शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

आजीने अनुभवला जीवन मरणाचा थरार; २० तास अडकून होती नदी पात्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2022 17:06 IST

Grandmother experienced the thrill of life and death : दर्शनासाठी आलेली आजी पुर्णा नदीच्या काठावर असलेल्या घावरु पाय घसरल्याने दुथडी भरुन वाहात असलेल्या पुर्णेच्या प्रवाहात वाहत गेली.

-संजय उमक लोकमत न्यूज नेटवर्क मूर्तिजापूर : तालुक्याच्या सीमेवर असलेल्या ऋणमोचन येथे भाविकांची मुद्गलेश्र्वराच्या दर्शनासाठी नेहमीच गर्दी होत असते, मुद्गलेश्र्वराच्या दर्शनासाठी आलेली आजी पुर्णा नदीच्या काठावर असलेल्या घावरु पाय घसरल्याने दुथडी भरुन वाहात असलेल्या पुर्णेच्या प्रवाहात वाहत गेली; मात्र दैव बलवत्तर म्हणून तिला २० तासानंतर वाचविण्यात ऐंडली च्या युवकांना यश आले. ६७ वर्षे वयाच्या आजीने त्या रात्री जीवन मरणाचा थरार अनुभवला.           त्याचे असे झाले की, अकोला जिल्ह्यातील आपोती येथील ६७ वर्षीय वत्सलाबाई शेषराव राणे या २१ जुलै रोजी भातकुली येथील बहिणीच्या मुलाकडे जात असताना वाटेतच असलेल्या ऋणमोचन येथील मुद्गलेश्र्वराच्या दर्शनासाठी त्या बस मधून उतरल्या, मुद्गलेश्र्वराचे दर्शन घेऊन (पयोष्णी) पुर्णा नदीच्या दर्शनासाठी व जवळ असलेला प्रसाद विसर्जनासाठी त्या आजीबाई घटावर उतरत असताना अचानक पाय घसरल्याने त्या थेट नदी पात्रात पडल्या, नदीला मोठ्या प्रमाणात पुर असल्याने त्या प्रवाहात वाहत असल्याचे तेथे उपस्थित एका तरुणाच्या लक्षात येतातच त्याने आजीला वाचविण्याचे शर्तीचे प्रयत्न केले परंतु पाण्याला प्रचंड खळखळाट असल्याने तो त्याला ठिकाणी आजीला वाचविण्यात अपयश आले. ४ वाजता पासून नदीत वाहून गेलेली आजी नागरीकांनी शोधून पुन्हा दिसलीच नाही. आजी जिवंत असल्याच्या आशा संपल्या होत्या

२१ जुलै रोजी ४ वाजता वाहून गेलेली आजी आता जिवंत मिळणार नाही, तशी आशाच उरली नसल्याने तिचा मृतदेह नदीत वाहून जाणार आहे. तिचा मृतदेह वाहून आला तर तो आपण पकडू यासाठी ऐंडली येथील पुलावर बसून तिच्या मृतदेहाची नागरिक रात्री ९ वाजेपर्यंत बसले, परंतु काहीच हाती आले नसल्याने आता आजी जिवंत नाही तिचा मृतदेह वाहून गेला असावा अशी धारणा नागरीकांची झाली होती. असा अनुभवला जीवन मृत्यू चा थरार

 २१ जुलै रोजी दुपारी ४ वाजता वाहून गेलेली आजीच्या हातात काही अंतरावरच पुराच्या पाण्यात असले झुडूप लागले, तिने तेव्हा पासून तर २२ जुलै रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत ते धरुन ठेवले, ती किर्र अंधारी रात्र आजीने जीव मुठीत धरून पाण्यातच काढली, दुसऱ्या दिवशी शेतात जाणाऱ्या काही नागरिकांनां आजीने हाक दिली तेव्हा आजी नदीतच अडकून पडली असून ती जिवंत असल्याने मूर्तिजापूरात असलेल्या ऐंडली येथील युवकांना बोलावून आजीला सुखरूप बाहेर काढण्यात आले.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAkolaअकोलाfloodपूर