शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

उन्हामुळे जीवाची लाही लाही; कार्यकर्ते म्हणतात, ‘एसी’कार द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 12:30 IST

अकोला लोकसभा मतदारसंघातील कानाकोपरा पिंजून काढताना नेत्यांसह कार्यकर्त्यांची चांगलीच दमछाक होत असून, कार्यकर्त्यांकडून ‘एसी’ कारची मागणी केली जात आहे.

ठळक मुद्देउन्हाचा पारा ४४ अंशावर पोहोचल्याने जिल्ह्यात प्रचारासाठी फिरणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जीवाची लाही लाही होत आहे.याचा परिणाम उमेदवारांनी आखलेले दौरे, कॉर्नर बैठकांवर होत असल्याचे बोलल्या जात आहे.नेत्यांसह कार्यकर्त्यांची चांगलीच दमछाक होत असून, कार्यकर्त्यांकडून ‘एसी’ कारची मागणी केली जात आहे.

अकोला: एरव्ही नेत्यांची जोशपूर्ण भाषणे, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याने निवडणुकीचा पारा चढत असल्याचा अनुभव येतो. या ठिकाणी नेमका उलटा प्रकार पाहावयास मिळत असून, मागील काही दिवसांपासून उन्हाचा पारा ४४ अंशावर पोहोचल्याने जिल्ह्यात प्रचारासाठी फिरणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जीवाची लाही लाही होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातील कानाकोपरा पिंजून काढताना नेत्यांसह कार्यकर्त्यांची चांगलीच दमछाक होत असून, कार्यकर्त्यांकडून ‘एसी’ कारची मागणी केली जात आहे.लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच येत्या १८ एप्रिल रोजी अकोला लोकसभा मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांविरोधात दंड थोपटून असलेल्या उमेदवारांना प्रचारासाठी आता केवळ दहा दिवसांचा अवधी उरला आहे. लोकसभा मतदारसंघात रिसोडसह सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून, जिल्ह्याच्या कानाकोपºयात पोहोचून मतदारांशी संपर्क साधण्याचे आव्हान विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांसमोर उभे ठाक ले आहे. प्रचाराचा कालावधी लक्षात घेता उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते काटेकोरपणे नियोजन करून घराबाहेर निघत आहेत. नियोजन करण्यामध्ये महायुती व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अग्रेसर असल्याचे चित्र आहे. सकाळी ८ वाजता स्थानिक नेते, पदाधिकारी कार्यकर्त्यांसह प्रचारासाठी निघत आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या दिवसापासूनच जिल्ह्यात उन्हाचा पारा ४० अंशाच्या पार गेल्याचे दिसून येते. मागील आठ दिवसांपासून सूर्यनारायण आग ओकू लागले असून, पारा ४४ अंशावर पोहोचला आहे. याचा परिणाम उमेदवारांनी आखलेले दौरे, कॉर्नर बैठकांवर होत असल्याचे बोलल्या जात आहे.नियोजनात ऐनवेळेवर बदलतापत्या उन्हामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर उमेदवारांना त्यांच्या पूर्वनियोजनात ऐनवेळेवर बदल करावे लागत आहेत. दुपारी १२ ते सायंकाळी ४ पर्यंत ग्रामीण भागातील मतदारांशी संपर्क साधताना अडचणी येत आहेत. रखरखत्या उन्हामुळे कार्यकर्त्यांना मतदारही भेटत नसल्याची परिस्थिती आहे.धावता प्रचार; जिल्हा पिंजून काढण्याचे आव्हाननिवडणूक रिंगणातील उमेदवारांकडून सोशल मीडियाचा पुरेपूर वापर केला जात आहे. युवा, तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाला प्राधान्य दिले जात असले तरी आजही मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यावरच उमेदवारांचा भर दिसून येत आहे. प्रचारासाठी कमी कालावधी पाहता उमेदवारांसमोर जिल्हा पिंजून काढण्याचे आव्हान असून, त्याकरिता धावता प्रचार केला जात आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाakola-pcअकोलाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक