शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पदवीधरांचे रण‘जित’ !

By admin | Updated: February 7, 2017 03:30 IST

भाजपाचा सलग दुसरा विजय; मुख्यमंत्र्यांसह पक्षाची प्रतिष्ठा कायम

अकोला, दि. ६- वर्षभराआधीपासून मतदार नोंदणीसाठी मेहनत घेऊन केलेली मतदार नोंदणी न्यायालयाने ऐनवेळी रद्द केली, भाजपा अंतर्गत गटबाजी फोफावली, संपत्तीसह खोट्या शप थपत्रांची प्रकरणे उकरून काढण्याची मोहीम सुरू झाली, काँग्रेसने प्रथमच तगडा उमेदवार देऊन निवडणूक प्रचाराची राळ उडवली, तर काही उमेदवारांसाठी समाजाच्या नावावर म तदान जुळविण्याची खेळी सुरू झाली, अशा सर्व पृष्ठभूमीवर डॉ.रणजित पाटील यांनी पदवीधर मतदारसंघाचे ह्यरणह्ण पुन्हा ह्यजितह्ण करून भाजपाला सलग दुसरा विजय मिळवून दिला आहे. तसं पाहिलं तर, या निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच डॉ. रणजित पाटील यांचे पारडे जड होते. वर्षभराआधीच डॉ.पाटील हे निवडणुकीच्या तयारीला लागले होते. पाचही जिल्ह्यांतील विविध सामाजिक संघटना, युवा मंडळे, महिलांच्या संघटना यासोबतच बुलडाणा अर्बनसारख्या पतसंस्था अन् मोठय़ा शाळा, महाविद्यालयांच्या माध्यमातून मतदार नोंदणी करण्यास डॉ.पाटील यांनी प्राधान्य दिले. नोंदविलेला मतदार या मतदानाला जाईल इथपर्यंत या निवडणुकीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतल्यामुळे कधीकाळी गुपचूप होणारी ही निवडणूक प्रथमच सार्वत्रिक निवडणुकीसारखी रंगतदार झाली. या नियोजनाचे फळ डॉ.पाटील पर्यायाने भाजपाच्या पदरात पडले आहे. यशाचे बाप हजार असतात, असे म्हटले जाते; परंतु या निवडणुकीत यशाचे ङ्म्रेय हे मुख्यमंत्र्यांनी दाखविलेला विश्‍वास सार्थ करणारे कार्यकर्ते अन् डॉ.पाटील यांच्या संयमी नियोजनालाच द्यावे लागेल. निवडणुकीच्या तोंडावर कुठल्याही वादांवर भाष्य करून प्रकरणे वाढविण्यापेक्षा संयम अन् सामंजस्याची भूमिका घेतली. त्यामुळेच गटबाजीचा फटका म तदानात बसल्याचे प्रथमदर्शनी तरी दिसत नाही. दुसरीकडे काँग्रेसने दिलेली टक्कर ही तितकीच महत्त्वाची आहे. काँग्रेसने प्रथमच या मतदारसंघात अधिकृत उमेदवार जाहीर केला होता. संजय खोडके यांचे नेटवर्क, मॅनेजमेंट कौशल्य याचा विचार करून त्यांची निवड केली. खोडके यांनीही पाचही जिल्हे पिंजून काढत, ही निवडणूक चुरशीची केली; मात्र ते विजयापर्यंत पोहोचू शकले नाहीत. उमेदवार हा निवडणूक लढत असतो; पण कार्यकर्तेही निवडणुकीत झोकून देतात; काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक ह्यनिवडणुकीसारखीह्ण लढली नाही तर या दोन्ही पार्टीचे नेते खोडके यांना बळ देण्यात कमी पडले, हे मान्यच करावे लागेल. प्रहारच्या बच्चू कडू यांनीही निवडणुकीत झोकून देत डॉ.दीपक धोटे यांच्यासाठी घेतलेली मेहनत रंग घेऊ शकली नाही अन् डॉ.अविनाश चौधरी यांच्यासाठी एकवटलेला समाजही त्यांना यशापर्यंत पोहोचवू शकला नाही. मुळातच ही निवडणूक सुशिक्षितांची निवडणूक आहे. शिक्षण क्षेत्रातील संघटनांचा बोलबाला या निवडणुकीत असायचा; पण आता तो पूर्णपणे संपला असून, ही निवडणूक शतप्रतिशत राजकीय झाली आहे, त्यामुळे साम-दाम-दंड-भेद या निवडणुकीत घुसले, ते आता बाहेर निघणार नाही, त्यामुळे येणार्‍या काळात या निवडणुकीचे व निवडणुकीतील जय-पराजयाचे कवीत्व सुरूच राहणार आहे. नाटकाचा एक अंक संपला. दूसरा आता अकोला महापालिका निवडणूक निकालानंतरच सुरू होईल. या निकालाने ज्यांना जो संदेश द्यायचा होता तो दिला आहे; सध्या तरी भाजपाने मुख्यमंत्र्यांचा ह्यसिंहह्ण जिंकला असून महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांचा ह्यगडह्ण सर करण्यासाठी हा निकाल संजीवनी देणारा ठरला आहे, यात कुणाचेही दुमत नसावे!