शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पात्र शेतकर्‍यांच्या ‘ग्रीन’ याद्या ‘अपलोड’ करण्याचे काम सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 01:43 IST

अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या  शेतकर्‍यांच्या ‘ग्रीन’ याद्या शासनाच्या ‘पोर्टल’वर ‘अपलोड’  करण्याचे काम शासनाच्या यंत्रणेमार्फत सुरू करण्यात आले  आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील कर्जमाफीसाठी १ लाख ९१ हजार  १३१ शेतकर्‍यांच्या याद्या ‘अपलोड’ करण्याची प्रक्रिया सुरू  करण्यात आली आहे.

ठळक मुद्देशेतकरी कर्जमाफी जिल्हय़ातील १ लाख ९१ हजार शेतकर्‍यांचा समावेशप्रमाणपत्र दिलेल्या ५६ शेतकर्‍यांना आज मिळणार प्रत्यक्ष कर्जमाफी!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या  शेतकर्‍यांच्या ‘ग्रीन’ याद्या शासनाच्या ‘पोर्टल’वर ‘अपलोड’  करण्याचे काम शासनाच्या यंत्रणेमार्फत सुरू करण्यात आले  आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील कर्जमाफीसाठी १ लाख ९१ हजार  १३१ शेतकर्‍यांच्या याद्या ‘अपलोड’ करण्याची प्रक्रिया सुरू  करण्यात आली आहे. सन २00९ ते ३0 जून २0१६ पर्यंत राज्यातील थकबाकीदार  शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.  कर्जमाफी योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकर्‍यांना दीड लाख रु पयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार असून, कर्जाची नियमित पर तफेड करणार्‍या शेतकर्‍यांना २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर  अनुदान आणि कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेल्या शेतकर्‍यांना  विशेष योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्हय़ा तील थकबाकीदार शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे ‘ऑनलाइन’ अर्ज  शासनाच्या ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर भरण्याचे काम  २२ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यात आले. ऑनलाइन भरलेल्या  अर्जांच्या पडताळणीत जिल्ह्यात १ लाख ९१ हजार १८७ शे तकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरविण्यात आले. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीयीकृत  बँकांच्या थकबाकीदार शेतकर्‍यांचा समावेश आहे.  कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांपैकी ५६ शेतकर्‍यांना  १८ ऑक्टोबर रोजी कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात आले.  जिल्ह्यातील उर्वरित कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या १ लाख ९१  हजार १३१ शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू  करण्यात आली आहे. त्यामध्ये पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांच्या  ‘ग्रीन’ याद्या शासनाच्या ‘पोर्टल’वर ‘अपलोड’ करण्याचे काम  शासनाच्या यंत्रणेमार्फत सुरू करण्यात आले आहे. 

प्रमाणपत्र दिलेल्या ५६ शेतकर्‍यांना आज मिळणार प्रत्यक्ष  कर्जमाफी!कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील पात्र  ठरलेल्या शेतकर्‍यांपैकी ५६ शेतकर्‍यांना गत १८ ऑक्टोबरला  कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात आले. कर्जमाफीचे प्रमाणपत्र  दिलेल्या या शेतकर्‍यांच्या कर्ज खात्यात मंगळवार, २४ ऑ क्टोबर रोजी कर्जाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे  संबंधित ५६ शेतकर्‍यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ मंगळवारी  मिळणार आहे. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि  राष्ट्रीयीकृत बँकांच्या थकबाकीदार खातेदार शेतकर्‍यांचा  समावेश आहे.

कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्या तील शेतकर्‍यांच्या ‘ग्रीन’ याद्या शासनाच्या ‘पोर्टल’वर ‘अ पलोड’ करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच  कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात आलेल्या ५६ शेतकर्‍यांच्या कर्ज  खात्यात २४ ऑक्टोबरला कर्जाची रक्कम जमा करून  कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे.-जी.जी. मावळेजिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)

टॅग्स :agricultureशेती