शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

अतिवृष्टीची मदत बाकी; ‘अवकाळी’ची मिळणार कधी?

By संतोष येलकर | Updated: December 4, 2023 17:31 IST

चार महिन्यांपूर्वी यंदाच्या पावसाळ्यात गेल्या जुलैमध्ये अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात खरीप पिकांसह शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

अकोला : यंदाच्या पावसाळ्यात चार महिन्यांपूर्वी अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाकडून मंजूर करण्यात आलेली मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे अद्याप बाकी आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सुरू असतानाच आता अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानीची मदत मिळणार तरी कधी, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. चार महिन्यांपूर्वी यंदाच्या पावसाळ्यात गेल्या जुलैमध्ये अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात खरीप पिकांसह शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात १ लाख हजार ५५८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांसह शेतजमिनीचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त २ लाख ५७१ शेतकऱ्यांना नुकसानीची मदत देण्यासाठी राज्य शासनाकडून १६४ कोटी १४ लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली. मदतीची रक्कम शासनाकडून थेट अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याने, जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अतिवृष्टीच्या नुकसानीची मदत अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे बाकी असतानाच आता २ डिसेंबरपर्यंत गेल्या चार दिवसांत अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळीने पळविल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसानीची मदत अद्याप मिळाली नसल्याच्या पार्श्वभूमीवर अवकाळीमुळे नुकसानीची मदत मिळणार तरी कधी, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

अतिवृष्टीग्रस्त ६५ लाख शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड 

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम महसूल प्रशासनामार्फत सुरू आहे. जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त २ लाख ५७१ शेतकऱ्यांपैकी १ डिसेंबरपर्यंत ६५ हजार शेतकऱ्यांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या असून, उर्वरित शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम अद्याप बाकी असल्याचे वास्तव आहे.

‘अवकाळी’च्या नुकसानीचे पंचनामे सुरू 

गेल्या चार दिवसांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सध्या सुरू असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी