शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

हरभरा घोटाळा : कृषी केंद्रांवर कारवाईचे अधिकार ‘एसएओं’नाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 12:56 IST

गेल्या वर्षभरापासून त्या केंद्र संचालकांवर कारवाई करण्याची हिंमत अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने केली नाही, हे विशेष.

ठळक मुद्दे शासनाने २०१६ च्या रब्बी हंगामात हरभरा बियाणे अनुदानावर वाटपाची योजना राबवली. योजनेचा फायदा अकोला शहरातील चार वितरकांसह ग्रामीण भागातील ५३ कृषी केंद्र संचालकांनीच घेतला. या प्रकरणात दोषी आढळलेल्या सर्वच कृषी केंद्र संचालकांची जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाºयांनी सुनावणी घेतली.

अकोला : शासनाने शेतकऱ्यांसाठी दिलेल्या अनुदानित हरभरा बियाणे वाटपात शेतकºयांच्या टाळूवरील लोणी खाणाºया जिल्ह्यातील ५० ते ५२ कृषी केंद्रांवर कारवाई करण्याचा अधिकार गेल्यावर्षीच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांना मिळाला. सोबतच जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाºयांचा चौकशी अहवालही त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. त्यानंतरही गेल्या वर्षभरापासून त्या केंद्र संचालकांवर कारवाई करण्याची हिंमत अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने केली नाही, हे विशेष.राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातून शासनाने २०१६ च्या रब्बी हंगामात हरभरा बियाणे अनुदानावर वाटपाची योजना राबवली. त्या योजनेचा फायदा अकोला जिल्ह्यातील शेतकºयांना नव्हे, तर अकोला शहरातील चार वितरकांसह ग्रामीण भागातील ५३ कृषी केंद्र संचालकांनीच घेतला. शेतकºयांना मिळणाºया अनुदानापोटी कोट्यवधींचा मलिदा लाटणाºया या केंद्र संचालकांची नावे जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाºयांच्या चौकशीत पुढे आली. सोबतच अमरावती विभाग कृषी सहसंचालकाच्या पथकानेही योजनेतील वाटपातील अनियमिततेवर बोट ठेवले. ज्या लाभार्थींना अनुदानित हरभरा मिळणे आवश्यक होते, त्यांना ते मिळालेच नाही. त्यांच्या नावे वितरक, कृषी केंद्र संचालकांनी बियाण्यावरील अनुदानाचा मलिदा ओरपला. यामध्ये जवळपास आठ क्विंटल अनुदानित हरभरा बियाणे वाटपाचा घोटाळा झाला. सुरुवातीला फौजदारी कारवाईची तयारी झाली. त्यानंतर विविध कारणाने ती थंड बस्त्यात पडली. विशेष म्हणजे, या प्रकरणात दोषी आढळलेल्या सर्वच कृषी केंद्र संचालकांची जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाºयांनी सुनावणी घेतली. त्याचवेळी कृषी केंद्र परवाना, बियाणे, खते साठवणूक परवान्याचे अधिकार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांकडे वर्ग झाले. त्यामुळे हरभरा घोटाळ््यातील संपूर्ण प्रकरणे त्यांच्याकडे देण्यात आली. त्यानंतर ती पूर्णपणे थंड बस्त्यात आहेत.दरम्यान, अनुदानित बियाणे वाटपासाठी पुरवठादार म्हणून नियुक्त केलेल्या महाबीज, कृभको, राष्ट्रीय बियाणे महामंडळाला देय असलेले अनुदानही रोखण्यात आले. त्याचवेळी हा घोटाळा करणाºया कृषी केंद्र संचालकांना कारवाईतून सूट देण्यात आली आहे.- वितरकांवर कारवाईचे काय...शासनाच्या अनुदानित बियाणे वाटपात घोळ करणाºया वितरकांवर संबंधित बियाणे कंपन्यांनीही कारवाई केली नाही. विशेष म्हणजे, त्यापोटी शासनाकडून मिळणाºया लाखो रुपयांच्या अनुदानावरही कंपन्यांना पाणी सोडावे लागले. प्रचंड नुकसान झाल्यानंतरही वितरकांना वाचवण्याचे कारण काय, हा प्रश्न पुढे येत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीMahabeejमहाबीज