शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
4
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
5
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
6
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
7
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
8
"सेटवर ते मस्ती करायचे पण मी...", अशोक सराफ यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा
9
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
10
आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"
11
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
12
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
13
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
14
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
15
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
16
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
17
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
18
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
19
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
20
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले

अकोला जिल्ह्याला मिळालेले अनुदान दिले अमरावती जिल्ह्याला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 13:38 IST

आमदार रणधीर सावरकर यांनी विभागीय कृषी सहसंचालकांची कानउघाडणी केली.

अकोला: ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचे अकोला जिल्ह्याला मिळालेले अनुदान विभागीय कृषी सहसंचालकांनी परस्पर अमरावती जिल्ह्याला दिले. हा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर शासकीय अधिकाºयांचा अन्याय आहे. याबाबत आमदार रणधीर सावरकर यांनी विभागीय कृषी सहसंचालकांची कानउघाडणी केली.‘मागेल त्याला शेततळे’ ही भाजपा शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेसाठी जिल्ह्यातून ७९ लाख रुपये अनुदानाची मागणी शासनाकडे नोंदविली होती. त्यानुसार शासनाने नुकतेच ३१.५० लाख रुपये अनुदान दिले. तथापि, यातील १५ लाख रुपये अनुदान विभागीय कृषी सहसंचालक यांनी बेकायदेशीरपणे अमरावती जिल्ह्याकडे वळते केले. कृषी आयुक्तालयाने एकमेव अकोला जिल्ह्यासाठी ३१.५० लाख रुपये अनुदान वितरित केले. हे अनुदान वळते करण्याचा कोणताही अधिकार नसताना विभागीय कृषी सहसंचालकांनी एका पत्राद्वारे १५ लाख रुपये अनुदान देण्याचा आदेश जिल्हा कृषी अधीक्षक अकोला यांना दिले.जिल्ह्यातील शेतकºयांवर झालेला अन्यायासंदर्भात आ. सावरकर यांनी विभागीय कृषी संचालक अमरावती सुभाष नागरे यांना जाब विचारला असता त्यांनी याबाबत कोणतेही समर्पक उत्तर दिले नाही. सध्या पेरणी, दुष्काळ, दुबार पेरणी अशा संकटात शेतकरी सापडला असताना त्याला पैशाची गरज आहे. कृषी विभागालाही शेतकºयांची ही अवस्था माहीत असताना कृषी विभागाच्या अधिकाºयांची अविवेकी वागणूक समाज व शासनाससुद्धा घातक ठरणारी आहे. त्यामुळे अशा अधिकाºयावर कर्तव्यपालन, शिस्त लावण्यासोबतच कारवाई करावी, असेही आ. रणधीर सावरकर यांनी स्पष्ट केले.पूर्वी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा असा प्रांतिक वाद राजकीय व्यासपीठावर असायचा. आता मात्र जिल्ह्या-जिल्ह्यात वाद निर्माण करण्याचा विडा शासकीय अधिकाºयांनी उचलला का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला असून, अशा निर्णयामुळे जनतेची शासनाप्रती नाराजी निर्माण होईल. त्यामुळे अशा प्रकाराकडे लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे आमदार सावरकर यांनी म्हटले आहे. जिल्ह्यातील शेतकºयांवर होणारा अन्याय कदापिही सहन करणार नाही, तसेच शासकीय अधिकाºयांकडून होणारे जनतेवरील अन्याय आणि भाजप शासनाप्रती असंतोष निर्माण करण्यास कारणीभूत ठरत असलेल्या अधिकाºयांनी सामाजिक दायित्वावा विसर पडू न देता स्वयंशिस्त अंगीकारावी, असे आवाहन आ. रणधीर सावरकर यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAmravatiअमरावतीRandhir Savarkarरणधीर सावरकर