शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

सापांच्या दैवतीकरणामुळे त्यांचा जीव धोक्यात - बाळ काळने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 12:15 IST

नागपंचमीच्या निमित्ताने रविवार, ४ आॅगस्ट रोजी बाळ काळणे यांनी ‘लोकमत’शी खास बातचीत केली. यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी चर्चा करताना सापांविषयी असलेले समज-गैरसमज याविषयी विस्तृत माहिती दिली. 

अकोला : साप हा शेतकºयांचा मित्र असून, निसर्ग संतुलनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो; पण धार्मिकतेच्या नावाखाली सापांचे दैवतीकरण करण्यात आले. पूजन करून त्यांना दूध पाजण्यात येते; मात्र सापांच्या अशा दैवतीकरणामुळे त्यांचा जीव धोक्यात आला आहे. नागपंचमीच्या निमित्ताने रविवार, ४ आॅगस्ट रोजी बाळ काळणे यांनी ‘लोकमत’शी खास बातचीत केली. यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी चर्चा करताना सापांविषयी असलेले समज-गैरसमज याविषयी विस्तृत माहिती दिली. 

प्र.  नागपंचमीला सापाला दूध पाजणे योग्य आहे का?बाळ काळणे - नागपंचमीला नागरिक मोठ्या आस्थेने सापाला दूध पाजतात; पण दूध हे सापाचे अन्न नाही. साप पूर्णत: मांसाहारी असून, दूध प्यायल्याने सापांचा जीव धोक्यात सापडतो. साप हा निसर्गाचे संतुलन राखत असल्याने तो शेतकºयांचा मित्रच समजला जातो; पण नागपंचमीच्या नावावर त्याला दूध पाजण्याची प्रथा आजही ग्रामीण भागात दिसून येते ती चुकीचीअसल्याचे बाळ काळणे यांनी  सांगितले. 

प्र. वारुळाचे पुजन करण्याची प्रथा योग्य आहे का ?बाळ काळणे - शहरात हा प्रकार कमी झाला असला, तरी शहरालगतच्या भागासह दुर्गम भागात वारुळाचे पूजन आजही केले जाते. यात काही गैर नाही किंवा त्याला विरोधही नाही. हो धार्मिक सणांशी निसर्ग संतुलनाची सांगड असल्याने हे व्हायला हवे; पण आपल्या कुठल्याही कृत्यामुळे सापांच्या प्रजातीच नष्ट होण्याच्या मार्गावर जात असेल, तर या प्रथा बंदच झालेल्या बºया.

प्र. सापांच्या संरक्षणासाठी काय करावे?बाळ काळणे -  साप हा शेतकºयांचा मित्र असून, निसर्ग संतुलनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो; पण धार्मिकतेच्या नावाखाली सापांचे दैवतीकरण करण्यात आले. निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी मानव जातीप्रमाणेच सापांच्या प्रजातीही तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाने सापांच्या रक्षणासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यामुळे सण साजरे करा; मात्र सापांचे दैवतीकरण करून त्यांचा जीव धोक्यात टाकू नका, असे आवाहन यानिमित्ताने त्यांनी नागरिकांना केले. 

कर्करोगाशी लढत देतानाच सापांना जीवनदानसर्पमित्र बाळ काळणे यांना डिसेंबर २०१८ मध्ये कर्करोग असल्याचे निदान झाले. कर्करोग असल्याचे कळताच पायाखालची जमीनच सरकली होती. या अवस्थेत असतानाही त्यांनी वन्यजीव संरक्षणाचे कार्य मोठ्या जिद्दीने अन् खंबीरतेने सुरू ठेवले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कर्करोगावर मात करीत सापांसोबतच इतर वन्य प्राणी व पक्ष्यांचे प्राण वाचविणारे ते राज्यातील एकमेव सर्पमित्र असावेत. 

टॅग्स :Akolaअकोलाsnakeसाप