शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्याला मिळालेले अनुदान दिले अमरावती जिल्ह्याला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 13:38 IST

आमदार रणधीर सावरकर यांनी विभागीय कृषी सहसंचालकांची कानउघाडणी केली.

अकोला: ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचे अकोला जिल्ह्याला मिळालेले अनुदान विभागीय कृषी सहसंचालकांनी परस्पर अमरावती जिल्ह्याला दिले. हा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर शासकीय अधिकाºयांचा अन्याय आहे. याबाबत आमदार रणधीर सावरकर यांनी विभागीय कृषी सहसंचालकांची कानउघाडणी केली.‘मागेल त्याला शेततळे’ ही भाजपा शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेसाठी जिल्ह्यातून ७९ लाख रुपये अनुदानाची मागणी शासनाकडे नोंदविली होती. त्यानुसार शासनाने नुकतेच ३१.५० लाख रुपये अनुदान दिले. तथापि, यातील १५ लाख रुपये अनुदान विभागीय कृषी सहसंचालक यांनी बेकायदेशीरपणे अमरावती जिल्ह्याकडे वळते केले. कृषी आयुक्तालयाने एकमेव अकोला जिल्ह्यासाठी ३१.५० लाख रुपये अनुदान वितरित केले. हे अनुदान वळते करण्याचा कोणताही अधिकार नसताना विभागीय कृषी सहसंचालकांनी एका पत्राद्वारे १५ लाख रुपये अनुदान देण्याचा आदेश जिल्हा कृषी अधीक्षक अकोला यांना दिले.जिल्ह्यातील शेतकºयांवर झालेला अन्यायासंदर्भात आ. सावरकर यांनी विभागीय कृषी संचालक अमरावती सुभाष नागरे यांना जाब विचारला असता त्यांनी याबाबत कोणतेही समर्पक उत्तर दिले नाही. सध्या पेरणी, दुष्काळ, दुबार पेरणी अशा संकटात शेतकरी सापडला असताना त्याला पैशाची गरज आहे. कृषी विभागालाही शेतकºयांची ही अवस्था माहीत असताना कृषी विभागाच्या अधिकाºयांची अविवेकी वागणूक समाज व शासनाससुद्धा घातक ठरणारी आहे. त्यामुळे अशा अधिकाºयावर कर्तव्यपालन, शिस्त लावण्यासोबतच कारवाई करावी, असेही आ. रणधीर सावरकर यांनी स्पष्ट केले.पूर्वी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा असा प्रांतिक वाद राजकीय व्यासपीठावर असायचा. आता मात्र जिल्ह्या-जिल्ह्यात वाद निर्माण करण्याचा विडा शासकीय अधिकाºयांनी उचलला का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला असून, अशा निर्णयामुळे जनतेची शासनाप्रती नाराजी निर्माण होईल. त्यामुळे अशा प्रकाराकडे लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे आमदार सावरकर यांनी म्हटले आहे. जिल्ह्यातील शेतकºयांवर होणारा अन्याय कदापिही सहन करणार नाही, तसेच शासकीय अधिकाºयांकडून होणारे जनतेवरील अन्याय आणि भाजप शासनाप्रती असंतोष निर्माण करण्यास कारणीभूत ठरत असलेल्या अधिकाºयांनी सामाजिक दायित्वावा विसर पडू न देता स्वयंशिस्त अंगीकारावी, असे आवाहन आ. रणधीर सावरकर यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAmravatiअमरावतीRandhir Savarkarरणधीर सावरकर