शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

गोपीकिशन बाजोरिया यांच्याकडे अकोट मतदारसंघाची जबाबदारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 01:40 IST

गेल्या काही दिवसांपासून अकोट मतदारसंघात आमदार गोपीकिशन  बाजोरिया यांच्या फेर्‍या वाढल्या असून, त्यांची पावले आता अकोट विधानसभा  मतदारसंघाकडे वळली असल्याची चर्चा राजकीय वतरुळात सुरू आहे. अशा तच आता त्यांच्याकडे अकोट विधानसभा मतदारसंघ बांधणीची जबाबदारी  शिवसेनेच्यावतीने दिली असल्याने या चर्चेला बळ मिळाले आहे. 

ठळक मुद्देभाजपच्या ताब्यातील मतदारसंघात मोर्चेबांधणी राजकीय वतरुळात चर्चा सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गेल्या काही दिवसांपासून अकोट मतदारसंघात आमदार गोपीकिशन  बाजोरिया यांच्या फेर्‍या वाढल्या असून, त्यांची पावले आता अकोट विधानसभा  मतदारसंघाकडे वळली असल्याची चर्चा राजकीय वतरुळात सुरू आहे. अशा तच आता त्यांच्याकडे अकोट विधानसभा मतदारसंघ बांधणीची जबाबदारी  शिवसेनेच्यावतीने दिली असल्याने या चर्चेला बळ मिळाले आहे. राज्यामध्ये सत्तेत असलेल्या भाजपा-शिवसेना या दोन पक्षातील शीतयुद्ध  कधीचेच संपले असून, हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात रणशिंग फुंकून  आगामी निवडणुकीची मार्चेबांधणी करीत आहेत. शिवसेनेने प्रत्येक विधानसभा  मतदारसंघनिहाय मोर्चेबांधणीसाठी जबाबदारी दिली असून, त्यामध्ये अकोट  विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी आमदार गोपिकिशन बाजोरिया यांच्याकडे  सोपविली आहे. अकोट हा मतदारसंघ सध्या भाजपाकडे आहे. येथून भाजपाचे  ज्येष्ठ आमदार प्रकाश भारसाकळे यांनी मागील निवडणुकीत शिवसेनेसह  विरोधकांचा पराभव करून, विजयाचा झेंडा रोवला होता. जिल्हय़ातील सर्वात  मोठी नगरपालिका असलेल्या अकोट या मतदारसंघात भाजपाचा वरचष्मा  आहे. यापूर्वी येथे सेनेचे संजय गावंडे हे आमदार होते. त्यांच्या पराभवानंतर  सेनेच्या वर्चस्वाला उतरती कळा लागली. त्यामुळे आता पुन्हा नव्या दमाने सेना उभारणीसाठी संपर्कप्रमुख खा. अरविंद  सावंत यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय मोर्चेबांधणीची जबाबदारी  निश्‍चित केली आहे. आ. बाजोरिया यांनी यापूर्वी अकोला पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढविली  होती. त्यामध्ये त्यांना भाजपाकडून निसटता पराभव पत्कारावा लागला. मात्र,  विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून तिसर्‍यांदा विजयी होत,  त्यांनी पक्षातील आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. गेल्या शुक्रवारीच अकोट नगर परिषदेच्या समस्यांबाबत प्रशासकीय  कामकाजाचा आढावा घेतला होता, तर अकोटकडे जाणार्‍या राज्य मार्गाच्या  दुरुस्तीसाठी अल्टिमेटम देऊन अकोट येथील जनतेच्या जिव्हाळय़ाच्या प्रश्नांना  हात घातला. तसेच अकोट शहरासाठी तयार केलेल्या विकास आराखड्यात  आवश्यक बदल करून, मुंबईत बैठक लावण्याचे आश्‍वासन आ. बाजोरिया  यांनी दिले. पुरवणी कर आकारणीमधील अपिलापासून वंचित राहिलेल्या  मालमत्ताधारकांना संधी देऊन त्यांचे आक्षेप निकाली काढण्याचे निर्देश मु ख्याधिकारी गीता ठाकरे यांना दिले. बाजोरिया यांचा अकोटमधील वाढता राब ता, सध्या राजकीय वतरुळात चर्चेचा विषय बनला आहे. अशातच आता  विधानसभा मोर्चेबांधणीची जबाबदारी त्यांच्यावर आल्याने पुढील विधानसभा  निवडणुकीची तयारी तर नव्हे ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

टॅग्स :Gopikishan Bajoriaगोपीकिशन बाजोरीयाakotअकोट