शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

विद्युत मंडळ पतसंस्थेत बाबासाहेबांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:12 IST

बीपीएल उत्पन्न मर्यादेची क्षमता वाढवा अकोला : बीपीएलचा लाभ २० हजार उत्पन्न मर्यादा असलेल्या नागरिकांना दिल्या जात आहे; ...

बीपीएल उत्पन्न मर्यादेची क्षमता वाढवा

अकोला : बीपीएलचा लाभ २० हजार उत्पन्न मर्यादा असलेल्या नागरिकांना दिल्या जात आहे; परंतु नागरिकांच्या उत्पन्न मर्यादेत वाढ झाली असल्याने बीपीएल यादीची उत्पन्न मर्यादा ५० हजार रुपयांपर्यंत वाढवावी, अशी मागणी करण्यात येत आहे. अनेक नागरिक बीपीएलपासून वंचित आहेत.

ग्रामीण भागात रॉकेल मिळण्यास अडचण

बाेरगाव मंजू : परिसरात अवैधरित्या रॉकेलची सर्रास विक्री होत असली तरी ग्रामीण भागात अनेक नागरिकांना राॅकेल मिळत नसल्याचे दिसून येेते. अनेक रॉकेल दुकानदार गैरमार्गाने रॉकेल विकत आहेत. त्यामुळे पुरवठा विभागाने संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

पाण्याचा अपव्यय

अकाेल : शहरातील विविध वॉर्डात अनेक नळधारक पाणी भरून झाल्यावर घरातील पाण्याच्या टाकीचा नळ बंद करत नसल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होत आहे. त्यामुळे नळांना मीटर लावण्याची मागणी काही नागरिकांनी केली आहे. बहुतांश नागरिक पाणी वाया जात असतानाही कानाडाेळा करतात.

शिधापत्रिका अद्ययावत करा

अकाेला : सार्वजनिक वितरण प्रणाली अद्ययावत करण्यासाठी राज्यात शिधापत्रिकांचे संगणकीकरण करण्याचे काम सुरू झाले आहे. जिल्ह्यात हे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. शिधापत्रिकेवर नाव नाेंदणी हाेऊनही तीन ते चार महिन्यापर्यंत संगणकीकरण हाेत नसल्याने लाेकांना धान्याचा लाभ मिळत नाही.

पशुखाद्याचे दर वाढले पशुपालक चिंतेत

शिवणी : दुधाचे दर कमी करून शेतकरी व पशुपालकावर पुन्हा दुष्काळात आघात केला आहे. अल्प, अत्यल्प शेतकरी, शेतमजूर यांचा दुधाचा व्यवसाय आधार असतो. हा व्यवसाय त्यांच्या आठवड्याचा खर्च भागवितो. दुधाचे दर जनावरांच्या खाद्य, खुराक यांचा भाव बरोबरच असल्यामुळे दुग्ध व्यवसायकांची कुचंबणा होत आहे.

शहरात हाेतेय वाहतुकीची कोंडी

अकाेला : शहरात अनेक मार्गांवर रस्त्यावरच वाहने उभी केली जात असल्याने वारंवार वाहतुकीची कोंडी होत आहे. इन्कम टॅकस चाैकात रस्ता रुंद हाेऊनही केवळ अशा वाहनांमुळे रुंद रस्त्याचा उपयाेेग घेता येत नाही. तसेच अशाेक वाटिका परिसरात उड्डाण पुलाचे काम सुरू असल्याने येथील वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

घरकुल अनुदान पध्दतीत बदल करा

बाेरगाव : बेघर कुटुंबांना हक्काचे घर अनुदानाच्या रकमेतून शासनाच्या माध्यमातून दिला जातो. परंतु अनुदान देण्याची जाचक अट असल्यामुळे लाभार्थींची आर्थिक कोंडी होते. त्यामुळे लाभार्थी कर्जबाजारी होतो. या प्रकाराकडे शासनकर्त्यांनी लक्ष देऊन अनुदान देण्याच्या पध्दतीत बदल करण्याची मागणी लाभार्थींनी केली आहे.