शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

भूजल पातळीत मोठी घट; ओलिताची शेती होतेय कोरडवाहू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 15:23 IST

घटती भूजल पातळी, वारेमाप वृक्षतोड या सर्वांचा परिणाम जमिनीवर होऊन ओलिताचे पीक फळबागा सिंचन शेतकऱ्यांना कठीण होत आहे.

- सत्यशील सावरकर लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : दरवर्षी होत असलेले कमी पर्जन्य, हवामानातील ओझोन व प्रखर उष्णतेने पाण्याच्या नैसर्गिक स्रोताचे विघटन, घटती भूजल पातळी, वारेमाप वृक्षतोड या सर्वांचा परिणाम जमिनीवर होऊन ओलिताचे पीक फळबागा सिंचन शेतकऱ्यांना कठीण होत आहे. त्यामुळे ओलिताखालील जमीन निम्म्यावर येऊन जमिनीचा पोत बंजर होत असल्याचे विदारक चित्र ड्रायझोनची चाहूल देत आहे.तालुका भौगोलिकदृष्ट्या चार भागात असून, कळासपट्टी सातपुडा पायथा, मध्यभाग, खारपाणपट्टा, दक्षिणेस नदी पठार भागात व्यापला आहे. यामध्ये लागवडीखालील ६५ हजार १२९ हे.आर., लागवडीलायक ५५ हजार ९११ हे.आर. जमीन आहे. यामध्ये ओलिताची व कोरडवाहू जमीन येते. खरीप व रब्बी अशी दोन्ही पिकासाठी सुपिक असलेला हा तालुका वान लाभ क्षेत्रातील ओलीत व सिंचन विहीर, कूपनलिकाद्वारे ओलिताखाली होता. आजही वान हनुमान सागर धरण लाभ क्षेत्रात २५हजार २८ हे.आर. पैकी १९ हजार १७७ हे.आर. सिंचन अपेक्षित असते, हे पाणी रब्बी पिकाला मिळते. उर्वरित शेतजमिनीवर कळासपट्टी व मध्यभागात जास्त सिंचन होऊन फळबाग लागवड करण्यात येते. खारपाणपट्टा व दक्षिण भागात सिंचन कमी होते. तालुक्यातील ओलिताखालील जमीन ही कूपनलिकाद्वारे सिंचनाखाली आहे; परंतु दिवसेंदिवस पाण्याची भूजल पातळी तळाला जात आहे. आज रोजी कळासपट्टी व मध्यभागातील पातळी तीनशे फुटाच्यावर गेली असल्याने या भागातील उभ्या केळी, संत्रा झाडे, पान पिंपरी, भाजीपाला पिके धोक्यात आले आहेत. कित्येक शेतकऱ्यांनी उभ्या बागा पाण्यामुळे तोडल्या आहेत. याच भागातील सातपुडा पर्वतरांगेतून तालुक्यातील नदीनाल्याचा उगम आहे; परंतु मुख्य नदी पूर्णा, आस, विदु्रपा, पोहरा, गौतमा या कमी पावसाने बंजर होत असल्याचे चित्र आहे. या नद्यांसह नाले पावसाळ्यातच कोरडे पडतात. त्यामुळे परिसरात ‘पाणी अडवा, जिरवा’ न होत असल्याने भूजल पातळी दिवसेंदिवस खोल जात आहे. तालुक्यातील चारही बाजूंनी पाणी पातळीने तळ गाठला असल्याने ओलिताखालील क्षेत्रात घट होऊन जमीन कोरडवाहू होत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाTelharaतेल्हाराagricultureशेती