शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

युवा संसदच्या माध्यमातून शासकीय योजनांचा प्रचार करण्याचा शासनाचा प्रयत्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 14:30 IST

अकोला: माध्यमिक शिक्षण विभाग व क्रीडा विभागाच्यावतीने युवक कल्याण कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्वच जिल्ह्यांमधील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये युवा संसद व वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून राज्य शासनाकडून शासकीय योजनांचा प्रचार व प्रसार करण्यात येणार आहेत

अकोला: माध्यमिक शिक्षण विभाग व क्रीडा विभागाच्यावतीने युवक कल्याण कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्वच जिल्ह्यांमधील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये युवा संसद व वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून राज्य शासनाकडून शासकीय योजनांचा प्रचार व प्रसार करण्यात येणार आहेत. त्या दृष्टिकोनातून वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रधानमंत्री जनधन योजना, स्वच्छ भारत अभियान, निर्मल ग्राम, श्रमदान, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसह इतर शासकीय योजनांवर विद्यार्थ्यांनी विचार मांडावे, असे शिक्षण विभागाला निर्देश देण्यात आले आहेत.राष्ट्रीय व राज्य निर्माणामध्ये युवकांचा सहभाग वाढावा, त्यांच्यातील नेतृत्व गुणांचा विकास व्हावा, सामाजिक कार्यासाठी युवकांना प्रोत्साहन द्यावे आणि युवकांचे विचार व अपेक्षा जाणून घ्याव्यात, या उद्देशाने उच्च माध्यमिक शिक्षण विभाग, क्रीडा विभागाच्यावतीने १0 आॅगस्ट ते ३१ आॅगस्टदरम्यान राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये कनिष्ठ महाविद्यालय, तालुका, गटस्तर, जिल्हा आणि राज्यस्तरावर युवा संसद कार्यक्रमासोबत वक्तृत्व स्पर्धा उपक्रम राबविण्यात येणार आहे. १0 ते १५ आॅगस्टदरम्यान कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर वक्तृत्व स्पर्धा, १६ ते २0 आॅगस्टदरम्यान तालुका व गटस्तरावर वक्तृत्व स्पर्धा, २१ ते २६ आॅगस्टदरम्यान जिल्हास्तरावर आणि २८ ते ३१ आॅगस्टदरम्यान राज्यस्तरावर युवा संसद आयोजित करण्याचे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. शासकीय योजनांचा प्रचार, प्रसार करून युवकांचे शासनाविषयी काय मत आहे, हे जाणून घेण्यासाठी राज्य शासन युवा संसद उपक्रमाचा वापर करीत असल्याचे बोलले जात आहे.

शासकीय योजनांवर वक्तृत्व स्पर्धायुवा संसदेमध्ये विद्यार्थ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय योजनांवर विचार मांडणे सक्तीचे आहे. प्रधानमंत्री जनधन योजना, स्वच्छ भारत अभियान, निर्मल ग्राम अभियान, श्रमदान, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, आयुष्यमान भारत, सर्वांसाठी घरे, सेवा हमी कायदा, मुद्रा योजना, पीक विमा योजना, मुख्यमंत्री, पंतप्रधान ग्रामसडक योजना, जलयुक्त शिवार, कौशल्य विकास कार्यक्रम, सुप्रशासन आणि चांद्रयान मोहीम आदी विषयांवर विद्यार्थ्यांना वक्तृत्व स्पर्धेत विचार मांडावे लागणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना १00 गुण दिले जाणार आहेत.

 

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजना