शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

शासनच करतेय हरित लवादाच्या आदेशाची अवहेलना!

By admin | Updated: May 8, 2017 02:51 IST

अन्न व औषधी प्रशासनाने उघड्यावर जाळला दोन ट्रक गुटखा.

अकोला : देशभरातील रस्त्यावर, उघड्या ठिकाणी कचरा जाळण्यावर राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) निर्बंध लावले असून, डिसेंबर २0१६ मध्ये यासंबंधीचा आदेश दिला; परंतु शासनाकडूनच हरित लवादाच्या आदेशाची सर्रास पायमल्ली होताना दिसून येत आहे. हरित लवादाच्या आदेशानंतरही शासनानेसुद्धा उघड्यावर कचरा जाळण्यास बंदी घातली असताना, शासनाचा एक विभाग असलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी चक्क उघड्यावर दोन ट्रक गुटखा उघड्यावर जाळून शहराच्या प्रदूषणात भरच घातली आहे. त्यामुळे शासन अन्न व औषध प्रशासनावर दंडात्मक कारवाई करेल का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. राष्ट्रीय हरित लवादाकडून घनकचरा व्यवस्थापन नियमांचे सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना सक्तीने पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. पर्यावरण मंत्रालय आणि राज्य सरकारांना लवादाने पीव्हीसी आणि क्लोरिनेटेड प्लास्टिकवर सहा महिन्यांमध्ये बंदी घालण्याचा आदेश दिला आहे; परंतु या आदेशाकडे शासन दुर्लक्ष करीत असून, कायद्याचा भंग करण्याचा सपाटाच शासनाच्या अधिकार्‍यांनी लावला आहे. शनिवारी अन्न व औषध प्रशासनाने जिल्हय़ातील कारवायांमधील जप्त केलेला १ कोटी ६८ लाखांचा दोन ट्रक गुटखा, सुगंधीत तंबाखू खडकी परिसरात उघड्यावर जाळून हरित लवादाच्या आदेशाची अवहेलना करून शहराच्या वाढत्या प्रदूषणात भर घातली आहे. गुटख्याची विक्री करण्यासाठी सर्रास प्लास्टिक पाकिटांचा वापर केला जातो, तसेच विविध प्रकारची रासायनिक प्रक्रिया करून गुटखा तयार केला जातो. शरीरासाठी अत्यंत घातक आणि पर्यावरणास हानिकारक असलेल्या प्लास्टिक पाकिटातील गुटखा जाळून अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण केला. अन्न व औषध प्रशासनाने जाळलेल्या गुटख्यामुळे खडकी परिसरात मोठय़ा प्रमाणात प्रदूषण निर्माण झाले.हे प्रदूषण नागरिकांसाठी हानिकारक आहे. गुटखा न जाळता, त्याची जमिनीमध्ये पुरूनसुद्धा विल्हेवाट लावता आली असती; परंतु अन्न व औषध प्रशासनाने उघड्यावर गुटखा जाळून कायद्याचा भंग केल्याचा आरोप पर्यावरण तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. मोठय़ा प्रमाणात झाले प्रदूषणइस शहर को ये हुआ क्या, कहीं राख है तो कहीं धुंवा-धुंवा..अशी चित्रपटाच्या सुरुवातीला लागणारी ही जाहिरातीतील वाक्ये आता अन्न व औषध प्रशासनाने गुटखा जाळून केलेल्या हवा प्रदूषणासाठी वापरावीत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शनिवारी दुपारी अन्न व औषध प्रशासनाने दोन ट्रकमध्ये गुटख्याची व तंबाखूची पाकिटे भरून खडकी परिसरात आणले. येथील एका नाल्यामध्ये त्यांनी गुटखा जाळला. गुटखा जाळल्यामुळे परिसरात मोठय़ा प्रमाणात प्रदूषण झाले. परिसरात आजूबाजूला अनेक घरे होती. त्यामुळे परिसरात मोठय़ा प्रमाणात गुटख्याचा धूर आणि वातावरणात वेगळीच दुर्गंधी पसरली होती. शासनाच्या नियमांनुसार आम्हाला जप्त केलेला गुटखा, तंबाखू जाळूनच नष्ट करावा लागतो. दुसरा पर्यायच नाही, त्यामुळे आम्ही शहराबाहेर दोन ट्रक गुटखा नेऊन खडकी परिसरात जाळला. प्रदूषण होऊ नये, असा आमचा उद्देश आहे. गुटखा जाळल्यामुळे कोणतेही प्रदूषण झाले नाही.-नितीन नवलकार, निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन.गुटखा जाळल्यामुळे निश्‍चित वातावरणात प्रदूषण पसरते. गुटखा पॅकिंगसाठी मोठय़ा प्रमाणात प्लास्टिकचा वापर होता. रासायनिक प्रक्रियासुद्धा होते. गुटख्यापासून निर्माण होणारे प्रदूषण मानवी आरोग्यास हानिकारक आहे. गुटखा जाळण्याऐवजी तो जमिनीत पुरून नष्ट करायला हवा, तसेच गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ पाण्यात मिसळल्यास जलचरांवर त्याचा परिणाम होतो. -उदय वझे,पर्यावरण अभ्यासक.