शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
2
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
3
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
4
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
5
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
6
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
7
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
8
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
9
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
10
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
11
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
12
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
13
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
14
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
15
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
16
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
17
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
18
MS Dhoni च्या तालमीत तयार झालेल्या CSK क्रिकेटरने दिली गुड न्यूज, लवकरच होणार 'बाबा'
19
BMC Election 2026: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
20
"मुलगी मित्रांसोबत गेली...", रक्ताच्या थारोळ्यात सापडली नववीची विद्यार्थिनी; ICU मध्ये मृत्यूशी झुंज
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी संस्थांना नावीन्यपूर्ण प्रकल्पांसाठी मिळणार अनुदान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 12:47 IST

अकोला : अटल अर्थसाहाय्य योजनेंतर्गत राज्यातील सहकारी संस्थांना नावीन्यपूर्ण प्रकल्प उभारणीसाठी ४० लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. त्यासाठी जिल्हा उपनिबंधकांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समित्यांकडून सहकारी संस्थांचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

अकोला : अटल अर्थसाहाय्य योजनेंतर्गत राज्यातील सहकारी संस्थांना नावीन्यपूर्ण प्रकल्प उभारणीसाठी ४० लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. त्यासाठी जिल्हा उपनिबंधकांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समित्यांकडून सहकारी संस्थांचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.राज्यातील सहकारी संस्थांच्या व्यवसाय-प्रकल्पांना प्रोत्साहन देण्याकरिता ‘सहकारी संस्थांसाठी अटल अर्थसाहाय्य योजना’ ही नवीन योजना राबविण्याचा निर्णय शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत २ जानेवारी रोजी घेण्यात आला. सहकारी संस्थांचे व्यवसाय-प्रकल्प कार्यान्वित करून रोजगार निर्मिती करण्यासाठी तसेच ग्रामीण विकासास साहाय्यभूत ठरणाऱ्या आणि सहकारी संस्थांच्या कृषी व कृषीपूरक उद्योगास प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत नावीन्यपूर्ण व्यवसाय-प्रकल्प उभारणीसाठी सहकारी संस्थांना ४० लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळामार्फत होणार आहे. योजनेंतर्गत नावीन्यपूर्ण प्रकल्प उभारणीचे सहकारी संस्थांचे जिल्हानिहाय प्रस्ताव जिल्हा उपनिबंधकांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समित्यांमार्फत मागविण्यात आले आहेत. सहकारी संस्थांचे प्राप्त झालेले प्रस्ताव जिल्हास्तरीय समित्यांकडून शिफारशीसह सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय समितीकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहेत.‘या’ प्रकल्पांचा आहे समावेश!सहकारी संस्थांना नावीन्यपूर्ण प्रकल्प उभारणीसाठी अटल अर्थसाहाय्य योजनेंतर्गत ४० लाख रुपये मर्यादेपर्यंत अनुदान उपलब्ध होणार आहे. त्यासाठी या योजनेत धान्य-फळे, भाजीपाला प्रतवारी स्वच्छता यंत्र, गोदाम, दुय्यम प्रक्रिया युनिट, ट्रान्सपोर्टेशन व्हॅन, माबाइल रिटेल व्हॅन, सहकारी रिटेल शॉप, जल शुद्धीकरण प्रकल्प-वॉटर एटीएएम प्रकल्प, कृषी माल पॅकेजिंग-लेबलिंग युनिट, कापडी-ज्युट पिशव्या निर्मिती व आदिवासी, डोंगरी भागातील लोकांच्या गरजांच्या अनुषंगाने शेतमाल-सुगी पश्चात नावीन्य प्रकल्प इत्यादी नऊ प्रकल्पांचा समावेश आहे.३४ जिल्ह्यांसाठी ४९० कोटींचे अनुदान मंजूर!सहकारी संस्थांना नावीन्यपूर्ण प्रकल्प उभारणीसाठी शासनामार्फत राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील ३५५ तालुक्यांतील सहकारी संस्थांसाठी ४९० कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. 

शासन निर्णयानुसार सहकारी संस्थांना नावीन्यपूर्ण प्रकल्प उभारणीसाठी अनुदान ४० लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी सहकारी संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.- गोपाळ मावळे,जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था), अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजना