शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

राज्यात दीड लाख कृषी जोडण्या प्रलंबित

By admin | Updated: May 25, 2015 02:17 IST

शेतक-यांनी भरले पैसे, शासनाकडे नाही फंड.

विवेक चांदूरकर / अकोला : राज्यात कृषिपंप जोडणीचे १ लाख ६0 हजार शेतकर्‍यांचे अर्ज प्रलंबित आहेत. शेतकर्‍यांनी वीज जोडणीसाठी आवश्यक रक्कम भरली असून, सर्व त्रुट्या पूर्ण केल्या आहेत. मात्र, शासनाकडे फंड नसल्यामुळे वीज जोडणी मिळत नाही आहे. एकीकडे सिंचनाचा अनुशेष भरून काढण्याचा डांगोरा शासनाच्यावतीने पिटण्यात येत असून, विहिरीत पाणी असल्यावरही शेतकर्‍यांना सिंचनापासून वंचित राहावे लागत आहे. सिंचनाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या धरणांमधील पाणी पिण्याकरिता उपयोगात आणल्या जाते. त्यामुळे शेतकरी सिंचन करू शकत नाही. शेतातील विहिरीत पाणी असल्यावरच शेतकरी शेतात कृषिपंप जोडणीसाठी अर्ज सादर करतात. त्यांना विद्युत जोडणी मिळाली तर निश्‍चितच सिंचनात वाढ होईल व शेतकर्‍यांना फायदा होईल. मात्र, शासनाच्यावतीने शेतकर्‍यांना वीज जोडणी देण्याला प्राधान्य देण्यात येत नाही. चार ते पाच वषार्ंपूर्वी कृषिपंप जोडणीसाठी शेतकर्‍यांनी अर्ज सादर करून जोडणी मिळण्यासाठी आवश्यक पैसे भरले व सर्व निकष पूर्ण केले आहेत. मात्र, अशा १ लाख ६0 हजार शेतकर्‍यांना आजही वीज जोडणीची प्रतीक्षा आहे. दुसरीकडे महावितरण मात्र आपल्या कामाची वाहवा करीत असून, २00५ साली राज्यात ९ लाख कृषिपंप जोडणीचे अर्ज प्रलंबित होते, त्यापैकी लाखो अर्ज निकाली काढून त्यांना वीज जोडणी देण्यात आल्याचे सांगण्यात येते. शेतकर्‍यांनी वीज जोडणीसाठी आवश्यक सर्व बाबी पूर्ण केल्यावरही केवळ शासनाकडे फंड नसल्यामुळे त्यांना जोडणीपासून वंचित राहावे लागत आहे. तीन ते चार वर्षे शेतात पाणी असल्यावरही शेतकरी सिंचन करू शकत नाही. शेतकर्‍यांच्या या दुर्दशेला केवळ शासनच जबाबदार आहे.