शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

युवकांचा सर्वांगिण विकास करण्याची तळमळ असलेला समुह म्हणजे गुरुदेव सेवा मंडळ - आचार्य वेरुळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 14:51 IST

भगव्या टोप्यांचा जत्था म्हणजे गुरुदेव सेवा मंडळ नाही तर सर्वांगिण विकास करण्याची तळमळ ज्यांच्या मनात आहे, अशा समुहाला गुरुदेव सेवा मंडळ राष्ट्रसंतांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देराष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या  दिवशी श्री गुरुदेव सेवा मंडळाची दशा व दिशा या विषयावर परिसंवाद पार पडला. आजीवन प्रचारक डॉ. भास्करराव विघे गुरुजी यांनी राष्ट्रसंतांना अभिप्रेत असलेले युवक आपल्या भाषणातून मांडले.

अकोला (आद्य किर्तनकार स्व. आमले महाराज साहित्य नगरी) :  संस्कार शिबिरातून हजारो युवक दरवर्षी बाहेर पडतात, महाराजांचा विचार घेऊन ते काम करू लागतात या युवकांना दिशा मिळाली पाहीजे, असे कार्य मुळ संस्थेने करणेसुध्दा तितकेच महत्वाचे आहे. मात्र दुर्दैवाने तसे होत नाही. भगव्या टोप्यांचा जत्था म्हणजे गुरुदेव सेवा मंडळ नाही तर सर्वांगिण विकास करण्याची तळमळ ज्यांच्या मनात आहे, अशा समुहाला गुरुदेव सेवा मंडळ राष्ट्रसंतांनी म्हटले आहे. हा धागा लक्षात ठेऊन सेवा मंडळाची दिशा ठरली पाहिजे, असे मत आपल्या अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ गुरुदेव प्रचारक आचार्य वेरुळकर गुरुजी यांनी मांडले.    डाँ. बाबासाहेब आंबेडकर खुले  नाट्यगृहात सुरु असलेल्या सहाव्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या  दिवशी श्री गुरुदेव सेवा मंडळाची दशा व दिशा या विषयावर परिसंवाद पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आजीवन प्रचारक डॉ. भास्करराव विघे गुरुजी, डॉ. माधवराव सुर्यवंशी, ज्येष्ट प्रचारक तिमांडे महाराज, ग्रामगिताचार्य सुनील महाराज लांजुळकर आदी उपस्थित होते.    या परिसंवादाचे प्रमुख वत्तेâ म्हणून आचार्य वेरूळकर गुरुजी यांनी युवकांना ग्रामगीतेच्या आचरणाचे आवाहन केले.  राष्ट्रसंतांनी प्रचारकाकडे विशेष लक्ष दिले आहे. सध्याच्या काळात गावागावात महाराजांच्या विचारांचे कार्यक्रम होत आहेत. मात्र या कार्यक्रमाला पाहिजे ती दिशा मिळाली नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली.     ग्रामगीता नुसतेच वाचून चालणार नाही तर ती आचरणात सुद्धा आणली पाहिजे, यासाठी गुरुदेव सेवा मंडळाने गावपातळीवर काम मोठ्या प्रमाणावर सुरु झाले आहे, मात्र कार्याला दिशा मिळाली नाही. हि दिशा मिळण्यासाठी सेवा मंडळाच्या प्रत्येक कार्यकत्र्याने आपले वर्तन चांगले ठेवले पाहिजेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ गुरुदेव प्रचारक आचार्य वेरुळकर गुरुजी यांनी येथे केले.     आजीवन प्रचारक डॉ. भास्करराव विघे गुरुजी यांनी राष्ट्रसंतांना अभिप्रेत असलेले युवक आपल्या भाषणातून मांडले. आज या संमेलनातून शेकडो युवक कार्यकर्ते निर्माण झाले पाहिजेत, आणि राष्ट्रसंतांचा विचार त्यांनी घराघरात पोहोचवला पाहिजे, असा आशावाद व्यक्त करीत राष्ट्रसंतांची ग्रामविकास चळवळ विषद केली. गावाचा विकास करायचा असेल तर युवकांनी जागृत झालं पाहिजे. ही जागृती राष्ट्रसंतांच्या विचारातून मिळेल. त्यासाठी राष्ट्रसंतांचे साहित्याने प्रत्येकांने वाचली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.    युवकांनी नुसते शिक्षण घेऊन चालणार नाही तर रोजगाराकडे वळले पाहिजे, गुरुदेव सेवा मंडळाच्या तरुणांनी इतर संप्रदायांंना दिशा देण्याचे काम राष्ट्रसंताच्या विचारातून निर्भयता मिळते, ही निर्भयता सेवा मंडळातील युवकांमध्ये आली पाहिजेत, असा विचार त्यांनी व्यक्त केला. या परिसंवादाचे सुत्रसंचलन प्रा. मनिष  देशमुख यांनी केले.

टॅग्स :AkolaअकोलाRashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराजcultureसांस्कृतिक