शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
3
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
4
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
5
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
6
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
7
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
8
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
9
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
10
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
11
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
13
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
14
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
15
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
16
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
17
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
18
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
19
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
20
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना योजनांचा लाभ पोहोचवणार - अमोल मिटकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 18:57 IST

शासनाच्या योजना सर्वसामान्य व शेतकºयांपर्यंत पोहोचविणे हे उद्दिष्ट राहणार अल्याचे नवनिर्वाचित आमदार अमोल मिटकरी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

- प्रशांत विखे तेल्हारा : पदाचा सदुपयोग करून शैक्षणिक, आरोग्य, कृषीविषयक याविषयी विकासात्मक धोरण राबवणे तसेच शासनाच्या योजना सर्वसामान्य व शेतकºयांपर्यंत पोहोचविणे हे उद्दिष्ट राहणार अल्याचे नवनिर्वाचित आमदार अमोल मिटकरी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. पश्चिम विदर्भामध्ये पक्ष मजबूत करून जी जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रश्न : ज्येष्ठ नेत्यांची मोठी मांदियाळी आपल्या पक्षात आहे. आपण त्यांच्याशी कसे जुळवून घ्याल?आमचा पक्ष हा काही भारतीय जनता पार्टी नाही. या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची काय दशा झाली आहे, हे सर्वश्रुत आहे. राहिला विषय माझा व माझ्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा, तर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांपासून तर मग अजित पवार, सुप्रियाताई, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळपर्यंत या सर्वांचे मी जरी नवखा असलो तरी मला वेळोवेळी मार्गदर्शन लाभत आले आहे. माझ्यावर त्यांनी विश्वास ठेवून मला जुळवून घेतले असल्याने मला हे पद मिळाले. या पक्षाशी जुळायचे असल्यानेच मी पक्षाकडे गेलो, म्हणून आम्ही आधीच एकमेकांशी जुळलो आहे.

प्रश्न : जिल्ह्यातील पक्षाची स्थिती आपणास माहिती आहेच. आपली आमदारकी याला कितपत बळ देणारी ठरेल?पाहिजे त्या प्रमाणात पक्ष जिल्ह्यात वाढला नाही, ही वस्तुस्थिती आहे. कदाचित यालाच बळ देण्यासाठी पक्षाने जबाबदारी दिली. मी स्वत: पक्षाकडे या जिल्ह्याचे पक्षाचे पालकत्व मागितले आहे. त्यादृष्टीने पक्ष बांधणी करून भविष्यात होणाºया लोकसभा व पाच विधानसभा मतदारसंघ आमचे लक्ष्य असून, त्यादृष्टीने पक्ष वाढीच्या कामाला गती देऊन पक्ष वाढविला जाईल.

प्रश्न : विधान परिषदेनंतर लक्ष्य विधानसभा असेल का, कोणता मतदारसंघ निवडाल?पक्ष जी जबाबदारी देईल ती निष्ठेने पार पाडेल. मग त्यामध्ये पक्षाने जर भविष्यात विधानसभा निवडणूक लढविण्याचा आदेश दिला तर ते देखील करू. पक्षाने या बाबतीत विचारणा केली तर निश्चितच प्राधान्य माझा होम ग्राउंड असलेला अकोला पूर्व मतदारसंघाला राहील आणि तुमची इच्छा असेल तर अकोटसुद्धा.

प्रश्न : आपण वक्तृत्वाचे धनी आहात. कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी काही प्लॅन तयार आहे का?वक्तृत्व ही एक कला आहे. कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी ग्राउंड लेव्हलला जाऊन काम करावे लागते. हा या दोघांमधील फरक आहे. वक्तृत्वामुळेच मी आता कर्तृत्वापर्यंत पोहोचलो आहे. आता प्राधान्य कर्तृत्वालाच असेल. त्यादृष्टीने नियोजन करणे सुरू आहे. आमदार झाल्यापासून कामाला लागलो असून, मूर्तिजापूर, अकोट येथे भेट देऊन आवश्यक ते दिशानिर्देश दिले आहेत.

प्रश्न : अकोला शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या व मृत्यू याला जबाबदार कोण?याला जबाबदार येथील आरोग्य विभाग व पोलीस विभागच आहे. आरोग्य विभागाचा गलथान कारभार पाहता प्रशासनामध्ये समन्वय नाही. सिव्हिल सर्जन राजकुमार चव्हाण यांच्याशी अनेक वेळा संवाद साधला असता त्यांचा फोन कायमस्वरूपी बंद येत होता. पोलीस विभागाकडून लॉकडाउनची शिस्त पाळल्या गेली नाही. त्यामुळे कोरोनामध्ये हा जिल्हा इतर जिल्ह्याच्या तुलनेत अपयशी ठरल्याने लवकरच जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन शासनाला अवगत करून पुढील कार्यवाही केली जाईल.

प्रश्न : राजकारणात यशस्वी होण्यासाठी युवकांना काय संदेश देणार?युवकांनी राजकारण करीत असताना सामाजिक अंधश्रद्धेसोबत राजकीय अंधश्रद्धा बाजूला ठेवावी. राजकारणात यशस्वी होण्यासाठी घराणेशाहीची गरज नसते किंवा कार्यकर्ते म्हणून अनेक वर्षे केवळ नेत्यांच्या चपला, जोडे उचलायची गरज नसते. फक्त आपले कर्तव्य प्रामाणिक असले पाहिजे, हे मी माझ्या उदाहरणावरून सांगतो आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाinterviewमुलाखत