शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
विजय शाह यांना कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवले; काँग्रेस नेत्यांची निदर्शने; नेमप्लेटवर शाई फेकली
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
4
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
5
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
6
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
7
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
8
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
9
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
10
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
11
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
12
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
13
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
14
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
15
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
16
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
17
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
18
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
19
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
20
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे

गारपिटीकडे विभागीय आयुक्तांचा कानाडोळा

By admin | Updated: January 3, 2015 01:28 IST

पीक नुकसानीची घेतली नाही माहिती.

संतोष येलकर / अकोला: जिल्हा दौर्‍यावर आलेल्या विभागीय आयुक्तांनी शुक्रवारी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक घेतली; मात्र अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्ह्यात झालेल्या पीक नुकसानीची माहिती घेतली नाही. त्यामुळे गारपिटीमुळे झालेल्या जिल्ह्यातील नुकसानीकडे विभागीय आयुक्तांनी कानाडोळा केल्याचा प्रत्यय आला. यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या परिस्थितीच्या पृष्ठभूमीवर अकोला शहरासह जिल्ह्यातील तीन प्रस्तावित पाणीपुरवठा योजनांसाठी मोका पाहणीकरिता अमरावती विभागीय आयुक्त ज्ञानेश्‍वर राजूरकर शुक्रवारी अकोला दौर्‍यावर आले होते. योजनांच्या पाहणीपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकार्‍यांची बैठक घेऊन, प्रस्तावित पाणीपुरवठा योजना आणि त्यांची आवश्यकता, यासंदर्भात चर्चा केली. गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे हरभरा, गहू, कपाशी, ओवा, लिंबू व केळी इत्यादी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे आधीच नापिकीमुळे दुष्काळाच्या झळा सहन करणारा जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला. या पृष्ठभूमीवर अकोला दौर्‍यात विभागीय आयुक्त अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आढावा जिल्हा प्रशासनाकडून घेतील, त्यासंदर्भात चर्चा करतील, अशी अपेक्षा होती. मात्र जिल्हा दौर्‍यावर आलेले विभागीय आयुक्तांनी केवळ पाणीपुरवठा योजनांसदर्भात लोकप्रतिनिधी आणि अधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीत आणि बैठकीनंतर अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आढावा तर दूर साधी माहितीदेखील विभागीय आयुक्तांनी घेतली नाही. त्यामुळे अवकाळी पाऊस गारपिटीमुळे जिल्ह्यात झालेले नुकसान व त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांकडे विभागीय आयुक्तांनी कानाडोळा केल्याचा प्रत्यय आला. *विचारणाही केली नाही! जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यापूर्वी, बैठकीत किंवा बैठकीनंतर, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्ह्यात किती नुकसान झाले, यासंदर्भात विभागीय आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाच्या संबंधित अधिकार्‍यांना साधी विचारणाही केली नाही. तसेच याबाबत साधा उल्लेखदेखील केला नाही. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची माहिती घेण्याकडे आयुक्तांनी केलेल्या कानाडोळ्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.