शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

अर्धा पावसाळा उलटला; जलसाठय़ांनी तळ गाठला!

By admin | Updated: July 18, 2014 00:44 IST

पश्‍चिम विदर्भात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची दाट शक्यता.

अकोला : दीड महिन्याच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर राज्यात सर्वदूर पावसाला सुरू वात झाली असली तरी, पश्‍चिम वर्‍हाड म्हणून ओळखल्या जाणार्‍या अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्हय़ांमध्ये मात्र अद्यापही पावसाने जोर धरलेला नसल्याने, या भागातील जलसाठय़ांनी तळ गाठला असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या काटेपूर्णा सिंचन प्रकल्पात आजमितीस केवळ २१ टक्के जलसाठा शिल्लक आहे.राज्यात १५ जूलैपासून सर्वदूर पावसाला सुरुवात झाल्यानंतर सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले असताना, हा आनंद पश्‍चिम विदर्भासाठी मात्र औटघटकेचा ठरला. या विभागातील अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्हय़ात आतापर्यंत केवळ १ सेंटिमीटर पाऊस झाला आहे. परिणामी या विभागातील मोठ्या, मध्यम व लघू प्रकल्पांची पातळी झपाट्याने कमी होत आहे. अकोला शहराला पाणी पुरवठा करणार्‍या काटेपूर्णा सिंचन प्रकल्पात आजिमितीस १८.३४ दशलक्ष घन मीटर म्हणजेच केवळ २१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. पाऊसच नसल्याने या धरणाची पातळी झपाट्याने कमी होत आहे. याच जिल्हय़ातील मोर्णा या मध्यम प्रकल्पात ११.७४ दशलक्ष घन मीटर म्हणजे २८ टक्के, निर्गुणा प्रकल्पात २२ टक्के, तर उमा या मध्यम प्रकल्पात केवळ तीन टक्के जलसाठा शिल्लक आहे. या जिल्हय़ातील दगडपारवा प्रकल्पाची पातळी तर शून्यावर पोहोचली आहे. जिल्ह्यातील पोपटखेड व उमा प्रकल्पात अनुक्रमे दोन व तीन टक्के जलसाठा शिल्लक आहे. अकोला जिल्ह्यातीलच वाण व यवतमाळ जिल्हयातील निम्न पूस या प्रकल्पांमध्ये प्रत्येकी ५0 टक्के जलसाठा शिल्लक आहे. बुलडाणा जिल्हय़ातील नळगंगा या प्रकल्पात आजमितीस २0.७७ दशलक्ष घन मीटर म्हणजेच ३0 टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्याशिवाय जिल्ह्यातील ज्ञानगंगा प्रकल्पात ३९ टक्के, मस प्रकल्पात २५ टक्के, कोराडीमध्ये ४३ टक्के, तर पलढग या प्रकल्पात २0 टक्के जलसाठा उरला आहे. वाशिम जिल्हय़ातील सोनल व एकबुर्जी प्रकल्पांची स्थितीही गंभीर आहे. लगतच्या यवतमाळ जिल्हय़ातील पूस या मोठय़ा प्रकल्पात १९ टक्के जलसाठा शिल्लक असून, निम्न पूसमध्ये ५0 टक्के साठा आहे. त्याच जिल्ह्यातील सायखेडा प्रकल्पात ४२ टक्के, गोकीमध्ये २१ टक्के, वाघाडीमध्ये २८ टक्के, तर बोरगाव या मध्यम प्रकल्पात २४ टक्के जलसाठा उरला आहे.