शहरं
Join us  
Trending Stories
1
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
2
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
3
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
4
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
5
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
6
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
7
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
8
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
9
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
10
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
11
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
12
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
13
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
14
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
15
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
16
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
17
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
18
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
19
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
20
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात

युवकांचा सर्वांगिण विकास करण्याची तळमळ असलेला समुह म्हणजे गुरुदेव सेवा मंडळ - आचार्य वेरुळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 14:51 IST

भगव्या टोप्यांचा जत्था म्हणजे गुरुदेव सेवा मंडळ नाही तर सर्वांगिण विकास करण्याची तळमळ ज्यांच्या मनात आहे, अशा समुहाला गुरुदेव सेवा मंडळ राष्ट्रसंतांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देराष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या  दिवशी श्री गुरुदेव सेवा मंडळाची दशा व दिशा या विषयावर परिसंवाद पार पडला. आजीवन प्रचारक डॉ. भास्करराव विघे गुरुजी यांनी राष्ट्रसंतांना अभिप्रेत असलेले युवक आपल्या भाषणातून मांडले.

अकोला (आद्य किर्तनकार स्व. आमले महाराज साहित्य नगरी) :  संस्कार शिबिरातून हजारो युवक दरवर्षी बाहेर पडतात, महाराजांचा विचार घेऊन ते काम करू लागतात या युवकांना दिशा मिळाली पाहीजे, असे कार्य मुळ संस्थेने करणेसुध्दा तितकेच महत्वाचे आहे. मात्र दुर्दैवाने तसे होत नाही. भगव्या टोप्यांचा जत्था म्हणजे गुरुदेव सेवा मंडळ नाही तर सर्वांगिण विकास करण्याची तळमळ ज्यांच्या मनात आहे, अशा समुहाला गुरुदेव सेवा मंडळ राष्ट्रसंतांनी म्हटले आहे. हा धागा लक्षात ठेऊन सेवा मंडळाची दिशा ठरली पाहिजे, असे मत आपल्या अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ गुरुदेव प्रचारक आचार्य वेरुळकर गुरुजी यांनी मांडले.    डाँ. बाबासाहेब आंबेडकर खुले  नाट्यगृहात सुरु असलेल्या सहाव्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या  दिवशी श्री गुरुदेव सेवा मंडळाची दशा व दिशा या विषयावर परिसंवाद पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आजीवन प्रचारक डॉ. भास्करराव विघे गुरुजी, डॉ. माधवराव सुर्यवंशी, ज्येष्ट प्रचारक तिमांडे महाराज, ग्रामगिताचार्य सुनील महाराज लांजुळकर आदी उपस्थित होते.    या परिसंवादाचे प्रमुख वत्तेâ म्हणून आचार्य वेरूळकर गुरुजी यांनी युवकांना ग्रामगीतेच्या आचरणाचे आवाहन केले.  राष्ट्रसंतांनी प्रचारकाकडे विशेष लक्ष दिले आहे. सध्याच्या काळात गावागावात महाराजांच्या विचारांचे कार्यक्रम होत आहेत. मात्र या कार्यक्रमाला पाहिजे ती दिशा मिळाली नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली.     ग्रामगीता नुसतेच वाचून चालणार नाही तर ती आचरणात सुद्धा आणली पाहिजे, यासाठी गुरुदेव सेवा मंडळाने गावपातळीवर काम मोठ्या प्रमाणावर सुरु झाले आहे, मात्र कार्याला दिशा मिळाली नाही. हि दिशा मिळण्यासाठी सेवा मंडळाच्या प्रत्येक कार्यकत्र्याने आपले वर्तन चांगले ठेवले पाहिजेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ गुरुदेव प्रचारक आचार्य वेरुळकर गुरुजी यांनी येथे केले.     आजीवन प्रचारक डॉ. भास्करराव विघे गुरुजी यांनी राष्ट्रसंतांना अभिप्रेत असलेले युवक आपल्या भाषणातून मांडले. आज या संमेलनातून शेकडो युवक कार्यकर्ते निर्माण झाले पाहिजेत, आणि राष्ट्रसंतांचा विचार त्यांनी घराघरात पोहोचवला पाहिजे, असा आशावाद व्यक्त करीत राष्ट्रसंतांची ग्रामविकास चळवळ विषद केली. गावाचा विकास करायचा असेल तर युवकांनी जागृत झालं पाहिजे. ही जागृती राष्ट्रसंतांच्या विचारातून मिळेल. त्यासाठी राष्ट्रसंतांचे साहित्याने प्रत्येकांने वाचली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.    युवकांनी नुसते शिक्षण घेऊन चालणार नाही तर रोजगाराकडे वळले पाहिजे, गुरुदेव सेवा मंडळाच्या तरुणांनी इतर संप्रदायांंना दिशा देण्याचे काम राष्ट्रसंताच्या विचारातून निर्भयता मिळते, ही निर्भयता सेवा मंडळातील युवकांमध्ये आली पाहिजेत, असा विचार त्यांनी व्यक्त केला. या परिसंवादाचे सुत्रसंचलन प्रा. मनिष  देशमुख यांनी केले.

टॅग्स :AkolaअकोलाRashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराजcultureसांस्कृतिक