शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

..अन त्याने श्रमदानाला ‘अमीर’ केले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 02:07 IST

अकोला : सत्यमेव जयते पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू झालेली वॉटर कप स्पर्धा केवळ जलसाक्षरता अन् जलजागृतीपुरतीच र्मयादित राहिली नाही, तर या स्पध्रेतून सांघिक भावना, श्रमदानाचे महत्त्व वृद्धिंगत झाले आहे. या स्पर्धेसाठी अभिनेता आमिर खान याने २३ एप्रिल रोजी खंडाळा येथे भेट देऊन श्रमदान केले. त्याच्या या कर्तृत्वाने श्रमदानच ‘अमीर’ झाले असून, ग्रामस्थांमध्ये उत्साह संचारला आहे. 

ठळक मुद्देवॉटर कप स्पर्धा तेल्हारा तालुक्यातील खंडाळा येथे केले श्रमदान 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सत्यमेव जयते पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू झालेली वॉटर कप स्पर्धा केवळ जलसाक्षरता अन् जलजागृतीपुरतीच र्मयादित राहिली नाही, तर या स्पध्रेतून सांघिक भावना, श्रमदानाचे महत्त्व वृद्धिंगत झाले आहे. या स्पर्धेसाठी अभिनेता आमिर खान याने २३ एप्रिल रोजी खंडाळा येथे भेट देऊन श्रमदान केले. त्याच्या या कर्तृत्वाने श्रमदानच ‘अमीर’ झाले असून, ग्रामस्थांमध्ये उत्साह संचारला आहे. ग्रामस्थांचे श्रम, आवश्यक साहित्यासाठी दानशुरांची मदत व पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षित कार्यकर्त्यांचे ज्ञान, अशी त्रिसूत्री या स्पध्रेची असून, या स्पध्रेमुळे जलसंधारणाचे नवे पर्व राज्यात सुरू झाले आहे. या स्पर्धेत सहभाग घेणार्‍या गावातील श्रमदानाची दखल घेत अभिनेता आमिर खान भेट देत असतो. गेल्या वर्षी आमिर खान यांनी ९ मे रोजी पातूर तालुक्यातील चारमोळी आणि शिर्ला येथे भेट दिली होती. या दोन्हीही गावांना पुरस्कार मिळाले आहेत. यावर्षीही अकोला जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये वॉटर कप स्पर्धेसाठी श्रमदान सुरू आहेत. जिल्ह्यात श्रमदानाची चळवळ रुजत असतानाच आमिर खान याने खंडाळा येथे केलेल्या श्रमदानामुळे ग्रामस्थांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सोमवारी सायंकाळी आमिर खान यांचे आगमन होताच, श्रमदान करणार्‍यांचा उत्साह वाढला. तेथे उपस्थित प्रत्येकाने आपल्या हातात टिकास, फावडे, टोपले घेऊन श्रमदान केले. आमिर खान यांच्या आजच्या कृतीने श्रमदानाला त्यांनी ‘अमीर’ केल्याचा भास झाला. आमिर खान यांनी श्रमदात्यांबरोबर १0 ते १५ मिनिटे श्रमदान केले. यावेळी आमिर यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी किरण राव यांनीही श्रमदानात सहभाग घेतला. 

टॅग्स :Telharaतेल्हाराWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा