शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

अकोल्यात विमानसेवा सुरू न झाल्याची खंत -  पृथ्वीराज चव्हाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 12:38 PM

युती शासनाने चार वर्षात तरी विमानसेवा सुरू करायला हवी होती, अशी अपेक्षाही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.

अकोला : विमानसेवा सुरू न झाल्याने विभागात महत्त्वाचा असलेला अकोला जिल्हा नकाशावर आहे की नाही, असे वाटते. मुख्यमंत्री असताना भूसंपादनातील अडचणी दूर करण्यास विलंब झाला. त्याची खंत आहे, अशी कबुली देताना युती शासनाने चार वर्षात तरी विमानसेवा सुरू करायला हवी होती, अशी अपेक्षाही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजित ‘मिट द प्रेस’ मध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.मराठवाडा, पश्चिम विदर्भ औद्योगिक, आर्थिक बाबतीत पिछाडीवर आहे. या भागात कापसावर प्रक्रिया करणारे उद्योग निर्मिती अत्यावश्यक आहे. आघाडी सरकारने राबवलेल्या वस्त्रोद्योग धोरणाचा लाभ या भागाला झाला नसल्याचेही चित्र जनसंघर्ष यात्रेच्या दौऱ्यात दिसून येत आहे. आघाडी सरकारच्या या त्रुटी विदर्भाच्या मुख्यमंत्र्यांनी दूर करायला हव्या होत्या. तेही झाले नाही. केवळ भरमसाठ आश्वासने देत हे सरकार सत्तेत आले. जनतेच्या पदरात काहीच पडले नाही, असेही चव्हाण यांनी सांगितले. युवकांना रोजगार, शेतकºयांना हमीभाव, गुजरात मॉडेल, अच्छे दिनाच्या नावाखाली आलेले सरकार सगळ््या घोषणा विसरले. त्यातून आता सर्वांचा भ्रमनिरास झाला आहे. नोटाबंदी, जीएसटीने अर्थव्यवस्थेने कंबरडे मोडले. त्यामुळेच देशाच्या गंगाजळीतून ३.५० कोटी घ्यायची तयारी केंद्र सरकारने चालवली. नोटाबंदीतून चार लाख कोटी रुपये काळा पैसा बाहेर येईल, प्रत्यक्षात ९९.३ टक्के नोटा परत आल्याने तेही सरकारसाठी दिवास्वप्न ठरले. त्याचे परिणाम आता देशातील जनतेला भोगावे लागत आहेत. महानगरपालिकांतील स्थानिक संस्था कर रद्द केल्याने सात हजार कोटींपेक्षाही अधिक नुकसान झाल्याचे चव्हाण म्हणाले. प्रास्ताविक मराठी पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष सिद्धार्थ शर्मा यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष शौकतअली मीरसाहेब, सरचिटणिस प्रमोद लाजुरकर उपस्थित होते.

- शेतकºयांचे तर कंबरडेच मोडलेनिवडणुकीत २०२२ पर्यंत शेतकºयांचे उत्पादन दुप्पट करू, स्वामिनाथन आयोगानुसार उत्पादन खर्च अधिक ५० टक्के मिळून हमीभाव देऊ, सात-बारा कोरा करू, यापैकी एकही मागणी सरकारने पूर्ण केली नाही. उलट शेतकºयांची आंदोलने दडपशाहीने दाबली जात आहेत, ही वस्तुस्थितीही चव्हाण यांनी विशद केली.

- दुष्काळाची दाहकता गंभीरचालू वर्षातील दुष्काळ १९७२ पेक्षाही गंभीर आहे. ३० आॅक्टोबरपूर्वी राज्य शासनाने दुष्काळ घोषित करून केंद्राकडे प्रस्ताव पाठवणे आवश्यक होता. तसे झाले नाही. आता प्रस्तावानुसार सरकार ७५०० कोटींपैकी किती देते, यावरच दुष्काळातील उपाययोजना ठरणार आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण