शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
2
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
3
"घरी ये, लग्नाची बोलणी करू..."; तरुणाला घरी बोलावलं अन् गर्लफ्रेंडच्या कुटुंबाने मिळून संपवलं!
4
Samruddhi Mahamarg Accident: साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला निघाले, मृत्युने समृद्धी महामार्गावरच गाठले; दोघे ठार, तर...
5
अपमान सहन होईना! बांगलादेशचे राष्ट्रपती शहाबुद्दीन निवडणुकीनंतर पद सोडणार, युनूस सरकारवर गंभीर आरोप
6
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
7
लुथरा बंधूंना पोलिसांनी पकडलं, पण थायलंडमधून भारतात आणण्यास आणखी उशीर होणार! कारण काय?
8
NPS, UPS आणि अटल पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल; कोणाला होणार किती फायदा?
9
केंद्रीय प्राधिकरणावरील अधिकारी लोकायुक्त कक्षेत; महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक मंजूर
10
Leopard Spotted in Pune Airport: अखेर सापडला! पुणे विमानतळ परिसरात लपलेला बिबट्या ७ महिन्यांनी अडकला पिंजऱ्यात
11
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
12
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
13
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
14
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
15
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
16
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
17
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
18
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
19
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
20
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

शासनच करतेय हरित लवादाच्या आदेशाची अवहेलना!

By admin | Updated: May 8, 2017 02:51 IST

अन्न व औषधी प्रशासनाने उघड्यावर जाळला दोन ट्रक गुटखा.

अकोला : देशभरातील रस्त्यावर, उघड्या ठिकाणी कचरा जाळण्यावर राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) निर्बंध लावले असून, डिसेंबर २0१६ मध्ये यासंबंधीचा आदेश दिला; परंतु शासनाकडूनच हरित लवादाच्या आदेशाची सर्रास पायमल्ली होताना दिसून येत आहे. हरित लवादाच्या आदेशानंतरही शासनानेसुद्धा उघड्यावर कचरा जाळण्यास बंदी घातली असताना, शासनाचा एक विभाग असलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी चक्क उघड्यावर दोन ट्रक गुटखा उघड्यावर जाळून शहराच्या प्रदूषणात भरच घातली आहे. त्यामुळे शासन अन्न व औषध प्रशासनावर दंडात्मक कारवाई करेल का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. राष्ट्रीय हरित लवादाकडून घनकचरा व्यवस्थापन नियमांचे सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना सक्तीने पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. पर्यावरण मंत्रालय आणि राज्य सरकारांना लवादाने पीव्हीसी आणि क्लोरिनेटेड प्लास्टिकवर सहा महिन्यांमध्ये बंदी घालण्याचा आदेश दिला आहे; परंतु या आदेशाकडे शासन दुर्लक्ष करीत असून, कायद्याचा भंग करण्याचा सपाटाच शासनाच्या अधिकार्‍यांनी लावला आहे. शनिवारी अन्न व औषध प्रशासनाने जिल्हय़ातील कारवायांमधील जप्त केलेला १ कोटी ६८ लाखांचा दोन ट्रक गुटखा, सुगंधीत तंबाखू खडकी परिसरात उघड्यावर जाळून हरित लवादाच्या आदेशाची अवहेलना करून शहराच्या वाढत्या प्रदूषणात भर घातली आहे. गुटख्याची विक्री करण्यासाठी सर्रास प्लास्टिक पाकिटांचा वापर केला जातो, तसेच विविध प्रकारची रासायनिक प्रक्रिया करून गुटखा तयार केला जातो. शरीरासाठी अत्यंत घातक आणि पर्यावरणास हानिकारक असलेल्या प्लास्टिक पाकिटातील गुटखा जाळून अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण केला. अन्न व औषध प्रशासनाने जाळलेल्या गुटख्यामुळे खडकी परिसरात मोठय़ा प्रमाणात प्रदूषण निर्माण झाले.हे प्रदूषण नागरिकांसाठी हानिकारक आहे. गुटखा न जाळता, त्याची जमिनीमध्ये पुरूनसुद्धा विल्हेवाट लावता आली असती; परंतु अन्न व औषध प्रशासनाने उघड्यावर गुटखा जाळून कायद्याचा भंग केल्याचा आरोप पर्यावरण तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. मोठय़ा प्रमाणात झाले प्रदूषणइस शहर को ये हुआ क्या, कहीं राख है तो कहीं धुंवा-धुंवा..अशी चित्रपटाच्या सुरुवातीला लागणारी ही जाहिरातीतील वाक्ये आता अन्न व औषध प्रशासनाने गुटखा जाळून केलेल्या हवा प्रदूषणासाठी वापरावीत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शनिवारी दुपारी अन्न व औषध प्रशासनाने दोन ट्रकमध्ये गुटख्याची व तंबाखूची पाकिटे भरून खडकी परिसरात आणले. येथील एका नाल्यामध्ये त्यांनी गुटखा जाळला. गुटखा जाळल्यामुळे परिसरात मोठय़ा प्रमाणात प्रदूषण झाले. परिसरात आजूबाजूला अनेक घरे होती. त्यामुळे परिसरात मोठय़ा प्रमाणात गुटख्याचा धूर आणि वातावरणात वेगळीच दुर्गंधी पसरली होती. शासनाच्या नियमांनुसार आम्हाला जप्त केलेला गुटखा, तंबाखू जाळूनच नष्ट करावा लागतो. दुसरा पर्यायच नाही, त्यामुळे आम्ही शहराबाहेर दोन ट्रक गुटखा नेऊन खडकी परिसरात जाळला. प्रदूषण होऊ नये, असा आमचा उद्देश आहे. गुटखा जाळल्यामुळे कोणतेही प्रदूषण झाले नाही.-नितीन नवलकार, निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन.गुटखा जाळल्यामुळे निश्‍चित वातावरणात प्रदूषण पसरते. गुटखा पॅकिंगसाठी मोठय़ा प्रमाणात प्लास्टिकचा वापर होता. रासायनिक प्रक्रियासुद्धा होते. गुटख्यापासून निर्माण होणारे प्रदूषण मानवी आरोग्यास हानिकारक आहे. गुटखा जाळण्याऐवजी तो जमिनीत पुरून नष्ट करायला हवा, तसेच गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ पाण्यात मिसळल्यास जलचरांवर त्याचा परिणाम होतो. -उदय वझे,पर्यावरण अभ्यासक.