अकोला : जिल्हय़ात बुधवारी रात्री दमदार पाऊस बरसला असून, गेल्या चोवीस तासांत गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी २0.८६ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. दमदार बरसलेल्या पावसाने पिकांना संजीवनी मिळाली आहे.गेल्या महिनाभरापासून, कुठे आहे तर कुठे नाही, असा रिमझिम पावसाने हजेरी लावली. सार्वत्रिक दमदार पाऊस नसल्याने, जिल्ह्यातील बहुतांश भागात खरीप पिकांवर ताण आला होता. आणखी काही दिवस पाऊस आला नाही तर, पिके तग धरू शकतील की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने, शेतकर्यांकडून सार्वत्रिक दमदार पावसाची प्रतीक्षा केली जात होती. पावसाची प्रतीक्षा केली जात असतानाच, बुधवारी रात्री जिल्ह्यातील सातपैकी सहा तालुक्यांमध्ये सार्वत्रिक दमदार पाऊस बरसला. गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी २९.८६ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. दमदार आणि मुरतोनी पाऊस बरसल्याने, पावसाअभावी ताण आलेल्या सोयाबीन, कपाशी, तूर, ज्वारी व इतर खरीप पिकांना संजीवनी मिळाली आहे. गेल्या चोवीस तासात बरसलेला पाऊस पिकांसाठी उपयुक्त ठरल्याचे चित्र आहे.*महान धरणातील जलसाठा ह्यजैसे थेह्ण!जिल्ह्यात दमदार पाऊस बरसल्याने, जिल्ह्यातील पिकांना जीवदान मिळाले.तसेच काही धरणातील जलसाठय़ात किंचित वाढ झाली; मात्र अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्या महान येथील काटेपूर्णा धरणाचे जलग्रहण क्षेत्र असलेल्या मेडशी, मालेगाव भागात दमदार पाऊस बरसला नसल्याने, महान येथील काटेपूर्णा धरणातील जलसाठय़ात किंचितही वाढ झाली नाही. त्यामुळे या धरणातील जलसाठा अद्यापही ह्यजैसे थेह्ण असल्याचे चित्र आहे. गुरुवारी सकाळी १0 वाजेपर्यंंत काटेपूर्णा धरणात १९.२४ टक्के, मोर्णा धरणात ३४.६८ टक्के, निगरुणा ३६.४९ टक्के, उमा धरणात १0.४८ टक्के व वान धरणात ८0.२४ टक्के जलसाठा उपलब्ध होता. तसेच दगडपारवा धरणातील जलसाठा अद्यापही लघुत्तम पातळीखालीच असल्याचे चित्र आहे.
अकोला जिल्हय़ात दमदार पाऊस; पिकांना संजीवनी
By admin | Updated: August 29, 2014 01:43 IST