शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
3
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
4
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
5
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
6
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
7
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
8
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
9
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
10
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
11
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
12
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
13
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
14
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
15
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
16
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
17
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
18
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
19
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
20
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’

विद्युत मंडळ पतसंस्थेत बाबासाहेबांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:12 IST

बीपीएल उत्पन्न मर्यादेची क्षमता वाढवा अकोला : बीपीएलचा लाभ २० हजार उत्पन्न मर्यादा असलेल्या नागरिकांना दिल्या जात आहे; ...

बीपीएल उत्पन्न मर्यादेची क्षमता वाढवा

अकोला : बीपीएलचा लाभ २० हजार उत्पन्न मर्यादा असलेल्या नागरिकांना दिल्या जात आहे; परंतु नागरिकांच्या उत्पन्न मर्यादेत वाढ झाली असल्याने बीपीएल यादीची उत्पन्न मर्यादा ५० हजार रुपयांपर्यंत वाढवावी, अशी मागणी करण्यात येत आहे. अनेक नागरिक बीपीएलपासून वंचित आहेत.

ग्रामीण भागात रॉकेल मिळण्यास अडचण

बाेरगाव मंजू : परिसरात अवैधरित्या रॉकेलची सर्रास विक्री होत असली तरी ग्रामीण भागात अनेक नागरिकांना राॅकेल मिळत नसल्याचे दिसून येेते. अनेक रॉकेल दुकानदार गैरमार्गाने रॉकेल विकत आहेत. त्यामुळे पुरवठा विभागाने संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

पाण्याचा अपव्यय

अकाेल : शहरातील विविध वॉर्डात अनेक नळधारक पाणी भरून झाल्यावर घरातील पाण्याच्या टाकीचा नळ बंद करत नसल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होत आहे. त्यामुळे नळांना मीटर लावण्याची मागणी काही नागरिकांनी केली आहे. बहुतांश नागरिक पाणी वाया जात असतानाही कानाडाेळा करतात.

शिधापत्रिका अद्ययावत करा

अकाेला : सार्वजनिक वितरण प्रणाली अद्ययावत करण्यासाठी राज्यात शिधापत्रिकांचे संगणकीकरण करण्याचे काम सुरू झाले आहे. जिल्ह्यात हे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. शिधापत्रिकेवर नाव नाेंदणी हाेऊनही तीन ते चार महिन्यापर्यंत संगणकीकरण हाेत नसल्याने लाेकांना धान्याचा लाभ मिळत नाही.

पशुखाद्याचे दर वाढले पशुपालक चिंतेत

शिवणी : दुधाचे दर कमी करून शेतकरी व पशुपालकावर पुन्हा दुष्काळात आघात केला आहे. अल्प, अत्यल्प शेतकरी, शेतमजूर यांचा दुधाचा व्यवसाय आधार असतो. हा व्यवसाय त्यांच्या आठवड्याचा खर्च भागवितो. दुधाचे दर जनावरांच्या खाद्य, खुराक यांचा भाव बरोबरच असल्यामुळे दुग्ध व्यवसायकांची कुचंबणा होत आहे.

शहरात हाेतेय वाहतुकीची कोंडी

अकाेला : शहरात अनेक मार्गांवर रस्त्यावरच वाहने उभी केली जात असल्याने वारंवार वाहतुकीची कोंडी होत आहे. इन्कम टॅकस चाैकात रस्ता रुंद हाेऊनही केवळ अशा वाहनांमुळे रुंद रस्त्याचा उपयाेेग घेता येत नाही. तसेच अशाेक वाटिका परिसरात उड्डाण पुलाचे काम सुरू असल्याने येथील वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

घरकुल अनुदान पध्दतीत बदल करा

बाेरगाव : बेघर कुटुंबांना हक्काचे घर अनुदानाच्या रकमेतून शासनाच्या माध्यमातून दिला जातो. परंतु अनुदान देण्याची जाचक अट असल्यामुळे लाभार्थींची आर्थिक कोंडी होते. त्यामुळे लाभार्थी कर्जबाजारी होतो. या प्रकाराकडे शासनकर्त्यांनी लक्ष देऊन अनुदान देण्याच्या पध्दतीत बदल करण्याची मागणी लाभार्थींनी केली आहे.