शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

राज्यात दीड लाख कृषी जोडण्या प्रलंबित

By admin | Updated: May 25, 2015 02:17 IST

शेतक-यांनी भरले पैसे, शासनाकडे नाही फंड.

विवेक चांदूरकर / अकोला : राज्यात कृषिपंप जोडणीचे १ लाख ६0 हजार शेतकर्‍यांचे अर्ज प्रलंबित आहेत. शेतकर्‍यांनी वीज जोडणीसाठी आवश्यक रक्कम भरली असून, सर्व त्रुट्या पूर्ण केल्या आहेत. मात्र, शासनाकडे फंड नसल्यामुळे वीज जोडणी मिळत नाही आहे. एकीकडे सिंचनाचा अनुशेष भरून काढण्याचा डांगोरा शासनाच्यावतीने पिटण्यात येत असून, विहिरीत पाणी असल्यावरही शेतकर्‍यांना सिंचनापासून वंचित राहावे लागत आहे. सिंचनाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या धरणांमधील पाणी पिण्याकरिता उपयोगात आणल्या जाते. त्यामुळे शेतकरी सिंचन करू शकत नाही. शेतातील विहिरीत पाणी असल्यावरच शेतकरी शेतात कृषिपंप जोडणीसाठी अर्ज सादर करतात. त्यांना विद्युत जोडणी मिळाली तर निश्‍चितच सिंचनात वाढ होईल व शेतकर्‍यांना फायदा होईल. मात्र, शासनाच्यावतीने शेतकर्‍यांना वीज जोडणी देण्याला प्राधान्य देण्यात येत नाही. चार ते पाच वषार्ंपूर्वी कृषिपंप जोडणीसाठी शेतकर्‍यांनी अर्ज सादर करून जोडणी मिळण्यासाठी आवश्यक पैसे भरले व सर्व निकष पूर्ण केले आहेत. मात्र, अशा १ लाख ६0 हजार शेतकर्‍यांना आजही वीज जोडणीची प्रतीक्षा आहे. दुसरीकडे महावितरण मात्र आपल्या कामाची वाहवा करीत असून, २00५ साली राज्यात ९ लाख कृषिपंप जोडणीचे अर्ज प्रलंबित होते, त्यापैकी लाखो अर्ज निकाली काढून त्यांना वीज जोडणी देण्यात आल्याचे सांगण्यात येते. शेतकर्‍यांनी वीज जोडणीसाठी आवश्यक सर्व बाबी पूर्ण केल्यावरही केवळ शासनाकडे फंड नसल्यामुळे त्यांना जोडणीपासून वंचित राहावे लागत आहे. तीन ते चार वर्षे शेतात पाणी असल्यावरही शेतकरी सिंचन करू शकत नाही. शेतकर्‍यांच्या या दुर्दशेला केवळ शासनच जबाबदार आहे.