शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पदवीधरांचे रण‘जित’ !

By admin | Updated: February 7, 2017 03:30 IST

भाजपाचा सलग दुसरा विजय; मुख्यमंत्र्यांसह पक्षाची प्रतिष्ठा कायम

अकोला, दि. ६- वर्षभराआधीपासून मतदार नोंदणीसाठी मेहनत घेऊन केलेली मतदार नोंदणी न्यायालयाने ऐनवेळी रद्द केली, भाजपा अंतर्गत गटबाजी फोफावली, संपत्तीसह खोट्या शप थपत्रांची प्रकरणे उकरून काढण्याची मोहीम सुरू झाली, काँग्रेसने प्रथमच तगडा उमेदवार देऊन निवडणूक प्रचाराची राळ उडवली, तर काही उमेदवारांसाठी समाजाच्या नावावर म तदान जुळविण्याची खेळी सुरू झाली, अशा सर्व पृष्ठभूमीवर डॉ.रणजित पाटील यांनी पदवीधर मतदारसंघाचे ह्यरणह्ण पुन्हा ह्यजितह्ण करून भाजपाला सलग दुसरा विजय मिळवून दिला आहे. तसं पाहिलं तर, या निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच डॉ. रणजित पाटील यांचे पारडे जड होते. वर्षभराआधीच डॉ.पाटील हे निवडणुकीच्या तयारीला लागले होते. पाचही जिल्ह्यांतील विविध सामाजिक संघटना, युवा मंडळे, महिलांच्या संघटना यासोबतच बुलडाणा अर्बनसारख्या पतसंस्था अन् मोठय़ा शाळा, महाविद्यालयांच्या माध्यमातून मतदार नोंदणी करण्यास डॉ.पाटील यांनी प्राधान्य दिले. नोंदविलेला मतदार या मतदानाला जाईल इथपर्यंत या निवडणुकीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतल्यामुळे कधीकाळी गुपचूप होणारी ही निवडणूक प्रथमच सार्वत्रिक निवडणुकीसारखी रंगतदार झाली. या नियोजनाचे फळ डॉ.पाटील पर्यायाने भाजपाच्या पदरात पडले आहे. यशाचे बाप हजार असतात, असे म्हटले जाते; परंतु या निवडणुकीत यशाचे ङ्म्रेय हे मुख्यमंत्र्यांनी दाखविलेला विश्‍वास सार्थ करणारे कार्यकर्ते अन् डॉ.पाटील यांच्या संयमी नियोजनालाच द्यावे लागेल. निवडणुकीच्या तोंडावर कुठल्याही वादांवर भाष्य करून प्रकरणे वाढविण्यापेक्षा संयम अन् सामंजस्याची भूमिका घेतली. त्यामुळेच गटबाजीचा फटका म तदानात बसल्याचे प्रथमदर्शनी तरी दिसत नाही. दुसरीकडे काँग्रेसने दिलेली टक्कर ही तितकीच महत्त्वाची आहे. काँग्रेसने प्रथमच या मतदारसंघात अधिकृत उमेदवार जाहीर केला होता. संजय खोडके यांचे नेटवर्क, मॅनेजमेंट कौशल्य याचा विचार करून त्यांची निवड केली. खोडके यांनीही पाचही जिल्हे पिंजून काढत, ही निवडणूक चुरशीची केली; मात्र ते विजयापर्यंत पोहोचू शकले नाहीत. उमेदवार हा निवडणूक लढत असतो; पण कार्यकर्तेही निवडणुकीत झोकून देतात; काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक ह्यनिवडणुकीसारखीह्ण लढली नाही तर या दोन्ही पार्टीचे नेते खोडके यांना बळ देण्यात कमी पडले, हे मान्यच करावे लागेल. प्रहारच्या बच्चू कडू यांनीही निवडणुकीत झोकून देत डॉ.दीपक धोटे यांच्यासाठी घेतलेली मेहनत रंग घेऊ शकली नाही अन् डॉ.अविनाश चौधरी यांच्यासाठी एकवटलेला समाजही त्यांना यशापर्यंत पोहोचवू शकला नाही. मुळातच ही निवडणूक सुशिक्षितांची निवडणूक आहे. शिक्षण क्षेत्रातील संघटनांचा बोलबाला या निवडणुकीत असायचा; पण आता तो पूर्णपणे संपला असून, ही निवडणूक शतप्रतिशत राजकीय झाली आहे, त्यामुळे साम-दाम-दंड-भेद या निवडणुकीत घुसले, ते आता बाहेर निघणार नाही, त्यामुळे येणार्‍या काळात या निवडणुकीचे व निवडणुकीतील जय-पराजयाचे कवीत्व सुरूच राहणार आहे. नाटकाचा एक अंक संपला. दूसरा आता अकोला महापालिका निवडणूक निकालानंतरच सुरू होईल. या निकालाने ज्यांना जो संदेश द्यायचा होता तो दिला आहे; सध्या तरी भाजपाने मुख्यमंत्र्यांचा ह्यसिंहह्ण जिंकला असून महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांचा ह्यगडह्ण सर करण्यासाठी हा निकाल संजीवनी देणारा ठरला आहे, यात कुणाचेही दुमत नसावे!