शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

  सरकारचे हात शेतकऱ्यांच्या रक्ताने माखलेले - रविकांत तुपकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 14:39 IST

जोपर्यंत शेतकऱ्यांचा प्रश्न राजकीय होणार नाही, तोपर्यंत समस्या सुटणार नाहीत. आता हे आंदोलन राजकीयच अर्थात या भाजपा शासनाच्या विरोधात असल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केले.

मूर्तिजापूर: शेतकरी हिताची एकही गोष्ट या शासनाने केली नसून, सरकारच शेतकरी आत्महत्येस जबाबदार आहे. खऱ्या अर्थाने सरकारचे हात शेतकऱ्यांच्या रक्ताने माखलेले आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी नको, हमी भाव दिला तरी या देशातला शेतकरी सुखी होईल, शेतकऱ्यांचा प्रश्न राजकीय झाला पाहिजे. जोपर्यंत शेतकऱ्यांचा प्रश्न राजकीय होणार नाही, तोपर्यंत समस्या सुटणार नाहीत. आता हे आंदोलन राजकीयच अर्थात या भाजपा शासनाच्या विरोधात असल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केले. ७ जानेवारी रोजी मूर्तिजापूर तहसील कार्यालयासमोर शेतकºयांनी एकदिवसीय धरणे आंदोलन केले. यावेळी ते बोलत होते.भाजपा सरकारकारचा खरपूस समाचार घेताना ते म्हणाले की, मोदींना रात्रीचा नाद आहे. ते कुठली घोषणा रात्रीच करतात. ती नोटबंदी असो की जीएसटी, फुलतांब्याचा निर्णय असो. भाजपाला लेकरं नवसाने झाले असल्याची टीका करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीदरम्यान केलेल्या भाषणाची एक झलक उपस्थित शेतकºयांना ऐकवली. राम मंदिर नाही बांधले तर इथला शेतकरी मरणार नाही; पण शेतकºयांप्रती उदासीन धोरणाचा निषेध करीत सरकारने शेतकºयांना नक्षलवादाच्या दिशेने घेऊन जाऊ नये, असा सज्जड दमही भरला. आमची आंदोलने गांधीजींच्या मार्गाने चालू आहेत. जर भगतसिंगाच्या रूपात आलो तर शासनाला पळता भुई थोडी होईल, असा इशाराही शासनाला दिला. शेतकºयांच्या प्रश्नावर शेतकºयांनी एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी या प्रसंगी केले. विचारवंत डॉ. श्रीकांत तिडके यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी शेकापचे विजय गावंडे, प्रगती शेतकरी मंचाचे राजू वानखडे, भारतीय किसान संघाचे राहुल राठी, श्रावण रणबावळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आंदोलनाचे संयोजक अरुण बोंडे यांच्यासह न्यू यंग क्लब फार्मर्स, प्रगती शेतकरी मंच, भारतीय किसान संघ, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, जनमंच या सर्व संघटना धरणे आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाचे संचालन प्रा. सुधाकर गौरखेडे यांनी केले. (शहर प्रतिनिधी) 

 

टॅग्स :Ravikant Tupkarरविकांत तुपकरAkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना