या तुलनेत सरकारकडून मिळणारी मदत तुटपुंजी असल्याचे , भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मनोज तायडे यांनी स्पष्ट केले.