शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

पीक परिस्थितीचा पालकमंत्र्यांनी घेतला ‘लेखाजोखा’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 14:08 IST

अकोला: दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असलेल्या जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी व मूर्तिजापूर या तीन तालुक्यातील १२ गावांना भेटी देत, पीक परिस्थिती आणि पाणीसाठ्याचा लेखाजोखा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शनिवारी घेतला.

अकोला: दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असलेल्या जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी व मूर्तिजापूर या तीन तालुक्यातील १२ गावांना भेटी देत, पीक परिस्थिती आणि पाणीसाठ्याचा लेखाजोखा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शनिवारी घेतला. पीक परिस्थिती आणि पाणीसाठ्याची माहिती पालकमंत्री मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार आहेत.पावसातील खंड, जमिनीतील आर्द्रतेचे कमी प्रमाण आणि त्यामुळे पिकांच्या उत्पादनात घट होणार असल्याने, जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, बाळापूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या पाच तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पृष्ठभूमीवर पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी अकोला, बार्शीटाकळी व मूर्तिजापूर या तीन तालुक्यातील १२ गावांना भेटी देऊन, पीक परिस्थिती आणि उपलब्ध पाणीसाठ्याची माहिती घेतली. शेतावर जाऊन प्रत्यक्ष पीक परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी चर्चा करून पीक परिस्थिती आणि पाणीसाठ्याची माहिती घेतली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांच्यासह तीनही तालुक्यांचे तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते. प्रत्यक्ष पाहणी करून पीक परिस्थिती व पाणीसाठ्यासंदर्भात घेतलेल्या माहितीचा गोषवारा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करणार आहेत.‘या’ गावांमध्ये केली केली पाहणी!पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी अकोला, बार्शीटाकळी व मूर्तिजापूर तालुक्यातील १२ गावांना भेटी देऊन पीक परिस्थितीची पाहणी केली. त्यामध्ये प्रामुख्याने बोरगावमंजू, कुरणखेड, कोळंबी, अनभोरा, शेलू वेताळ, सोनोरी, घोटा, पिंजर, रेडवा इत्यादी गावांना भेटी देऊन पीक परिस्थिती व पाणीसाठ्याची माहिती पाहणी केली.शेतकरी-शेतजुरांशी केली चर्चा; अडचणी जाणून घेतल्या!पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शेतावर जाऊन शेतकरी आणि शेतमजुरांसोबत चर्चा केली. पीक परिस्थिती, पाणीसाठा, तसेच वीजपुरवठ्यासंदर्भात शेतकºयांच्या अडचणी तसेच शेतमजुरांच्या अडचणीही पालकमंत्र्यांनी जाणून घेतल्या. 

पावसातील खंड, आर्द्रतेचे प्रमाण कमी आणि पिकांचे उत्पादन कमी होणार असल्याने, जिल्ह्यातील पाच तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने अकोला, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर या तीन तालुक्यातील १२ गावांना भेटी देऊन, पीक परिस्थिती व पाणीसाठ्याची माहिती घेतली. घेतलेल्या माहितीचा गोषवारा मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार आहे.- डॉ. रणजित पाटील, पालकमंत्री

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटील