शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

जन्म, मृत्यू, विवाहप्रसंगी ग्रामपंचायत देणार रोपांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 13:46 IST

अकोला: वर्तमानासोबतच येत्या काळात वातावरणात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या बदलांना सामोरे जाण्यासाठी ग्रामविकास विभागाने ‘क्लायमेट प्रूफ व्हिलेज’ निर्मितीवर भर देण्याची तयारी सुरू केली आहे.

ठळक मुद्देग्रामविकास विभागाने ‘क्लायमेट प्रूफ व्हिलेज’ निर्मितीवर भर देण्याची तयारी सुरू केली आहे.ग्रामपंचायतीमार्फत गावातील बालकांचा जन्म, विवाह, परिक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थी, मृत्यूप्रसंगी रोप भेट देण्याचा उपक्रम चालू वर्षात राबवला जाणार आहे. गावात निधन झालेल्या व्यक्तीच्या घरी फळझाडाचे रोप देऊन श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे.

अकोला: वर्तमानासोबतच येत्या काळात वातावरणात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या बदलांना सामोरे जाण्यासाठी ग्रामविकास विभागाने ‘क्लायमेट प्रूफ व्हिलेज’ निर्मितीवर भर देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत गावातील बालकांचा जन्म, विवाह, परिक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थी, मृत्यूप्रसंगी रोप भेट देण्याचा उपक्रम चालू वर्षात राबवला जाणार आहे. त्या रोपांची संगोपन करण्याची जबाबदारीही संबंधितांना दिली जाणार आहे.‘वृक्षाची जोपासना हीच निसर्गाची उपासना’ हा उपक्रम ग्रामपंचायतीमार्फत येत्या वर्षात राबवला जाणार आहे. त्यासाठी रोपांची उपलब्धता करून घेण्याचे ग्रामविकास विभागाने बजावले आहे.येत्या काळात जागतिक वातावरणीय बदलामुळे कमालपेक्षा किमान तापमानामध्ये मोठी वाढ होणार आहे. त्याचा परिणाम पर्जन्यमान, उष्णता व आर्द्रतेवर होणार आहे. वातावरणात होणाºया बदलातही मानवी जीवन, पिके, पर्यावरणातील घटकांनी तग धरावी, यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्याचे आव्हान शासनापुढे आहे. त्या वातावरणीय बदलास पूरक ठरणाºया गावांची निर्मितीचा प्रयत्न शासनाला करावा लागत आहे. त्यामध्ये गावपातळीवर लोकसहभागातून पर्यावरण संवर्धनासाठी उपक्रम राबवणे, जलसंधारण, डोंगर दत्तक घेणे, नदी दत्तक घेणे, गावतळे, गावाची वनराई योजनांचा विकास करणे, गावनिहाय सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आधारित स्वतंत्र ग्रिड तयार करून ऊर्जा निर्भर गावांची निर्मिती केली जाणार आहे. त्यापैकी महत्त्वाची असलेल्या वृक्षलागवडीची जबाबदारी ग्रामपंचायतीवर देण्यात आली. त्यासाठी येत्या वर्षभरात गावात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचा उपक्रम राबवला जात आहे. प्रत्येक कुटुंबाकडून रोपांची लागवड व्हावी, त्याचे संगोपन व्हावे, यासाठी ग्रामपंचायतीकडून रोपे देण्याची तयारी आहे.- माहेरची झाडी, स्मृती वृक्षही लावणारग्रामपंचायतीला ठरवून दिल्याप्रमाणे गावात या वर्षात जन्माला आलेल्या बालकांचे स्वागत फळझाडाच्या रूपात शुभेच्छा वृक्ष देऊन केले जाईल. तसेच कुटुंबीयांना बाळाप्रमाणे संवर्धन करण्याची गळ घातली जाईल. गावातील तरुणांच्या विवाहप्रसंगी शुभमंगल वृक्ष, तसेच मुलींच्या विवाहप्रसंगी माहेरची झाडी म्हणून रोप दिली जातील. शालेय परीक्षा उत्तीर्ण होणारे, नोकरी मिळणारे, निवडणुकीत विजयी होणाºया उमेदवारांनाही आनंदवृक्ष म्हणून रोप दिले जातील. गावात निधन झालेल्या व्यक्तीच्या घरी फळझाडाचे रोप देऊन श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. ग्रामपंचायत करणार रोपांचा खर्चरोप उपलब्ध करण्यासाठी ग्रामपंचायतींनी स्वउत्पन्नातून खर्च करावयाचा आहे. त्याशिवाय पर्यावरण प्रेमी, दानशूर व्यक्ती, सामाजिक दायित्व निधीही खर्च होणार आहे. १ जुलै रोजी होणार वाटपगेल्या वर्षभरात म्हणजे, १ जुलै ते ३० जून दरम्यानच्या काळातील सर्वच घटना, प्रसंगांची माहिती घेत किती रोपांची गरज आहे, त्यानुसार रोपे मागवावी, त्या रोपांचे वाटप १ जुलै रोजी एकाच दिवशी केले जाईल. रोपांचे वाटप करण्यापूर्वी गावात वृक्षदिंडी काढली जाईल. विशेष म्हणजे, वाटप केलेल्या रोपांची नोंद ग्रामपंचायतींच्या नोंदवहीत होणार आहे.

टॅग्स :Akolaअकोलाgram panchayatग्राम पंचायत