शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

पीक परिस्थितीचा पालकमंत्र्यांनी घेतला ‘लेखाजोखा’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 14:08 IST

अकोला: दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असलेल्या जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी व मूर्तिजापूर या तीन तालुक्यातील १२ गावांना भेटी देत, पीक परिस्थिती आणि पाणीसाठ्याचा लेखाजोखा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शनिवारी घेतला.

अकोला: दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असलेल्या जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी व मूर्तिजापूर या तीन तालुक्यातील १२ गावांना भेटी देत, पीक परिस्थिती आणि पाणीसाठ्याचा लेखाजोखा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शनिवारी घेतला. पीक परिस्थिती आणि पाणीसाठ्याची माहिती पालकमंत्री मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार आहेत.पावसातील खंड, जमिनीतील आर्द्रतेचे कमी प्रमाण आणि त्यामुळे पिकांच्या उत्पादनात घट होणार असल्याने, जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, बाळापूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या पाच तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पृष्ठभूमीवर पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी अकोला, बार्शीटाकळी व मूर्तिजापूर या तीन तालुक्यातील १२ गावांना भेटी देऊन, पीक परिस्थिती आणि उपलब्ध पाणीसाठ्याची माहिती घेतली. शेतावर जाऊन प्रत्यक्ष पीक परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी चर्चा करून पीक परिस्थिती आणि पाणीसाठ्याची माहिती घेतली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांच्यासह तीनही तालुक्यांचे तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते. प्रत्यक्ष पाहणी करून पीक परिस्थिती व पाणीसाठ्यासंदर्भात घेतलेल्या माहितीचा गोषवारा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करणार आहेत.‘या’ गावांमध्ये केली केली पाहणी!पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी अकोला, बार्शीटाकळी व मूर्तिजापूर तालुक्यातील १२ गावांना भेटी देऊन पीक परिस्थितीची पाहणी केली. त्यामध्ये प्रामुख्याने बोरगावमंजू, कुरणखेड, कोळंबी, अनभोरा, शेलू वेताळ, सोनोरी, घोटा, पिंजर, रेडवा इत्यादी गावांना भेटी देऊन पीक परिस्थिती व पाणीसाठ्याची माहिती पाहणी केली.शेतकरी-शेतजुरांशी केली चर्चा; अडचणी जाणून घेतल्या!पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शेतावर जाऊन शेतकरी आणि शेतमजुरांसोबत चर्चा केली. पीक परिस्थिती, पाणीसाठा, तसेच वीजपुरवठ्यासंदर्भात शेतकºयांच्या अडचणी तसेच शेतमजुरांच्या अडचणीही पालकमंत्र्यांनी जाणून घेतल्या. 

पावसातील खंड, आर्द्रतेचे प्रमाण कमी आणि पिकांचे उत्पादन कमी होणार असल्याने, जिल्ह्यातील पाच तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने अकोला, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर या तीन तालुक्यातील १२ गावांना भेटी देऊन, पीक परिस्थिती व पाणीसाठ्याची माहिती घेतली. घेतलेल्या माहितीचा गोषवारा मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार आहे.- डॉ. रणजित पाटील, पालकमंत्री

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटील