शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
2
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
3
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
राज ठाकरे यांच्या मविआमधील समावेशाबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं मोठं विधान, म्हणाले... 
6
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
7
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
8
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
9
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
10
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
11
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
12
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
13
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
14
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
15
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
16
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
17
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
18
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
19
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

राज्यात दीड लाख कृषी जोडण्या प्रलंबित

By admin | Updated: May 25, 2015 02:17 IST

शेतक-यांनी भरले पैसे, शासनाकडे नाही फंड.

विवेक चांदूरकर / अकोला : राज्यात कृषिपंप जोडणीचे १ लाख ६0 हजार शेतकर्‍यांचे अर्ज प्रलंबित आहेत. शेतकर्‍यांनी वीज जोडणीसाठी आवश्यक रक्कम भरली असून, सर्व त्रुट्या पूर्ण केल्या आहेत. मात्र, शासनाकडे फंड नसल्यामुळे वीज जोडणी मिळत नाही आहे. एकीकडे सिंचनाचा अनुशेष भरून काढण्याचा डांगोरा शासनाच्यावतीने पिटण्यात येत असून, विहिरीत पाणी असल्यावरही शेतकर्‍यांना सिंचनापासून वंचित राहावे लागत आहे. सिंचनाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या धरणांमधील पाणी पिण्याकरिता उपयोगात आणल्या जाते. त्यामुळे शेतकरी सिंचन करू शकत नाही. शेतातील विहिरीत पाणी असल्यावरच शेतकरी शेतात कृषिपंप जोडणीसाठी अर्ज सादर करतात. त्यांना विद्युत जोडणी मिळाली तर निश्‍चितच सिंचनात वाढ होईल व शेतकर्‍यांना फायदा होईल. मात्र, शासनाच्यावतीने शेतकर्‍यांना वीज जोडणी देण्याला प्राधान्य देण्यात येत नाही. चार ते पाच वषार्ंपूर्वी कृषिपंप जोडणीसाठी शेतकर्‍यांनी अर्ज सादर करून जोडणी मिळण्यासाठी आवश्यक पैसे भरले व सर्व निकष पूर्ण केले आहेत. मात्र, अशा १ लाख ६0 हजार शेतकर्‍यांना आजही वीज जोडणीची प्रतीक्षा आहे. दुसरीकडे महावितरण मात्र आपल्या कामाची वाहवा करीत असून, २00५ साली राज्यात ९ लाख कृषिपंप जोडणीचे अर्ज प्रलंबित होते, त्यापैकी लाखो अर्ज निकाली काढून त्यांना वीज जोडणी देण्यात आल्याचे सांगण्यात येते. शेतकर्‍यांनी वीज जोडणीसाठी आवश्यक सर्व बाबी पूर्ण केल्यावरही केवळ शासनाकडे फंड नसल्यामुळे त्यांना जोडणीपासून वंचित राहावे लागत आहे. तीन ते चार वर्षे शेतात पाणी असल्यावरही शेतकरी सिंचन करू शकत नाही. शेतकर्‍यांच्या या दुर्दशेला केवळ शासनच जबाबदार आहे.