शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

मुसळधार पावसाचा महावितरणला फटका, अनेक गावे अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:17 IST

विदर्भासह राज्यात झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील मोर्णा व पुर्णा नदीकाठची गावे पाण्यात गेली आहेत. पुराच्या पाण्याचा वेग एवढा प्रचंड ...

विदर्भासह राज्यात झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील मोर्णा व पुर्णा नदीकाठची गावे पाण्यात गेली आहेत. पुराच्या पाण्याचा वेग एवढा प्रचंड होता की, या पुरात मोर्णा नदीच्या काठालगतचे १५ उच्चदाब वाहिनीचे तर २ लघुदाब वाहिनीचे वीज खांब आणि त्यावरील वीजवाहिन्या वाहून गेल्या आहेत. उच्च व लघुदाब वाहिनीचे १७५ वीज खांब जमीनदोस्त झाले आहेत. ६१ वीज खांब तुटले आहेत तर २८१ वीज खांब जमिनीलगत झुकले आहेत. याचबरोबर १० वितरण रोहित्रे पडल्याने मोर्णा आणि पुर्णा नदी परिसरातील २४ गावे अंधारात गेली होती.

या गावांचा विद्युत पुरवठा पूर्ववत

अशा परिस्थितीतही महावितरणने आपल्या कर्मचाऱ्यांसह, कंत्राटदारांच्या मदतीने युद्धस्तरावर कामाला सुरुवात केली. सर्वत्र चिखल, पाणी असल्याने वीज खांब, वीज वाहिन्या वाहून नेणे आणि अशा दलदलीत वीज यंत्रणेची उभारणी करणे अशक्यप्राय कामे करण्यात आली. परिणामी, निंबी, म्हैसपूर, रिधोरा, सुकोडा, पाचमोरी, न्यू सुकोडा, जुना सुकोडा, अमानतपूर, ताकोडा, जलम, टाकळी, वाकापूर, गडंकी या गावांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले आहे.

ही गावे अंधारातच

लोणी, भोड, सांगवी, मोहाडी, कानडी, वाखी, आखतवाडा, आगर, लोणाग्रा, दुधाळा, मांडला, कांचनपूर, बदलापूर, नवथळ आणि खेकडी या गावांचा वीजपुरवठा खंडित आहे. वीजपुरवठा बंद असलेली सर्व गावे ही उगवा वाहिनीवर असून या वाहिनीचे वीज खांब मोर्णा नदीच्या पुरात वाहून गेले आहेत. शिवाय मोर्णा व पुर्णा नदीच्या पूरस्थितीमुळे या गावांना जोडणारे रस्ते बंद असल्याने संपर्क होणे कठीण झाले आहे. पूरस्थिती ओसरताच या गावांचाही वीजपुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे.

विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कार्यकारी अभियंता विजयकुमार कासट यांच्या मार्गदर्शनात आणि उपकार्यकारी अभियंता सारंगधर केनेकर यांच्या नेतृत्वात तसेच अभियंते अजय भोकरे, हेमलता पाटील, तायडे, दीपक देशमुख, प्रवीण बदुकाले, सचिन कळुसे यांच्यासह जनमित्र श्रीशिव निंबेकर, प्रशांत शेळके, जितू गवई, शुभम मोहोड, आमटे, भागवत, अभय भारसाकळे, संजय कागणे, सोळंके, वाघोलीकर, तायडे, विजय केने आदी कार्यरत आहेत.