शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

अकोल्यात पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता दरबाराला उत्स्फुर्त प्रतिसाद; एकूण  ९६ तक्रारी प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 18:46 IST

अकोला: मागील काही महिन्यापासून दर सोमवारी असणा-या पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या   जनता दरबारात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून   आज सोमवार दि.२२ जानेवारी  रोजी झालेल्या जनता दरबारात विविध विभागाच्या एकुण  ९६ क्रारी प्राप्त झाल्या आहेत.

ठळक मुद्देसोमवार दि.२२ जानेवारी  रोजी झालेल्या जनता दरबारात विविध विभागाच्या एकुण  ९६ क्रारी प्राप्त झाल्या आहेत.सर्व विभागप्रमुखांना जनतेच्या तक्रारीचा १५ दिवसाच्या आत निपटारा करावा असे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिले. विभागप्रमुखांनी कटाक्षांने लक्ष देवून त्यांच्या समस्या सोडवाव्यात , अशा सुचना त्यांनी दिल्यात. 

अकोला: मागील काही महिन्यापासून दर सोमवारी असणा-या पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या   जनता दरबारात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून   आज सोमवार दि.२२ जानेवारी  रोजी झालेल्या जनता दरबारात विविध विभागाच्या एकुण  ९६ क्रारी प्राप्त झाल्या आहेत. सर्व विभागप्रमुखांना जनतेच्या तक्रारीचा १५ दिवसाच्या आत निपटारा करावा असे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिले आज पालकमंत्री  यांच्या जनता दरबाराचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात  करण्यात आले होते.

            यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस रामामुर्ती, अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर, निवासी उपजिल्हाधिकारी  राजेश खवले , मनपाचे अतिरिक्त आयुक्त दिपक पाटील आदींसह विविध विभागाचे  विभागप्रमुख उपस्थित होते.

            नवीन तक्रार कर्त्यांना १५ दिवसात आपल्या तक्रारीवर कार्यवाही होवून त्याबाबत कळविण्यात येईल असा दिलासा पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी  तक्रार कर्त्यांना दिला.  प्रारंभी पालकमंत्री यांनी मागील  जनता दरबारात प्राप्त झालेल्या तक्रारींचा  आढावा घेतला. या तक्रारींवर काय कारवाई करण्यात आली, याबाबतची माहिती अधिकाऱ्यांकडून त्यांनी जाणून घेतली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर  पंधरा दिवसांत कोणत्याही परिस्थितीत तक्रारींचे निराकरण करावे. तक्रारीवर काय कारवाई केली. याबाबतच्या अुनपालनाची प्रत आपल्याला व संबंधित तक्रारदाराला वेळेत देण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री यांनी यावेळी दिले. तसेच पालकमंत्री म्हणाले की, प्रशासनाकडून समस्या तातडीने सोडविल्या गेल्या पाहिजे अशी जनतेची अपेक्षा असते तक्रार प्राप्त झाल्यावर त्याबाबतची  प्राथमिक माहिती घेवूनच  अधिका-यांनी जनता दरबारात उपस्थित राहावे,  असेही ते म्हणाले.

            सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी विभागप्रमुखांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले की, या पुढेही नागरिकांच्या तक्रारी तत्काळ सोडविण्यासाठी दक्षता घ्यावी.  तक्रार घेवून आलेल्या नागरिकांची निराशा होता कामा नये. याकडे विभागप्रमुखांनी कटाक्षांने लक्ष देवून त्यांच्या समस्या सोडवाव्यात , अशा सुचना त्यांनी दिल्यात.  या बैठकीला अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, उपविभागीय अधिकारी संजय खडसे ,अभयसिंह मोहिते , जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे    यांचेसह सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

टॅग्स :Akola cityअकोला शहरAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालय