शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

शेतकऱ्यांचे धान्य चोरणाऱ्या टोळीला ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:23 IST

22 गुन्ह्यांची उकल, 12 लाखांचा मुद्देमाल हस्तगत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई अकोला : जिल्ह्यातील बाळापूर, माना, तेल्हारा, उरळ, दहीहंडा ...

22 गुन्ह्यांची उकल, 12 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अकोला : जिल्ह्यातील बाळापूर, माना, तेल्हारा, उरळ, दहीहंडा व शहरातील जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून शेतकऱ्याचे धान्य चोरी करणाऱ्या मोठ्या टोळीला बेड्या ठोकण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मंगळवारी यश आले. या चोरट्यांच्या टोळीला अटक केल्यानंतर त्यांच्याकडून सुमारे बारा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून या टोळीने तब्बल 22 गुन्हे केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली.

बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कान्हेरी सरप येथील रहिवासी रवींद्र किसनराव सानप यांच्या शेतातील सुमारे एक लाख 70 हजार रुपयांचे धान्य चोरी गेल्याची तक्रार त्यांनी १ फेब्रुवारी रोजी बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात दिली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यानंतर अशाच प्रकारच्या चोऱ्या मोठ्या प्रमाणात जिल्हाभर झाल्याचे समोर आले. या सर्व चोऱ्यांची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकत्रित करुन चोरट्यांचा शोध सुरू केला. पोलीस अधीक्षक जी श्रीधर स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनात पथकाचे गठण करून शेतकऱ्यांचे धान्य चोरणाऱ्या चोरट्यांचा शोध सुरू केला. मिळालेल्या माहितीवरून या पथकाने अकोट फाईलतील सिद्धार्थ वाडी येथील रहिवासी शेख रफिक शेख बशीर, सय्यद अमीन सय्यद अली राहणार भारत नगर अकोट फाईल, ख्वाजा हवनोद्दीन ख्वाजा अमिरोद्दीन राहणार भारत नगर अकोट फाईल या तिघांना संशयावरून ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता तिघांनाही त्यांच्या आणखी दोन साथीदारांना सोबत घेऊन जिल्हाभर तब्बल २२ शेतकऱ्यांच्या शेतातील धान्य व साहित्य चोरी केल्याची कबुली दिली. या चोरट्यांकडून गुन्ह्यात वापरलेले दोन वाहने जप्त करण्यात आली आहे. यामध्ये एम एच 30 बीडी 0617 आणि एम एच 30 बीके 1453 या दोन वाहनांचा समावेश आहे. या सोबतच 3 मोबाईल व आणखी काही साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. या चोरट्यांनी अकोला जिल्ह्यातील बाळापूर, दहीहंडा, माना उरळ जुने शहर पातूर चांणी, तेलारा, पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतकऱ्यांच्या शेतातील चोरी केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली. हे धान्य कुठे विकले यासह त्यांच्या साथीदारांच शोध पोलीस घेत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन चव्हाण, जयंत सोनटक्के, गणेश पांडे, अश्विन मिश्रा, गोकुळ चव्हाण, शक्ती कांबळे, शेख वसीम, किशोर सोनोणे, गोपाल पाटील, अनिल राठोड, प्रवीण कश्यप, विजय कपले, ओम देशमुख, गणेश सोनणे, गोपाळ ठोंबरे यांनी केली.