शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

पीक परिस्थितीचा पालकमंत्र्यांनी घेतला ‘लेखाजोखा’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 14:08 IST

अकोला: दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असलेल्या जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी व मूर्तिजापूर या तीन तालुक्यातील १२ गावांना भेटी देत, पीक परिस्थिती आणि पाणीसाठ्याचा लेखाजोखा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शनिवारी घेतला.

अकोला: दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असलेल्या जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी व मूर्तिजापूर या तीन तालुक्यातील १२ गावांना भेटी देत, पीक परिस्थिती आणि पाणीसाठ्याचा लेखाजोखा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शनिवारी घेतला. पीक परिस्थिती आणि पाणीसाठ्याची माहिती पालकमंत्री मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार आहेत.पावसातील खंड, जमिनीतील आर्द्रतेचे कमी प्रमाण आणि त्यामुळे पिकांच्या उत्पादनात घट होणार असल्याने, जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, बाळापूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या पाच तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पृष्ठभूमीवर पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी अकोला, बार्शीटाकळी व मूर्तिजापूर या तीन तालुक्यातील १२ गावांना भेटी देऊन, पीक परिस्थिती आणि उपलब्ध पाणीसाठ्याची माहिती घेतली. शेतावर जाऊन प्रत्यक्ष पीक परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी चर्चा करून पीक परिस्थिती आणि पाणीसाठ्याची माहिती घेतली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांच्यासह तीनही तालुक्यांचे तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते. प्रत्यक्ष पाहणी करून पीक परिस्थिती व पाणीसाठ्यासंदर्भात घेतलेल्या माहितीचा गोषवारा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करणार आहेत.‘या’ गावांमध्ये केली केली पाहणी!पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी अकोला, बार्शीटाकळी व मूर्तिजापूर तालुक्यातील १२ गावांना भेटी देऊन पीक परिस्थितीची पाहणी केली. त्यामध्ये प्रामुख्याने बोरगावमंजू, कुरणखेड, कोळंबी, अनभोरा, शेलू वेताळ, सोनोरी, घोटा, पिंजर, रेडवा इत्यादी गावांना भेटी देऊन पीक परिस्थिती व पाणीसाठ्याची माहिती पाहणी केली.शेतकरी-शेतजुरांशी केली चर्चा; अडचणी जाणून घेतल्या!पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शेतावर जाऊन शेतकरी आणि शेतमजुरांसोबत चर्चा केली. पीक परिस्थिती, पाणीसाठा, तसेच वीजपुरवठ्यासंदर्भात शेतकºयांच्या अडचणी तसेच शेतमजुरांच्या अडचणीही पालकमंत्र्यांनी जाणून घेतल्या. 

पावसातील खंड, आर्द्रतेचे प्रमाण कमी आणि पिकांचे उत्पादन कमी होणार असल्याने, जिल्ह्यातील पाच तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने अकोला, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर या तीन तालुक्यातील १२ गावांना भेटी देऊन, पीक परिस्थिती व पाणीसाठ्याची माहिती घेतली. घेतलेल्या माहितीचा गोषवारा मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार आहे.- डॉ. रणजित पाटील, पालकमंत्री

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटील