शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ग्रा.पं. निवडणुकीचा सादर केला नाही खर्च : १0५ उमेदवारांवर अपात्रतेची टांगती तलवार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 02:16 IST

अकोला : निवडणूक निकालानंतर ३0 दिवसात निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक असताना, जिल्हय़ातील मूर्तिजापूर व पातूर या दोन तालुक्यातील १0५ उमेदवारांनी ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च सादर केला नसल्याचा अहवाल तहसीलदारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे. त्यानुषंगाने ग्रामपंचायत निवडणूक लढविलेल्या, मात्र विहित मुदतीत निवडणूक खर्च सादर न करणार्‍या दोन तालुक्यातील १0५ उमेदवारांवर पाच वर्षासाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरण्याच्या कारवाईची टांगती तलवार आहे.

ठळक मुद्देतहसीलदारांचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांकडे

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : निवडणूक निकालानंतर ३0 दिवसात निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक असताना, जिल्हय़ातील मूर्तिजापूर व पातूर या दोन तालुक्यातील १0५ उमेदवारांनी ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च सादर केला नसल्याचा अहवाल तहसीलदारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे. त्यानुषंगाने ग्रामपंचायत निवडणूक लढविलेल्या, मात्र विहित मुदतीत निवडणूक खर्च सादर न करणार्‍या दोन तालुक्यातील १0५ उमेदवारांवर पाच वर्षासाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरण्याच्या कारवाईची टांगती तलवार आहे.जिल्हय़ातील २७२ ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्यपदांसाठी घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल गत ९ ऑक्टोबर २0१७ रोजी जाहीर करण्यात आले. ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालानंतर ३0 दिवसांच्या कालावधीत उमेदवारांनी निवडणूक खर्च संबंधित तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे. नियमानुसार विहित मुदतीत निवडणूक खर्च सादर न करणार्‍या उमेदवारांवर पाच वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्याची कारवाई करण्यात येते. त्यानुषंगाने विहित मुदतीत निवडणूक खर्च सादर न करणार्‍या उमेदवारांचा अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत निवडणूक विभागामार्फत जिल्हय़ातील सातही तहसीलदारांना देण्यात आला होता. त्यानुसार मूर्तिजापूर तालुक्यातील ६४ आणि पातूर तालुक्यातील ४२ उमेदवारांनी ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च विहित मुदतीत सादर केला नसल्याचा अहवाल संबंधित तहसीलदारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ग्रामपंचायत निवडणूक विभागाला प्राप्त झाला. ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च विहित मुदतीत सादर केला नसल्याने, संबंधित उमेदवारांना पाच वर्षांसाठी निवडणूक लढण्यास अपात्र ठरविण्याच्या कारवाईसाठी उमेदवारांची जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक लढविलेल्या, मात्र विहित मुदतीत निवडणूक खर्च सादर न करणार्‍या मूर्तिजापूर व पातूर या दोन तालुक्यातील १0५ उमेदवारांवर पाच वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्याच्या  कारवाईची टांगती तलवार आहे.

पाच तालुक्यातील उमेदवारांचा अहवाल अप्राप्त - ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालानंतर विहित मुदतीत निवडणूक खर्च सादर न करणार्‍या मूर्तिजापूर व पातूर या दोन तालुक्यांतील उमेदवारांचा अहवाल तहसीलदारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ग्रामपंचायत निवडणूक विभागाकडे सादर करण्यात आले. - अकोला, अकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी व तेल्हारा या पाच तालुक्यातील निवडणूक खर्च सादर न करणार्‍या उमेदवारांचा अहवाल संबंधित तहसीलदारांकडून अद्यापही सादर करण्यात आला नाही. - या पाच तालुक्यातील उमेदवारांचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केव्हा प्राप्त होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक