शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

व्यापारी, उद्योजकांच्या समस्यांचे निराकरण करण्यावर सरकारचा भर -  शाहनवाज हुसेन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 13:56 IST

अकोला : व्यापारी, उद्योजकांच्या समस्यांचे निराकरण करू न त्यांना दिलासा देण्यावर केंद्र सरकारचा भर असून, राज्याच्या पातळीवर ई-वे बिलाची मर्यादा एक लाख रुपयापर्यंत वाढविण्यासाठी सरकारकडे प्रयत्न करू असे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय  प्रवक्ता शाहनवाज हुसेन यांनी शनिवारी येथे केले.

ठळक मुद्देविदर्भ चेंबर आॅफ कामर्स इंडस्ट्रिजच्या ८४ व्या वार्षिक आमसभेला उपस्थित राहण्यासाठी शाहनवाज हुसेन येथे आले होते. व्यापारी, उद्योजक भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभा असतो, तो याहीवेळी उभा राहील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.चेंबरशी निगडित व्यापारी, उद्योजक, पदाधिकारी, सभासदांची उपस्थिती होती.

अकोला : व्यापारी, उद्योजकांच्या समस्यांचे निराकरण करू न त्यांना दिलासा देण्यावर केंद्र सरकारचा भर असून, राज्याच्या पातळीवर ई-वे बिलाची मर्यादा एक लाख रुपयापर्यंत वाढविण्यासाठी सरकारकडे प्रयत्न करू असे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय  प्रवक्ता शाहनवाज हुसेन यांनी शनिवारी येथे केले.विदर्भ चेंबर आॅफ कामर्स इंडस्ट्रिजच्या मराठा मंडळ सभागृहात आयोजित ८४ व्या वार्षिक आमसभेला उपस्थित राहण्यासाठी शाहनवाज हुसेन येथे आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष विजय पानपालिया होते. या सभेला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावकर, आमदार गोपीकिशन बाजोरिया, माजी खासदार अजय संचेती, महापौर विजय अग्रवाल, राजकुमार बिलाला, निकेश गुप्ता, अशोक डालमिया, वसंत बाछुक  आदींची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलताना हुसेन यांनी व्यापारी, उद्योजकांच्या विविध मागण्या व प्रश्न सोडविण्यावर सरकारचा भर असून, जीएसटीबाबत ई-वे बिलांची ५० हजार रुपयांची मर्यादा आता एक लाख रुपये करण्यात येण्यासाठी आपले प्रयत्न आहेत. या राज्यातील व्यापारी, उद्योजकांच्या समस्या आपण सरकारपुढे मांडणार असल्याचे ते म्हणाले. ई-वे बिलासह त्यांनी स्थानिक औद्योगिक वसाहतीला कायमस्वरू पी पाणी पुुरवठा होण्यासाठी अमृत योजनेतून हा प्रश्न सोडविण्यासाठीची उद्योजकांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी भाजपाचे राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. तसेच अकोल्याच्या विमानतळाचा विस्तार होण्यासाठी आपले खास प्रयत्न असतील, असेही त्यांनी सांगितले. यासंदर्भात त्यांनी दिल्लीहून जेवढा वेळ अकोल्याला येण्यासाठी लागला, तेवढ्या वेळेत मी विमानाने इंग्लंडला पोहोचलो असतो, असे म्हणताच सभागृहात प्रचंड हशा पिकला. या विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरण करून, ते सुरू करणे क्रमप्राप्त असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. व्यापारी, उद्योजक भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभा असतो, तो याहीवेळी उभा राहील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.सभेला चेंबरचे पदाधिकारी नितीन खंडेलवाल, कासमअली नानजीभाई, विवेक डालमिया, निरजंन अग्रवाल, रवी खंडेलवाल, रमाकांत खेतान, श्रीकर सोमण, शशिकांत खेतान, सुधीर राठी, ओमप्रकाश गोयनका, प्रकाशभय्या, प्रभाकर गावंडे, ज्ञानप्रकाश खंडेलवाल, गोविंद बजाज, राहुल गोसर, राहुल गोयनका, निरव वोरा, दिलीप खत्री, कृष्णकुमार राठी, सतीश बालचंदाणी, गोपाल अग्रवाल, कृष्णा शर्मा, किशोर बाछुका, प्रमोद खंडेलवाल, आशिष चंदराणा, रूपेश राठी, अ‍ॅड. सुभाषसिंग ठाकूर, निखिल अग्रवाल, नितीन पाटील, कुंजबिहारी जाजू, पंकज बियाणी यांच्यासह चेंबरशी निगडित व्यापारी, उद्योजक, पदाधिकारी, सभासदांची उपस्थिती होती.

 

टॅग्स :AkolaअकोलाVidarbha Chamber of Commerceविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स