शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

  सरकारचे हात शेतकऱ्यांच्या रक्ताने माखलेले - रविकांत तुपकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 14:39 IST

जोपर्यंत शेतकऱ्यांचा प्रश्न राजकीय होणार नाही, तोपर्यंत समस्या सुटणार नाहीत. आता हे आंदोलन राजकीयच अर्थात या भाजपा शासनाच्या विरोधात असल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केले.

मूर्तिजापूर: शेतकरी हिताची एकही गोष्ट या शासनाने केली नसून, सरकारच शेतकरी आत्महत्येस जबाबदार आहे. खऱ्या अर्थाने सरकारचे हात शेतकऱ्यांच्या रक्ताने माखलेले आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी नको, हमी भाव दिला तरी या देशातला शेतकरी सुखी होईल, शेतकऱ्यांचा प्रश्न राजकीय झाला पाहिजे. जोपर्यंत शेतकऱ्यांचा प्रश्न राजकीय होणार नाही, तोपर्यंत समस्या सुटणार नाहीत. आता हे आंदोलन राजकीयच अर्थात या भाजपा शासनाच्या विरोधात असल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केले. ७ जानेवारी रोजी मूर्तिजापूर तहसील कार्यालयासमोर शेतकºयांनी एकदिवसीय धरणे आंदोलन केले. यावेळी ते बोलत होते.भाजपा सरकारकारचा खरपूस समाचार घेताना ते म्हणाले की, मोदींना रात्रीचा नाद आहे. ते कुठली घोषणा रात्रीच करतात. ती नोटबंदी असो की जीएसटी, फुलतांब्याचा निर्णय असो. भाजपाला लेकरं नवसाने झाले असल्याची टीका करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीदरम्यान केलेल्या भाषणाची एक झलक उपस्थित शेतकºयांना ऐकवली. राम मंदिर नाही बांधले तर इथला शेतकरी मरणार नाही; पण शेतकºयांप्रती उदासीन धोरणाचा निषेध करीत सरकारने शेतकºयांना नक्षलवादाच्या दिशेने घेऊन जाऊ नये, असा सज्जड दमही भरला. आमची आंदोलने गांधीजींच्या मार्गाने चालू आहेत. जर भगतसिंगाच्या रूपात आलो तर शासनाला पळता भुई थोडी होईल, असा इशाराही शासनाला दिला. शेतकºयांच्या प्रश्नावर शेतकºयांनी एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी या प्रसंगी केले. विचारवंत डॉ. श्रीकांत तिडके यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी शेकापचे विजय गावंडे, प्रगती शेतकरी मंचाचे राजू वानखडे, भारतीय किसान संघाचे राहुल राठी, श्रावण रणबावळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आंदोलनाचे संयोजक अरुण बोंडे यांच्यासह न्यू यंग क्लब फार्मर्स, प्रगती शेतकरी मंच, भारतीय किसान संघ, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, जनमंच या सर्व संघटना धरणे आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाचे संचालन प्रा. सुधाकर गौरखेडे यांनी केले. (शहर प्रतिनिधी) 

 

टॅग्स :Ravikant Tupkarरविकांत तुपकरAkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना