शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

Gram Panchayat Election : अकोला जिल्ह्यात ३३५ सदस्य अविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 13:10 IST

Gram Panchayat Election: ३३५ उमेदवारांची ग्रामपंचायत सदस्य म्हणून अविरोध निवड निश्चित झाली आहे.

ठळक मुद्दे३३५ जागांवर प्रत्येकी एकच उमेदवारांचा अर्ज आहे.अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार.

अकोला: जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे चित्र सोमवारी स्पष्ट झाले. त्यामध्ये एका जागेसाठी एकाच उमेदवाराचा अर्ज राहिलेल्या ३३५ उमेदवारांची ग्रामपंचायत सदस्य म्हणून अविरोध निवड निश्चित झाली आहे.

मुदत संपलेल्या जिल्ह्यातील सातही तालुक्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ४ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजतापर्यंत होती. या मुदतीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले. त्यामध्ये जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींच्या ३३५ जागांवर प्रत्येकी एकच उमेदवारांचा अर्ज राहिल्याने या उमेदवारांची ग्रामपंचायत सदस्यपदी अविरोध निवड झाल्याचे निश्चित झाले आहे. संबंधित सदस्यांची अविरोध निवड झालेल्या सदस्यांचा अहवाल जिल्हा प्रशासनामार्फत राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार असून, आयोगाची मान्यता प्राप्त झाल्यानंतर संबंधित सदस्यांची अविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात येणार आहे, असे निवासी उप जिल्हाधिकारी संजय खडसे यांनी सांगितले.

१० ग्रामपंचायती अविरोध

जिल्ह्यात १० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सर्व जागांवर प्रत्येकी एकच उमेदवाराचा अर्ज कायम राहिल्याने या ग्रामपंचायतींच्या ७४ सदस्यांची अविरोध निवड निश्चित झाली. त्यामध्ये तेल्हारा तालुक्यातील २, अकोट तालुक्यातील ३, मूर्तिजापूर तालुक्यातील २, बाळापूर तालुक्यातील २ व बार्शिटाकळी तालुक्यातील १ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकAkolaअकोला